शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

आगीच्या घटनेनंतरही रेल्वेचे सुरक्षेकडे दुर्लक्ष

By admin | Updated: October 28, 2014 01:02 IST

औरंगाबाद : नांदेड-मनमाड पॅसेंजरच्या बोगीला लागलेल्या आगीच्या घटनेनंतर रेल्वेस्थानकावर सुरक्षेच्या दृष्टीने अधिक लक्ष दिले जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती;

औरंगाबाद : नांदेड-मनमाड पॅसेंजरच्या बोगीला लागलेल्या आगीच्या घटनेनंतर रेल्वेस्थानकावर सुरक्षेच्या दृष्टीने अधिक लक्ष दिले जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती; परंतु प्रत्यक्षात रेल्वेस्थानकावर धूम्रपान करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई आणि अग्निशमन साधनांची अवस्था पाहता रेल्वे प्रशासन प्रवाशांच्या सुरक्षिततेविषयी किती बेफिकीर आहे, हे दिसून येत आहे.आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी असे प्रकार टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने दक्ष राहण्याची आवश्यकता आहे; परंतु अनेक रेल्वेगाड्यांबरोबर रेल्वेस्थानकावर अग्निशमन साधनांची अवस्था पाहता प्रवाशांच्या सुरक्षेविषयी रेल्वेला अनास्था असल्याचे दिसत आहे. आगीवर नियंत्रणासाठी आग विझविणारी साधने, वाळूची बादली महत्त्वाची ठरू शकते; परंतु रेल्वेस्थानकावरील आग विझविणारी साधने तोकडी पडत असल्याचे दिसते. वाळूच्या बादलीचा वापर कचरा टाकण्याची आणि पान, तंबाखू खाणाऱ्यांसाठी थुंकण्याची जागा बनल्याचे चित्र दिसून येत आहे. अशा स्थितीमुळे अन्य एखाद्या आगीच्या घटनेनंतर अग्निशमन दल येईपर्यंत या बादलीचा काहीही उपयोग होणार नाही. यामुळे एखाद्या ठिणगीचे आगीत रूपांतर होण्यास हातभारच मिळत असल्याची परिस्थिती पाहायला मिळत आहे. रेल्वेस्थानकावर सोमवारी विविध रेल्वे गाड्यांमध्ये पाहणी करताना पोलीस कर्मचारी दिसून आले. त्यामुळे पोलीस प्रशासन सुरक्षेच्या दृष्टीने दक्ष असल्याचे दिसून आले. याविषयी रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकला नाही.धूम्रपान करणाऱ्यांवर करडी नजररेल्वे बोगीला आग लागलेल्या घटनेनंतर धूम्रपान करण्यावर करडी नजर असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. दुपारपर्यंत एका व्यक्तीवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. रेल्वे तिकिटांची तपासणी करण्याबरोबर धूम्रपान करणाऱ्यावर नजर ठेवली जात आहे. थेट रेल्वे बोगीत धूम्रपान करणाऱ्यांवर कारवाईचे प्रमाण मात्र अल्प असल्याचे चित्र दिसून येते.मॉडेल रेल्वेस्थानक म्हणून नावारूपास येणाऱ्या औरंगाबाद रेल्वेस्थानकावर मेटल डिटेक्टरची अवस्था विचित्र दिसून येते. प्रवासी त्यातूनच येईल, असे कोणतेही नियोजन करण्यात आलेले नाही. ४रेल्वे प्रवाशांकडील सामानाच्या तपासणीसाठीही कोणती यंत्रणा नाही. त्यामुळे दक्षिण मध्य रेल्वेचा सुरक्षेकडे कानाडोळा होत असल्याचेच दिसत आहे.