शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

मराठवाड्यातील बोंड अळीच्या प्रादुर्भावाचे तातडीने पंचनामे करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 00:13 IST

मराठवाड्यातील कापसावर बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे व धान्य पिकांवरील तुडतुडे रोगामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे आदेश शासनाने विभागीय पातळीवर दिले आहेत.

ठळक मुद्देनुकसान किती झाले १० दिवसांत अहवाल करावा लागणार

औरंगाबाद : मराठवाड्यातील कापसावर बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे व धान्य पिकांवरील तुडतुडे रोगामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे आदेश शासनाने विभागीय पातळीवर दिले आहेत. याप्रकरणी शासनाने सर्व प्रशासकीय विभागांना आदेश जारी केले आहेत. मराठवाड्यात अंदाजे १६ लाख ४८ हजार ५३८ हेक्टरवर कापूस पेरला गेला. त्यातील किती टक्के पिकांचा बोंड अळीने फडशा पाडला, ते पंचनाम्याअंती समोर येईल.

२०१७ च्या हंगामामध्ये कापसावर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे नुकसान झालेल्या बाधित शेतकºयांना मदतीची मागणी करण्यात येत आहे. या नैसर्गिक आपत्तीमध्ये कीड हल्ल्याचा समावेश आहे. ५ डिसेंबर रोजी मंत्रिमंडळ बैठकीत पंचनामे करण्याचा निर्णय झाला आहे. वस्तुस्थिती विचारात घेतल्यानंतर यंदाच्या खरीप हंगामामध्ये कापूस व धान्य पिकांवर बोंड अळी व तुडतुडे रोग पडला. या पिकांचे काय नुकसान झाले त्याचे पंचनामे १० दिवसांत करण्यात यावेत. पंचनामे करीत असताना नुकसानग्रस्त शेतीचे जीपीएस इनेबल्ड फोटो मोबाईल अ‍ॅपच्या साह्याने काढण्यात यावेत. त्यामुळे कीड पडल्याचा दावा ग्राह्य धरण्यात येईल. नुकसान ठरविण्यासाठी पिकांची नोंद ७/१२ मध्ये असणे आवश्यक असेल. पंचनामे झाल्यानंतर ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या पिकांच्या बाबतीत बाधित शेतक-यांना मदत देण्याबाबत सविस्तर प्रस्ताव शासनाकडे सादर करावा लागणार आहे.

मराठवाड्यात १६ लाख हेक्टरवर पेरणीमराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत अंदाजे १६ लाख हेक्टरवर कापसाची पेरणी झाली. त्यामध्ये औरंगाबादमध्ये साडेचार लाख हेक्टर, जालन्यात २ लाख ७९ हजार हेक्टर, बीडमध्ये ३ लाख ६१ हजार हेक्टर, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यांत ६ लाख हेक्टरवर कापसाची पेरणी झाली होती.

टॅग्स :cottonकापूस