शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
2
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
3
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
4
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
5
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
6
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
7
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
8
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
9
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
10
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
11
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
12
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
13
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
14
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
15
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
16
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
17
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
18
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
19
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
20
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला

महत्वाची माहिती, २० रुपयांत दोन लाखांचा विमा तुम्ही काढला का? येथे करा अर्ज

By प्रशांत तेलवाडकर | Updated: June 10, 2023 17:50 IST

२० रुपयांत दोन लाखांचा विमा काढला जातो. तुम्हाला हे माहिती आहे का, नसेल तर पुढील माहिती आवश्यक वाचा.

छत्रपती संभाजीनगर : माणसाच्या जीवनाचे काही खरे राहिले नाही. रस्त्यात चालता चालता कधी कोणती दुर्घटना घडले, किंवा वाहनांचा अपघात होईल, हे कोणीच सांगू शकत नाही. अपघात झाल्यानंतर रुग्णाला होणारा भयंकर त्रास तर सोडाच रुग्णालयात येणारा खर्च ही डोंगराएवढा असतो. याचा सर्वांगीण विचार करुन प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना राबविली जात आहे. याद्वारे २० रुपयांत दोन लाखांचा विमा काढला जात आहे. तुम्हाला हे माहिती आहे का, नसेल तर पुढील माहिती आवश्यक वाचा.

काय आहे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ?दैनंदिन धावपळीच्या जीवनात आयुष्य महत्त्वाचे आहे. अनावधानाने अपघात झाल्यास अशा वेळी पूर्ण कुटुंबावर त्याचा परिणाम होतो. कुटुंबाची आर्थिक स्थिती खालवली असल्याने अशा वेळी प्रधानमंत्री सुरक्षा योजना आर्थिक मदतीसाठी धावून येते.

२० रुपयांत दोन लाखांचा विमाया योजनेचा विमा हप्ता केवळ २० रुपये असून विमाधारकाचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या वारसाला २ लाख रुपये अर्थसाह्य मिळते. अपघातात पूर्णतः अपंगत्व आल्यास २ लाख रुपये व आंशिक अपंगत्व आल्यास १ लाख रुपये मिळतात.

जिल्ह्यात ७.७३ लाख विमाधारक१) ५० लाख ४१ हजार एकूण बचत खातेधारक जिल्ह्यात आहेत.२) ३८ लाख ५५ हजार खातेधारक प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेसाठी पात्र आहेत.३) ७ लाख ७३ हजार खातेधारकांचा विमा काढण्यात आला आहे.

आपल्या बँकेत करा अर्जतुमचे बचत खाते ज्या बँकेत आहे. त्या बँकेत प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा अर्ज दाखल करावा. दरवर्षी या विम्याचे नूतनीकरण करावे लागते. दरवर्षी विम्यापोटी २० रुपये तुमच्या खात्यातून बँक ही कपात करेल.

अटी काय आहेत१) अपघात विमा न नोंदवलेले नागरिकांचा यात समावेश होतो.२) १८ ते ७० वयोगटातील सर्व व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतात.३) विमा काढणाऱ्या व्यक्तीचे त्या बँकेत बचत खाते असणे आवश्यक आहे.४) योजनेसाठी वार्षिक हप्ता २० रुपये असून तो दरवर्षी विमाधारकांच्या बँक खात्यातून आपोआप वर्ग होईल.५) हप्त्यासाठी आर्थिक वर्ष १ जून ते ३१ मे असणार आहे.

विमा आवश्य काढाप्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेद्वारे केंद्र सरकारने नागरिकांसाठी मोठे सुरक्षा कवच दिले आहे. वर्षाला २० रुपये तुम्हाला द्यावे लागणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी हा विमा काढावा.- मंगेश केदार, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादbankबँक