शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

देशभक्तीच्या ज्वरात जगण्याच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष : सुरेंद्र जोंधळे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 19:07 IST

सध्या देशभक्तीच्या ज्वरात नागरिक आकंठ बुडाले आहेत.

औरंगाबाद : नागरिक स्वतंत्रपणे विचार करीत स्वविवेक जागृत ठेवून जोपर्यंत निवडणुकांमध्ये सहभागी होत नाहीत. तोपर्यंत सक्षम आणि खरीखुरी लोकशाही अस्तित्वात येणार नाही. सध्या देशभक्तीच्या ज्वरात नागरिक आकंठ बुडाले आहेत. त्यामुळे जगणे, नागरी प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत मुंबईतील राज्यशास्त्राचे अभ्यासक डॉ. सुरेंद्र जोंधळे यांनी व्यक्त केली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील राज्यशास्त्र विभागातर्फे ‘निवडणुका आणि भारतीय लोकशाही’ या विषयावर दोनदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन केले आहे. याचे उद्घाटन प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांच्या हस्ते करण्यात आले. व्यासपीठावर डॉ. सुरेंद्र जोंधळे, विभागप्रमुख डॉ. प्रशांत आमृतकर, डॉ. शुजा शाकीर उपस्थित होते. यावेळी डॉ. जोंधळे यांचे बीजभाषण झाले. लोकशाहीत लोकसहभागाला खूप महत्त्व असते.

जनकल्याणकारी राज्य ही संकल्पना घेऊन सत्तेवर येणारी सरकारे जाऊन आता फक्त कार्यकारी सरकारे सत्तेवर येत आहेत. आज देशात ज्या पायांवर लोकशाहीचा डोलारा उभा आहे. अशा संस्था धोक्यात आणण्याचे काम जाणीवपूर्वक घडवून आणले जात आहे. लोकशाहीत निवडणुका महत्त्वाच्या असतात. याच माध्यमातून सत्ताबदल होतात. सद्य:स्थितीत राष्ट्रीय पक्षसुद्धा जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करून निवडणुका लढवताना दिसत आहेत. हे धोक्याचे लक्षण असल्याचेही डॉ. जोंधळे यांनी सांगितले. 

अध्यक्षीय समारोप डॉ. अशोक तेजनकर यांनी केला. प्रास्ताविक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. शुजा शाकीर यांनी केले, तर आभार प्रा. मुख्तार शेख यांनी मानले. उद्घाटनानंतर ‘निवडणुका सुधारणा’ यावर पहिले सत्र पार पडले. यात अध्यक्ष म्हणून प्रा. मृदुल निळे, तर प्रा. साकेत आंबेरखान यांनी सहभाग नोंदवला. दुसरे सत्र ‘प्रसारमाध्यमे आणि राजकारण’ यावर झाले. यात अध्यक्षस्थानी प्रा. जयदेव डोळे होते, तर राहुल रानाळकर, सुभाष बोर्डे यांनी सहभाग नोंदवला. पहिल्या दिवशीचे शेवटचे सत्र ‘धर्म आणि जातीचे राजकारण : मतदान वर्तणूक’ या विषयावर पार पडले. यात अध्यक्षस्थानी प्रा. जहीर अली होते, तर प्रा. प्रकाश पवार व प्रा. श्रीराम येरनकर यांनी सहभाग नोंदवला.

लोकशाहीने निवडून येऊन बनतात हुकूमशहानिवडणुकांमध्ये मूलभूत प्रश्नांना बगल देऊन निष्क्रिय मुद्यांवर जेव्हा निवडणुका प्रभावित केल्या जातात. तेव्हा लोकशाही मार्गाने निवडून आलेली सरकारे हुकूमशाही स्थापन करतात. त्याचे जागतिक अनुभव अनेक असल्याचे डॉ. जोंधळे यांनी सांगितले. असे होऊ नये, यासाठी सजग नागरिकांनी स्वत:च्या पातळीवर लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे आवाहन डॉ. जोंधळे यांनी केले. 

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादEducationशिक्षणProfessorप्राध्यापक