शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

बालकामगार कायद्यांची अंमलबजावणी कासवगतीने; उद्योग, व्यवसायात बालकामगारांचा होतो सर्रास वापर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 19:45 IST

आदेशाची अंमलबजावणीच होत नसल्याने विविध व्यवसायात आणि उद्योगांत बालकामगारांचा सर्रास वापर सुरू असल्याचे चित्र आहे. 

ठळक मुद्देदरवर्षी १२ जून हा जागतिक बालकामगारविरोधी दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

औरंगाबाद : विविध व्यवसायांत, उद्योगांत काम करणाऱ्या बालकामगारांची मुक्तता करण्याचा कायदा अस्तित्वात आला. त्याबाबत शासनाने आदेश देऊन ज्या उद्योगांत किंवा व्यवसायात बालकामगार ठेवलेले आढळतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यास सांगितले; परंतु आदेशाची अंमलबजावणीच होत नसल्याने विविध व्यवसायात आणि उद्योगांत बालकामगारांचा सर्रास वापर सुरू असल्याचे चित्र आहे. 

दरवर्षी १२ जून हा जागतिक बालकामगारविरोधी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. काही दिवसांपूर्वीच केंद्रीय श्रम-रोजगार मंत्रालयाच्या राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पांतर्गत विविध ठिकाणी काम करणाऱ्या बालकामगारांचे सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले. या सर्वेक्षणासाठी प्रगणक, समन्वयक व स्थानिक सेवाभावी संस्थांचे पथक तयार करण्यात आले. यात हॉटेल, विविध कार्यालय व औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या बालकामगारांचा शोध घेण्यात आला. २ ते ४ जून अवघ्या तीन दिवसांत केलेल्या सर्वेक्षणात वाळूज, पंढरपूर, विटावा, जोगेश्वरी, रांजणगाव, कमळापूर आदी भागात तब्बल ६५० बालकामगार काम करीत असल्याचे आढळून आले. ही केवळ एकट्या वाळूज महानगर परिसरातील परिस्थिती आहे.

औरंगाबाद शहरात हॉटेल्स, लघुउद्योग तसेच अन्य ठिकाणी कोवळी मुले सर्रास राबताना दिसतात. धोकादायक ठिकाणी, गॅरेज, वेल्डिंग सेंटर्सवरही बालकामगार काम करतात. जवळपास १५०० बालकामगार शहरात काम करीत असल्याचा दावा बालकामगारांच्या मुक्ततेसाठी काम करणाऱ्या संस्थांनी केला आहे. कायदा करून त्याची कठोर अंमलबजावणी होत नसल्याने बालमजुरीच्या विळख्यात मुले अडकत आहेत,अशी ओरड होते.

२ वर्षांपर्यंत कारावासाची तरतूदबालकामगारांना मुक्त करण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्नशील आहे. बाल व किशोरवयीन कामगार (प्रतिबंध व नियमन) १९८६ च्या सुधारित कायद्यानुसार १४ वर्षांखालील बालक आणि १४ ते १८ वयोगटातील किशोरवयीन मुलांना धोकादायक उद्योगात कामावर ठेवणे गुन्हा आहे. याबाबत २० हजार ते ५० हजार रुपये आणि किमान ६ महिने ते २ वर्षे कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे बालकामगारांना कामावर ठेवू नये,अशी माहिती सहायक कामगार आयुक्त यू. स. पडियाल यांनी दिली.

शिक्षणाचा खर्च करावाकायद्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने बालकामगार आढळून येत आहेत. ज्या उद्योगात, व्यवसायाच्या ठिकाणी बालकामगार आढळतात, त्यांनी त्या बालकांच्या शिक्षणाचा खर्च उचलला पाहिजे. त्यातून ही मुले सक्षम होतील.-संजय मिसाळ, अध्यक्ष, बहुजन जाती-जमाती कामगार सेवाभावी संस्था

टॅग्स :GovernmentसरकारMIDCएमआयडीसीbusinessव्यवसाय