शहरं
Join us  
Trending Stories
1
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
2
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
3
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
4
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
5
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
6
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
7
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
8
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!
9
२२ रुपयांच्या 'या' शेअरचा ४२४०% परतावा! १ लाख रुपयांचे झाले तब्बल ४२.४० लाख; अजूनही संधी?
10
कोट्यधीश बनण्याचं स्वप्न असेल तर 'या' सरकारी स्कीमचा विचार करू शकता; मिळेल १ कोटींचा फंड
11
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
12
“राज्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार तातडीची मदत द्या, ओला दुष्काळ जाहीर करा”: सपकाळ
13
रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची अपडेट! कार्डवरुन नाव काढणार? केंद्राने १.१७ कोटी लोकांची यादी पाठवली
14
एका श्वानामुळे तब्बल अर्धा तास रखडली ट्रेन, प्रवाशांचाही उडाला गोंधळ! नेमकं झालं तरी काय?
15
सुवर्णसंधी! BSF मध्ये हेड काँन्स्टेबल पदांवर मेगाभरती; या तारखेपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया
16
पत्नीची गोळ्या, कीटकनाशक देऊन हत्या, मृतदेह पुरला; बॉयफ्रेंडसोबत पळून गेल्याचा केला बनाव, पण एका चुकीमुळे अडकला
17
रेखा गुप्ता यांच्यावरील हल्ला पूर्व नियोजित कट; आरोपीचे २४ तास पूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज समोर
18
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
19
आधी ट्रम्प यांची भेट, नंतर भारतात मोठी कर्मचारी कपात; एकाच दिवसात मालकाला बसला १.३१ लाख कोटींचा फटका
20
या देशात शुक्रवारचे नमाजपठण केले नाही तर 2 वर्षांचा तुरुंगवास; भरावा लागेल ₹ 61 हजारचा दंड! का करण्यात आला असा कायदा?

रेल्वेतील गुन्हेगारी घटनांचा आलेख वाढता; अपुर्‍या मनुष्यबळामुळे तपासात येत आहेत अडचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 13:43 IST

रेल्वे आणि रेल्वेस्टेशनच्या हद्दीतील गुन्हेगारी घटनांमध्ये गेल्या काही वर्षांत मोठी वाढ झाली आहे. पाच वर्षांपूर्वी लोहमार्ग पोलीस ठाण्यात वर्षभरात १०० च्या आत गुन्हे दाखल होत. परंतु हा आकडा आता ४०० वर पोहोचला आहे. एकीकडे गुन्ह्यांची संख्या वाढत आहे. तर दुसरीकडे अपुर्‍या मनुष्यबळामुळे गुन्ह्यांना रोखणे आणि तपास लावणे अवघड होत आहे.

औरंगाबाद : रेल्वे आणि रेल्वेस्टेशनच्या हद्दीतील गुन्हेगारी घटनांमध्ये गेल्या काही वर्षांत मोठी वाढ झाली आहे. पाच वर्षांपूर्वी लोहमार्ग पोलीस ठाण्यात वर्षभरात १०० च्या आत गुन्हे दाखल होत. परंतु हा आकडा आता ४०० वर पोहोचला आहे. एकीकडे गुन्ह्यांची संख्या वाढत आहे. तर दुसरीकडे अपुर्‍या मनुष्यबळामुळे गुन्ह्यांना रोखणे आणि तपास लावणे अवघड होत आहे.

रेल्वेस्टेशन आणि रेल्वेत प्रवाशांची कायम गर्दी असते. रेल्वे प्रवाशांची दिवसेंदिवस गर्दी वाढत आहे, त्याबरोबर गुन्हेगारी घटनांतही वाढ होत आहे. परंतु त्या तुलनेत लोहमार्ग पोलीस ठाण्यातील कर्मचार्‍यांची संख्या, सोयी-सुविधा वाढत नाहीत. अवघ्या २० कर्मचार्‍यांवर लोहमार्ग पोलीस ठाण्याचा डोलारा उभा आहे. पूर्वी रेल्वे प्रवासात गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांची सुटकेस, बॅग व इतर सामान पळविण्याच्या घटना होत असत. परंतु या घटना कमी झाल्या आहेत. आजघडीला प्रत्येक व्यक्तीकडे स्मार्ट फोन असतो. त्यामुळे अवजड बॅग, सुटकेस पळविण्यापेक्षा मोबाईल पळविण्याकडे चोरट्याचा कल वाढत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. 

लोहमार्ग पोलीस ठाण्यात २०१२ मध्ये  ६५, २०१३ मध्ये ७८, २०१४ मध्ये ८२, २०१५ मध्ये १२०, २०१६ मध्ये १७६, तर २०१७ मध्ये तब्बल ४१५ गुन्ह्यांची नोंद झाली. गतवर्षी मोबाईल चोरीच्या २८५ घटना समोर आल्या. यातील २५ टक्के मोबाईल चोरीच्या घटनांचा तपास लागल्याचे सूत्रांनी सांगितले. तुलनेत ९४ बॅग चोरीचे प्रकार झाले. बॅग पळविणे अवघड जात असल्याने मोबाईल चोरीकडे चोरट्यांनी मोर्चा वळविल्याचे दिसते. अकस्मात मृत्यूच्या  ६४ घटना झाल्या.

कर्मचारी संख्या वाढवावीआकडेवारी पाहता गुन्ह्याच्या घटनेत वाढ झाली आहे. परंतु तरीही गुन्हेगारांवर आळा घालण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले जातात. कर्मचार्‍यांच्या संख्येत वाढ झाली तर त्यावर नियंत्रण आणण्यास मोठी मदत होईल. रेल्वेला बोगींची संख्या वाढली तर दारात बसून प्रवास करण्यातून निर्माण होणार्‍या घटनांनाही आळा बसेल.-दिलीप साबळे, निरीक्षक, लोहमार्ग पोलीस ठाणे

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद