शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

महत्वाची माहिती, २० रुपयांत दोन लाखांचा विमा तुम्ही काढला का? येथे करा अर्ज

By प्रशांत तेलवाडकर | Updated: June 10, 2023 17:50 IST

२० रुपयांत दोन लाखांचा विमा काढला जातो. तुम्हाला हे माहिती आहे का, नसेल तर पुढील माहिती आवश्यक वाचा.

छत्रपती संभाजीनगर : माणसाच्या जीवनाचे काही खरे राहिले नाही. रस्त्यात चालता चालता कधी कोणती दुर्घटना घडले, किंवा वाहनांचा अपघात होईल, हे कोणीच सांगू शकत नाही. अपघात झाल्यानंतर रुग्णाला होणारा भयंकर त्रास तर सोडाच रुग्णालयात येणारा खर्च ही डोंगराएवढा असतो. याचा सर्वांगीण विचार करुन प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना राबविली जात आहे. याद्वारे २० रुपयांत दोन लाखांचा विमा काढला जात आहे. तुम्हाला हे माहिती आहे का, नसेल तर पुढील माहिती आवश्यक वाचा.

काय आहे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ?दैनंदिन धावपळीच्या जीवनात आयुष्य महत्त्वाचे आहे. अनावधानाने अपघात झाल्यास अशा वेळी पूर्ण कुटुंबावर त्याचा परिणाम होतो. कुटुंबाची आर्थिक स्थिती खालवली असल्याने अशा वेळी प्रधानमंत्री सुरक्षा योजना आर्थिक मदतीसाठी धावून येते.

२० रुपयांत दोन लाखांचा विमाया योजनेचा विमा हप्ता केवळ २० रुपये असून विमाधारकाचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या वारसाला २ लाख रुपये अर्थसाह्य मिळते. अपघातात पूर्णतः अपंगत्व आल्यास २ लाख रुपये व आंशिक अपंगत्व आल्यास १ लाख रुपये मिळतात.

जिल्ह्यात ७.७३ लाख विमाधारक१) ५० लाख ४१ हजार एकूण बचत खातेधारक जिल्ह्यात आहेत.२) ३८ लाख ५५ हजार खातेधारक प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेसाठी पात्र आहेत.३) ७ लाख ७३ हजार खातेधारकांचा विमा काढण्यात आला आहे.

आपल्या बँकेत करा अर्जतुमचे बचत खाते ज्या बँकेत आहे. त्या बँकेत प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा अर्ज दाखल करावा. दरवर्षी या विम्याचे नूतनीकरण करावे लागते. दरवर्षी विम्यापोटी २० रुपये तुमच्या खात्यातून बँक ही कपात करेल.

अटी काय आहेत१) अपघात विमा न नोंदवलेले नागरिकांचा यात समावेश होतो.२) १८ ते ७० वयोगटातील सर्व व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतात.३) विमा काढणाऱ्या व्यक्तीचे त्या बँकेत बचत खाते असणे आवश्यक आहे.४) योजनेसाठी वार्षिक हप्ता २० रुपये असून तो दरवर्षी विमाधारकांच्या बँक खात्यातून आपोआप वर्ग होईल.५) हप्त्यासाठी आर्थिक वर्ष १ जून ते ३१ मे असणार आहे.

विमा आवश्य काढाप्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेद्वारे केंद्र सरकारने नागरिकांसाठी मोठे सुरक्षा कवच दिले आहे. वर्षाला २० रुपये तुम्हाला द्यावे लागणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी हा विमा काढावा.- मंगेश केदार, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादbankबँक