शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

‘आयएमडी’ने मान्सूनपूर्व पावसालाच म्हटले मान्सून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 12:16 IST

भारतीय हवामानशास्त्र विभागाचा (आयएमडी) यंदा अंदाज चुकला असून, मान्सूनपूर्व पावसालाच या विभागाने मान्सून पाऊस ठरविण्याचा प्रयत्न केला; परंतु अद्यापही मान्सून सक्रिय झालेला नाही. त्यामुळे मान्सून ‘ब्रेक’ जाहीर करण्याची वेळ हवामान विभागावर आली.

ठळक मुद्देजून महिन्याच्या गेल्या १७ दिवसांत राज्यात आठवडाभरापेक्षाही पाऊस झालेला नाही.

औरंगाबाद : भारतीय हवामानशास्त्र विभागाचा (आयएमडी) यंदा अंदाज चुकला असून, मान्सूनपूर्व पावसालाच या विभागाने मान्सून पाऊस ठरविण्याचा प्रयत्न केला; परंतु अद्यापही मान्सून सक्रिय झालेला नाही. त्यामुळे मान्सून ‘ब्रेक’ जाहीर करण्याची वेळ हवामान विभागावर आली. प्रत्यक्षात जुलैच्या पहिल्या अथवा दुसऱ्या आठवड्यात मान्सून सक्रिय होणार असल्याचे हवामानतज्ज्ञांचे म्हणणे आहे.

जून महिन्याच्या गेल्या १७ दिवसांत राज्यात आठवडाभरापेक्षाही पाऊस झालेला नाही. औरंगाबाद जिल्ह्यामध्ये तर जूनच्या पहिले दोन दिवसच पावसाने चांगली हजेरी लावली. हवामान विभागाच्या अंदाजानुसार जर केरळमधील आठ केंद्रांवर २.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली, तर मान्सूनचे आगमन होते. दरवर्षी १० मे नंतर दक्षिणेतील मिनिकॉय, अमिनी, तिरुअनंतपुरम, पुनालूर, कोल्लम, अल्लापुझा, कोट्यम, कोची, त्रिसूर, कोझिकोडे, थालासेरी, कन्नुर, कुडुलू आणि मंगलोर या वेधशाळांच्या क्षेत्रापैकी किमान आठ ठिकाणी सलग दोन दिवस २.५ मि.मी. किंवा त्याहून अधिक पाऊस पडल्यास केरळमध्ये मान्सूनचे आगमन झाले, असे जाहीर केले जाते; परंतु यंदा सागर आणि मेकुणू या दोन वादळांच्या प्रभावाने केरळला जोरदार पाऊस झाला.

या पावसामुळे मान्सून आल्याची घोषणा हवामान विभागाने केली. वास्तविक राज्यात मान्सून आलेला नाही, असे भौतिकशास्त्रज्ञ, हवामान अभ्यासक किरणकुमार जोहरे यांनी सांगितले. मान्सूनच्या पावसात वीज आणि गडगडाट नसतो. ढगांचे पुंजकेदेखील दिसत नाहीत. पाऊस संततधार पडतो. मान्सूनचा पाऊस सुरू झाल्यानंतर आभाळ काळ्या ढगांनी गच्च भरून येते. पावसाची सतत रिपरिप सुरू होते. मध्ये ऊनही पडत नाही. या सगळ्या गोष्टी सध्या दिसत नाहीत,असेही जोहरे यांनी सांगितले.

भाकीत खरे ठरेनाहवामान विभागाकडे अत्याधुनिक यंत्रणा आहे. परंतु तरीही भाकीत खरे ठरत नाही, अशी परिस्थिती आहे. अंदाज व्यक्त करताना हवामान खात्याने अशी माहिती दिली, असे सांगितले जाते. परंतु प्रत्यक्ष माहिती देण्यासाठी अधिकारी आणि त्यांची जबाबदारी निश्चित केली पाहिजे. पाऊस कधी पडेल, हे अभ्यासकांना कळते; परंतु हवामान विभागाला कळत नसल्याची स्थिती आहे. दोन दिवसांत दक्षिण महाराष्ट्रात मान्सून सक्रिय होईल.- श्रीनिवास औंधक र, संचालक , खगोलशास्त्र विभाग, एमजीएम, औरंगाबाद

जुलैच्या पहिल्या किंवा दुस-या आठवड्यात मान्सून‘आयएमडी’ने पूर्वमान्सूनलाच मान्सूनचा पाऊस म्हटले; परंतु जुलैच्या पहिल्या किंवा दुस-या आठवड्यात महाराष्ट्रात मान्सून सक्रिय होण्याची चिन्हे आहेत. गेली काही दिवस पडलेला पाऊस हा मान्सूनपूर्वच आहे. नाईलाजाने मान्सून ब्रेक जाहीर करण्याची वेळ हवामान खात्यावर आली आहे. मराठवाड्यात यंदा जवळपास ८५ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज आहे.- किरणकुमार जोहरे, भौतिकशास्त्रज्ञ, हवामान अभ्यासक

टॅग्स :monsoon 2018मान्सून 2018weatherहवामान