बीड : जलयुक्त शिवार योजनेचे रणशिंग राज्यशासनाने फुंकले अन् २६ जानेवारीचा मुहुर्त धरून जिल्ह्यातील सर्वच आमदारांनी आपापल्या मतदार संघात जलयुक्तचा नारळ फोडला. आता याला दोन महिन्याचा कालावधी लोटला आहे. आज न उद्या जलयुक्त शिवार योजनेची कामे सुरू होतील असे ग्रामस्थांना वाटत होते. मात्र ज्या गावात आमदारांनी जलयुक्त योजनेचा नारळ फोडला ते गावच जलयुक्त शिवार योजनेत नसल्याचे बुधवारी समोर आले अन् गावकऱ्यांचा भ्रम निराश झाला.केज तालुक्यातील विडा येथे आमदार संगीता ठोंबरे यांनी जलयुक्त शिवार योजनेचे गावात २६ जानेवारीला मोठ्या थाटात उदघाटन करून विडा हे गाव जलयुक्त मध्ये निवडले असल्याचे घोषीत केले होते. गावात योजना येणार म्हणून ग्रामस्थही खुश होते. उदघाटन कार्यक्रमाच्या पुढे काहीच सुरू झाले नाही. योजने अंतर्गत सुरू करावयाची कामे आज सुरू होतील उद्या सुरू होतील म्हणत दोन महिन्याचा कालावधी लोटला. मात्र विडा गावात जलयुक्त शिवाराचे काम काही सुरू झाले नाही. आमदार व कृषी विभागाचे अधिकारी यांच्यातच समन्वय नसल्याने जलयुक्त शिवार योजनेचे काय होणार असा प्रश्न ग्रामस्थांसमोर आहे. (प्रतिनिधी)जलयुक्त शिवार योजने अंतर्गत जिल्ह्यात ३३३ गावे निवडण्यात आलेली आहेत. २६ जानेवारीला केज च्या आमदार संगीता ठोंबरे यांनी मतदार संघातील विडा येथे जलयुक्त शिवार योजनेचा नारळ फोडला खरा, पण हे गावच योजनेत नाही. यामुळे विडा येथील ग्रामस्थांनी आमदाराच्या विरोधात संताप व्यक्त केला आहे.केज तालुक्यातील विडा हे गाव जलयुक्त शिवार योजनेत आहे का याविषयी केज तालुका कृषी अधिकारी एस. बी. खंदारे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, विडा या गावचा जलयुक्त शिवार योजनेत पहिल्या यादीत समावेश नसल्याचे त्यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.
योजनेत समाविष्ट नसलेल्या गावात उद्घाटनाचा नारळ
By admin | Updated: March 26, 2015 00:57 IST