शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

बालकामगार कायद्यांची अंमलबजावणी कासवगतीने; उद्योग, व्यवसायात बालकामगारांचा होतो सर्रास वापर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 19:45 IST

आदेशाची अंमलबजावणीच होत नसल्याने विविध व्यवसायात आणि उद्योगांत बालकामगारांचा सर्रास वापर सुरू असल्याचे चित्र आहे. 

ठळक मुद्देदरवर्षी १२ जून हा जागतिक बालकामगारविरोधी दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

औरंगाबाद : विविध व्यवसायांत, उद्योगांत काम करणाऱ्या बालकामगारांची मुक्तता करण्याचा कायदा अस्तित्वात आला. त्याबाबत शासनाने आदेश देऊन ज्या उद्योगांत किंवा व्यवसायात बालकामगार ठेवलेले आढळतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यास सांगितले; परंतु आदेशाची अंमलबजावणीच होत नसल्याने विविध व्यवसायात आणि उद्योगांत बालकामगारांचा सर्रास वापर सुरू असल्याचे चित्र आहे. 

दरवर्षी १२ जून हा जागतिक बालकामगारविरोधी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. काही दिवसांपूर्वीच केंद्रीय श्रम-रोजगार मंत्रालयाच्या राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पांतर्गत विविध ठिकाणी काम करणाऱ्या बालकामगारांचे सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले. या सर्वेक्षणासाठी प्रगणक, समन्वयक व स्थानिक सेवाभावी संस्थांचे पथक तयार करण्यात आले. यात हॉटेल, विविध कार्यालय व औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या बालकामगारांचा शोध घेण्यात आला. २ ते ४ जून अवघ्या तीन दिवसांत केलेल्या सर्वेक्षणात वाळूज, पंढरपूर, विटावा, जोगेश्वरी, रांजणगाव, कमळापूर आदी भागात तब्बल ६५० बालकामगार काम करीत असल्याचे आढळून आले. ही केवळ एकट्या वाळूज महानगर परिसरातील परिस्थिती आहे.

औरंगाबाद शहरात हॉटेल्स, लघुउद्योग तसेच अन्य ठिकाणी कोवळी मुले सर्रास राबताना दिसतात. धोकादायक ठिकाणी, गॅरेज, वेल्डिंग सेंटर्सवरही बालकामगार काम करतात. जवळपास १५०० बालकामगार शहरात काम करीत असल्याचा दावा बालकामगारांच्या मुक्ततेसाठी काम करणाऱ्या संस्थांनी केला आहे. कायदा करून त्याची कठोर अंमलबजावणी होत नसल्याने बालमजुरीच्या विळख्यात मुले अडकत आहेत,अशी ओरड होते.

२ वर्षांपर्यंत कारावासाची तरतूदबालकामगारांना मुक्त करण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्नशील आहे. बाल व किशोरवयीन कामगार (प्रतिबंध व नियमन) १९८६ च्या सुधारित कायद्यानुसार १४ वर्षांखालील बालक आणि १४ ते १८ वयोगटातील किशोरवयीन मुलांना धोकादायक उद्योगात कामावर ठेवणे गुन्हा आहे. याबाबत २० हजार ते ५० हजार रुपये आणि किमान ६ महिने ते २ वर्षे कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे बालकामगारांना कामावर ठेवू नये,अशी माहिती सहायक कामगार आयुक्त यू. स. पडियाल यांनी दिली.

शिक्षणाचा खर्च करावाकायद्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने बालकामगार आढळून येत आहेत. ज्या उद्योगात, व्यवसायाच्या ठिकाणी बालकामगार आढळतात, त्यांनी त्या बालकांच्या शिक्षणाचा खर्च उचलला पाहिजे. त्यातून ही मुले सक्षम होतील.-संजय मिसाळ, अध्यक्ष, बहुजन जाती-जमाती कामगार सेवाभावी संस्था

टॅग्स :GovernmentसरकारMIDCएमआयडीसीbusinessव्यवसाय