शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
2
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
3
"राज ठाकरेंचं मराठीवर नाही तर राजकारणावर प्रेम", काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
4
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झाली? 'या' एका नंबरवर कॉल करा, तुमचे पैसे परत मिळतील!
5
धुळे हादरले! मित्रांनी घरातून नेलं, गाडीत बसवले अन् कन्नड घाटात नेऊन घातल्या गोळ्या
6
'चला हवा येऊ द्या'मध्ये अभिजीत खांडकेकरने रिप्लेस केल्यावर निलेश साबळेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
7
सूडाची भावना! उधार दिलेले पैसे मागितले म्हणून थेट पेटवून दिलं घर; थरकाप उडवणारा Video
8
PC Jewellers Share Price: कर्जमुक्त होणार ही ज्वेलरी कंपनी, शेअरमध्ये १६ टक्क्यांची तुफान तेजी; गुंतवणूकदार सुखावले, तुमच्याकडे आहे का?
9
'पाकिस्तानात ९ नाही, २१ दहशतवादी अड्डे...', ऑपरेशन सिंदूरबाबत उपसेनाप्रमुखांचा मोठा खुलासा
10
“कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, दोघे भाऊ एकत्र येत असतील तर...”: सुप्रिया सुळे
11
UIDAI चा मोठा निर्णय! 'या' चुका केल्यास तुमचं आधार कार्ड रद्द होईल, आताच तपासा!
12
मराठ्यांचा इतिहास लोकांपर्यंत पुरेसा पोहचला नाही, इंग्रजांसह स्वकीयही जबाबदार- मुख्यमंत्री फडणवीस
13
"मी मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा.…’’, प्रसिद्ध व्यावसायिकाने राज ठाकरेंना डिवचले  
14
“कोकणच्या हिताचे चांगले काम करा, टीकेत अडकून राहू नका”; भास्कर जाधवांचा योगेश कदमांना सल्ला
15
Maharashtran Rains: दक्षिण मध्य महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता 
16
तेजीनंतर पुन्हा सोन्या-चांदीच्या दरात घसरण, तरीही चांदी १.१० लाखांच्या पार; खरेदीपूर्वी पाहा नवे दर
17
PM मोदींना त्रिनिदादमध्ये सोहरीच्या पानावर वाढलं गेलं जेवण; भारताशी कनेक्शन अन् फायदे काय?
18
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
19
IND vs ENG: बॅटने कहर केल्यानंतर आता बॉलने इतिहास रचण्याची संधी, जाडेजाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष!
20
तब्बल ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी घेतला ‘ST पास थेट शाळेत’ योजनेचा लाभ: प्रताप सरनाईक

देशभक्तीच्या ज्वरात जगण्याच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष : सुरेंद्र जोंधळे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 19:07 IST

सध्या देशभक्तीच्या ज्वरात नागरिक आकंठ बुडाले आहेत.

औरंगाबाद : नागरिक स्वतंत्रपणे विचार करीत स्वविवेक जागृत ठेवून जोपर्यंत निवडणुकांमध्ये सहभागी होत नाहीत. तोपर्यंत सक्षम आणि खरीखुरी लोकशाही अस्तित्वात येणार नाही. सध्या देशभक्तीच्या ज्वरात नागरिक आकंठ बुडाले आहेत. त्यामुळे जगणे, नागरी प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत मुंबईतील राज्यशास्त्राचे अभ्यासक डॉ. सुरेंद्र जोंधळे यांनी व्यक्त केली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील राज्यशास्त्र विभागातर्फे ‘निवडणुका आणि भारतीय लोकशाही’ या विषयावर दोनदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन केले आहे. याचे उद्घाटन प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांच्या हस्ते करण्यात आले. व्यासपीठावर डॉ. सुरेंद्र जोंधळे, विभागप्रमुख डॉ. प्रशांत आमृतकर, डॉ. शुजा शाकीर उपस्थित होते. यावेळी डॉ. जोंधळे यांचे बीजभाषण झाले. लोकशाहीत लोकसहभागाला खूप महत्त्व असते.

जनकल्याणकारी राज्य ही संकल्पना घेऊन सत्तेवर येणारी सरकारे जाऊन आता फक्त कार्यकारी सरकारे सत्तेवर येत आहेत. आज देशात ज्या पायांवर लोकशाहीचा डोलारा उभा आहे. अशा संस्था धोक्यात आणण्याचे काम जाणीवपूर्वक घडवून आणले जात आहे. लोकशाहीत निवडणुका महत्त्वाच्या असतात. याच माध्यमातून सत्ताबदल होतात. सद्य:स्थितीत राष्ट्रीय पक्षसुद्धा जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करून निवडणुका लढवताना दिसत आहेत. हे धोक्याचे लक्षण असल्याचेही डॉ. जोंधळे यांनी सांगितले. 

अध्यक्षीय समारोप डॉ. अशोक तेजनकर यांनी केला. प्रास्ताविक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. शुजा शाकीर यांनी केले, तर आभार प्रा. मुख्तार शेख यांनी मानले. उद्घाटनानंतर ‘निवडणुका सुधारणा’ यावर पहिले सत्र पार पडले. यात अध्यक्ष म्हणून प्रा. मृदुल निळे, तर प्रा. साकेत आंबेरखान यांनी सहभाग नोंदवला. दुसरे सत्र ‘प्रसारमाध्यमे आणि राजकारण’ यावर झाले. यात अध्यक्षस्थानी प्रा. जयदेव डोळे होते, तर राहुल रानाळकर, सुभाष बोर्डे यांनी सहभाग नोंदवला. पहिल्या दिवशीचे शेवटचे सत्र ‘धर्म आणि जातीचे राजकारण : मतदान वर्तणूक’ या विषयावर पार पडले. यात अध्यक्षस्थानी प्रा. जहीर अली होते, तर प्रा. प्रकाश पवार व प्रा. श्रीराम येरनकर यांनी सहभाग नोंदवला.

लोकशाहीने निवडून येऊन बनतात हुकूमशहानिवडणुकांमध्ये मूलभूत प्रश्नांना बगल देऊन निष्क्रिय मुद्यांवर जेव्हा निवडणुका प्रभावित केल्या जातात. तेव्हा लोकशाही मार्गाने निवडून आलेली सरकारे हुकूमशाही स्थापन करतात. त्याचे जागतिक अनुभव अनेक असल्याचे डॉ. जोंधळे यांनी सांगितले. असे होऊ नये, यासाठी सजग नागरिकांनी स्वत:च्या पातळीवर लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे आवाहन डॉ. जोंधळे यांनी केले. 

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादEducationशिक्षणProfessorप्राध्यापक