शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
2
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
3
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
4
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
5
लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
7
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
8
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
9
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
10
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
11
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
12
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
13
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
15
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
16
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
17
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
18
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
19
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
20
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा

बालकामगार कायद्यांची अंमलबजावणी कासवगतीने; उद्योग, व्यवसायात बालकामगारांचा होतो सर्रास वापर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 19:45 IST

आदेशाची अंमलबजावणीच होत नसल्याने विविध व्यवसायात आणि उद्योगांत बालकामगारांचा सर्रास वापर सुरू असल्याचे चित्र आहे. 

ठळक मुद्देदरवर्षी १२ जून हा जागतिक बालकामगारविरोधी दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

औरंगाबाद : विविध व्यवसायांत, उद्योगांत काम करणाऱ्या बालकामगारांची मुक्तता करण्याचा कायदा अस्तित्वात आला. त्याबाबत शासनाने आदेश देऊन ज्या उद्योगांत किंवा व्यवसायात बालकामगार ठेवलेले आढळतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यास सांगितले; परंतु आदेशाची अंमलबजावणीच होत नसल्याने विविध व्यवसायात आणि उद्योगांत बालकामगारांचा सर्रास वापर सुरू असल्याचे चित्र आहे. 

दरवर्षी १२ जून हा जागतिक बालकामगारविरोधी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. काही दिवसांपूर्वीच केंद्रीय श्रम-रोजगार मंत्रालयाच्या राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पांतर्गत विविध ठिकाणी काम करणाऱ्या बालकामगारांचे सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले. या सर्वेक्षणासाठी प्रगणक, समन्वयक व स्थानिक सेवाभावी संस्थांचे पथक तयार करण्यात आले. यात हॉटेल, विविध कार्यालय व औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या बालकामगारांचा शोध घेण्यात आला. २ ते ४ जून अवघ्या तीन दिवसांत केलेल्या सर्वेक्षणात वाळूज, पंढरपूर, विटावा, जोगेश्वरी, रांजणगाव, कमळापूर आदी भागात तब्बल ६५० बालकामगार काम करीत असल्याचे आढळून आले. ही केवळ एकट्या वाळूज महानगर परिसरातील परिस्थिती आहे.

औरंगाबाद शहरात हॉटेल्स, लघुउद्योग तसेच अन्य ठिकाणी कोवळी मुले सर्रास राबताना दिसतात. धोकादायक ठिकाणी, गॅरेज, वेल्डिंग सेंटर्सवरही बालकामगार काम करतात. जवळपास १५०० बालकामगार शहरात काम करीत असल्याचा दावा बालकामगारांच्या मुक्ततेसाठी काम करणाऱ्या संस्थांनी केला आहे. कायदा करून त्याची कठोर अंमलबजावणी होत नसल्याने बालमजुरीच्या विळख्यात मुले अडकत आहेत,अशी ओरड होते.

२ वर्षांपर्यंत कारावासाची तरतूदबालकामगारांना मुक्त करण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्नशील आहे. बाल व किशोरवयीन कामगार (प्रतिबंध व नियमन) १९८६ च्या सुधारित कायद्यानुसार १४ वर्षांखालील बालक आणि १४ ते १८ वयोगटातील किशोरवयीन मुलांना धोकादायक उद्योगात कामावर ठेवणे गुन्हा आहे. याबाबत २० हजार ते ५० हजार रुपये आणि किमान ६ महिने ते २ वर्षे कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे बालकामगारांना कामावर ठेवू नये,अशी माहिती सहायक कामगार आयुक्त यू. स. पडियाल यांनी दिली.

शिक्षणाचा खर्च करावाकायद्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने बालकामगार आढळून येत आहेत. ज्या उद्योगात, व्यवसायाच्या ठिकाणी बालकामगार आढळतात, त्यांनी त्या बालकांच्या शिक्षणाचा खर्च उचलला पाहिजे. त्यातून ही मुले सक्षम होतील.-संजय मिसाळ, अध्यक्ष, बहुजन जाती-जमाती कामगार सेवाभावी संस्था

टॅग्स :GovernmentसरकारMIDCएमआयडीसीbusinessव्यवसाय