शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज ठाकरे यांच्याकडून तुतारी गटाने आदर्श घ्यायला हरकत नाही, जर...!" राष्ट्रवादीच्या आमदाराची खुली ऑफर
2
"ती शिवसेनेकडून झालेली मोठी चूक..., राज ठाकरे अध्यक्ष झाले असते, तर आज शिवसेनेचे दोन तुकडे झाले नसते!"
3
कर्नाटकचे माजी डीजीपी ओम प्रकाश यांची निर्घृण हत्या; पत्नीवर संशय, कारण काय..?
4
काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली; भाजपा प्रवेशाची तारीखही सांगितली
5
'INDIA आघाडी कायम राहणार; आगामी निवडणुका एकत्र लढू', अखिलेश यादवांचे सूचक विधान
6
चालताना छत्रीचा धक्का लागल्याने गर्दुल्ल्याचा महिलेवर हल्ला, वरळी सी फेसजवळील घटना
7
IPL 2025 PBKS vs RCB : किंग कोहलीचं विक्रमी अर्धशतक! पंजाबला पराभूत करत आरसीबीनं मारला 'पंजा'
8
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण; चिठ्ठी सापडली..आत्महत्येचे कारण आलं समोर?
9
“राज यांच्यासोबत जाताना उद्धव ठाकरे काँग्रेस-शरद पवार गटाला सोडणार का?”; शिंदेसेनेचा सवाल
10
डेपोर्टेशन, ट्रेड डील...या विषयांवर चर्चा होणार का? जेडी व्हेन्सच्या दौऱ्यापूर्वी काँग्रेसचे सरकारला प्रश्न
11
“भाषा सक्तीबाबत निर्माण झालेला मराठी-हिंदी वाद निरर्थक, महायुती सरकारने...”: दीपक केसरकर
12
महिलांशी अवैध संबंध, हुंड्यासाठी छळ आणि मारहाण; अमित मिश्राच्या पत्नीचे खळबळजनक आरोप
13
वक्फ कायद्याविरोधात AIMPLB चा 'ब्लॅकआउट' प्लॅन...; हैदराबादमध्ये मुस्लीम नेते-धर्मगुरू एकवटले, ओवेसी म्हणाले आम्ही...!
14
जेनसोलच्या पुण्यातील प्लाँटमध्ये एनएसईचा अधिकारी पोहोचला; होते फक्त तीन मजूर, परिस्थिती पाहून...
15
१ मेपासून फास्टॅग फाडून टाकणार? सॅटेलाईटवर टोल कापला जाणार; NHAI पहा काय म्हणतेय...
16
Video : दोन्ही फलंदाज नॉन स्ट्राइक एन्डला! Run Out चा डाव साधल्यावर कोहलीनं 'गॉगल' काढला, अन्...
17
राज ठाकरेंशी युती करण्याची चर्चा ठाकरे गट शिवतीर्थावर जाऊन करणार का? संजय राऊत म्हणाले...
18
'हलक्यात घेऊ शकत नाही' चेन्नईविरुद्धच्या सामन्याआधी रोहितचा मुंबईला इशारा, धोनीबाबत म्हणाला...
19
मोदी-नितीश फक्त सत्तेसाठी एकत्र; मल्लिकार्जुन खरगेंचा BJP-JDU युतीवर निशाणा
20
“हिंदीची सक्ती नकोच”; मनसेची थेट RSSकडे धाव, मोहन भागवतांना खुले पत्र, नेमकी काय मागणी केली?

पितृपक्षात मोहाच्या पत्रावळीस महत्व; छत्रपती संभाजीनगरात रोज २५ हजार पत्रावळींची विक्री

By प्रशांत तेलवाडकर | Updated: October 6, 2023 16:54 IST

मोहाची झाडे फुलंब्री तालुक्यात मोठ्या प्रमाणात आहेत. यामुळे पक्ष पंधरवड्यात शेकडो महिलांना हंगामी रोजगार मिळतो.

छत्रपती संभाजीनगर : सध्या पितृपक्ष सुरू असून,या काळात पूर्वजांच्या नावे श्राद्ध केले जाते, ज्यामुळे त्यांच्या आत्म्याला शांती मिळते, असे मानले जाते. यासाठी पिंडदान केले जाते. हे पिंड ठेवण्यासाठी सोने-चांदी-स्टीलचे ताट किंवा केळीची पाने लागत नाहीत, तर चक्क मोहाच्या झाडाच्या पानापासून तयार केलेल्या पत्रावळीचा वापर केला जाते. यामुळे मोहाच्या पत्रावळीला मागणी वाढली असून, शहरात दररोज २५ हजारांपेक्षा अधिक पत्रावळी विकल्या जात आहेत.

जिल्ह्यात मोहाची झाडे फुलंब्री तालुक्यात मोठ्या प्रमाणात आहेत. यामुळे पक्ष पंधरवड्यात शेकडो महिलांना हंगामी रोजगार मिळतो. याच तालुक्यातून शहरात दररोज २५ ते ३० हजार पत्रावळी विक्रीसाठी आणल्या जातात. सुपारी हनुमान रोड, गारखेड्यातील गजानन महाराज मंदिर चौक, टीव्ही सेंटर चौक येथे पत्रावळी विक्रेते बसतात. पूर्वजांना जेऊ घातले जात असले तरी त्यातून अनेकांना हंगामी रोजगार मिळतो, हे विशेष.

मोहाची पत्रावळी व द्रोण २० रुपयांतमोहाच्या पत्रावळी याच पितृपक्ष पंधरवड्यात दिसून येतात. त्यानंतर वर्षभर या पत्रावळ्या दिसतही नाहीत. मागील वर्षी १० रुपयांना मिळणारी पत्रावळी सध्या १५ रुपयांना एक नग मिळत आहे. त्यासोबत एक द्रोण ५ रुपयांना म्हणजे पत्रावळी व द्रोण २० रुपयात विकले जात आहे. कोरोनाआधी मोहाची पत्रावळी ५ रुपयांना एक मिळत असे, अशी माहिती होलसेल विक्रेते एकनाथ काथार यांनी दिली.

मोहाची पत्रावळीच का?धर्मशास्त्रात पितरांच्या भोजनाला पात्र कसे असावे? पितळ, कास्य, लोह (स्टील) यांचे ताट श्राद्धाला निषिद्ध मानलेले आहे. कास्य, पितळाच्या ताटात पितर जेऊ घालू नयेत. कन्या राशीत सूर्य असतो तेव्हा पितृपक्ष सुरू होतो. अशा वेळेस केळीच्या पानांचाही ‘निषेध’ सांगितलेला आहे. यामुळे मोहाच्या पानाची पत्रावळी चालते.- वेदमूर्ती सुरेश केदारे गुरुजी.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादspiritualअध्यात्मिक