शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

औरंगाबादेत राष्ट्रवादी युवककडून अब्दुल सत्तारांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन, घरावर दगडफेक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2022 18:40 IST

औरंगाबादेत राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसने आक्रमक आंदोलन करत क्रांती चौक येथे सत्तार यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले.

औरंगाबाद: राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसकडून औरंगाबादेत कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात आक्रमक आंदोलन करण्यात आले. जाहीर माफी मागावी अशी मागणी करत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सत्तार यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे क्रांती चौकात दहन केले. तसेच काही कार्यकर्त्यांनी अब्दुल  सत्तार यांच्या हिमायतबाग येथील घरावर दगडफेक केली.

कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर खालच्या पातळीची टीका केल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. अब्दुल सत्तारांनी माफी मागावी अशी मागणी राष्ट्रवादीकडून होत आहे. दरम्यान, औरंगाबादेत राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसने आक्रमक आंदोलन करत क्रांती चौक येथे सत्तार यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले. यावेळी त्यांच्या प्रतिमेस जोडेमारो आंदोलन ही करण्यात आले. तसेच काही कार्यकर्त्यांनी सत्तार यांच्या हिमायतबाग येथील निवासस्थानावर दगडफेक केली.

सत्तारांचे आता सहन करणार नाही सिल्लोड येथील नागरिकांनी अब्दुल सत्तार यांचे खूप लाड केले. पण आता सहन होत नाही. मागेही त्यांनी जनतेला कुत्रा संबोधले होते. आता आपल्या बेताल वक्तव्याबाबत आधी खा. सुप्रिया सुळे यांची माफी मागावी. त्यानंतर महाराष्ट्रातील जनतेची माफी मागावी. जर त्यांनी माफी मागितली नाही तर ते औरंगाबादचे आहेत आणि आम्हीही येथेच आहोत असा इशारा राष्ट्रवादीचे प्रवक्ते निलेश राउत यांनी दिला.

काय म्हणाले होते अब्दुल सत्तार?विरोधकांकडून शिंदे गटातील आमदारांवर सतत खोके घेतल्याची टीका केली जाते. यावरुन अब्दुल सत्तार म्हणाले की, 'आमच्यावर खोके म्हणणाऱ्या लोकं भिकार## आहेत. यावेळी सुप्रिया सुळे यांच्याबद्दलही सत्तारांनी अशाच प्रकारचा उल्लेख केला. त्यांच्या या विधानामुळे राज्यातील राष्ट्रवादीचे समर्थक आक्रमक झाले असून, सत्तारांच्या माफीची मागणी करत आहेत.