शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
2
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
3
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बलापूरमधील धक्कादायक घटना
4
जिल्हाधिकाऱ्यांना मुख्य सचिव बनून केला फोन, दिले असे आदेश, पिता-पुत्रासह तिघांना अटक, असं फुटलं बिंग
5
हॉटेलमध्ये आलेल्या 'त्या' डॉक्टर तरूणीची अवस्था काय होती?; मालकाने सांगितला घटनाक्रम
6
'ट्रम्पने 50 वेळा मोदींचा अपमान केला, तरीही मोदी गप्प; इंदिरा गांधींसारखे धाडस हवे'- राहुल गांधी
7
सलमान खान स्वत: 'बिग बॉस'चे सगळे एपिसोड्स बघतो का? अखेर निर्मात्यांनी केला खुलासा
8
बायकोचा खून करून घरात रचला चोरीचा बनाव, पण पतीच्या एका चुकीमुळे झाला 'भांडाफोड'...
9
IPO ची वाटही पाहिली नाही! देशातील सर्वात मोठ्या म्युच्युअल फंडने Lenskart ला दिला ₹100 कोटींचा चेक
10
13 दिवसांनंतर सोनं १३०९ नं महागलं, चांदीही ३८३२ नं वधारली, पुन्हा विक्रमी पातळीव पोहोचणार गोल्ड? काय म्हणतात एक्सपर्ट?
11
Jio चा धमाका! २०० रुपयांपेक्षा कमी दरात अनलिमिटेड 5G डेटा आणि कॉलिंग; 'हे' २ स्वस्त प्रीपेड प्लॅन्स लॉन्च
12
'तुम्ही सांगा फक्त, नरेंद्र मोदी मतांसाठी स्टेजवर नाचायलाही तयार होतील,' राहुल गांधींची टीका
13
IND vs AUA 1st T20I : सूर्यकुमार यादव अन् शुबमन गिल जोडी जमली; पण शेवटी पाऊस जिंकला!
14
रणबीर कपूरनंतर आता प्रभासही देणार न्यूड सीन? संदीप रेड्डी वांगा यांच्या 'स्पिरीट'ची चर्चा
15
वयाच्या ७० व्या वर्षी पिता बनला हा अभिनेता, पत्नीसह केलं आठव्या मुलाचं स्वागत
16
"महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणी SIT स्थापन करा, रणजितसिंह निंबाळकरांना तात्काळ अटक करा’’, कांग्रेसची मागणी 
17
‘केंद्रच्या कर्मचाऱ्यांचा डेटा गेला चीनकडे, देशातील गल्लीबोळाची त्यांना माहिती’, बड्या टेक तज्ज्ञाचा सनसनाटी दावा 
18
बाबोsss.... फुटबॉल विश्वचषकासाठी सौदी अरेबिया बांधणार जगातील पहिले 'स्काय स्टेडियम'
19
डॉक्टर तरुणी रात्री १.३० वाजता हॉटेलमध्ये आली होती; सीसीटीव्ही फुटेज पहिल्यांदाच समोर आले
20
रामकेशच्या हत्येचा फूलप्रूफ प्लॅन बनवला; मग खूनी गर्लफ्रेंडचं रहस्य कसं उघड झालं? पोलिसांनी सांगितली संपूर्ण कहाणी

देशभक्तीच्या ज्वरात जगण्याच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष : सुरेंद्र जोंधळे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 19:07 IST

सध्या देशभक्तीच्या ज्वरात नागरिक आकंठ बुडाले आहेत.

औरंगाबाद : नागरिक स्वतंत्रपणे विचार करीत स्वविवेक जागृत ठेवून जोपर्यंत निवडणुकांमध्ये सहभागी होत नाहीत. तोपर्यंत सक्षम आणि खरीखुरी लोकशाही अस्तित्वात येणार नाही. सध्या देशभक्तीच्या ज्वरात नागरिक आकंठ बुडाले आहेत. त्यामुळे जगणे, नागरी प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत मुंबईतील राज्यशास्त्राचे अभ्यासक डॉ. सुरेंद्र जोंधळे यांनी व्यक्त केली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील राज्यशास्त्र विभागातर्फे ‘निवडणुका आणि भारतीय लोकशाही’ या विषयावर दोनदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन केले आहे. याचे उद्घाटन प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांच्या हस्ते करण्यात आले. व्यासपीठावर डॉ. सुरेंद्र जोंधळे, विभागप्रमुख डॉ. प्रशांत आमृतकर, डॉ. शुजा शाकीर उपस्थित होते. यावेळी डॉ. जोंधळे यांचे बीजभाषण झाले. लोकशाहीत लोकसहभागाला खूप महत्त्व असते.

जनकल्याणकारी राज्य ही संकल्पना घेऊन सत्तेवर येणारी सरकारे जाऊन आता फक्त कार्यकारी सरकारे सत्तेवर येत आहेत. आज देशात ज्या पायांवर लोकशाहीचा डोलारा उभा आहे. अशा संस्था धोक्यात आणण्याचे काम जाणीवपूर्वक घडवून आणले जात आहे. लोकशाहीत निवडणुका महत्त्वाच्या असतात. याच माध्यमातून सत्ताबदल होतात. सद्य:स्थितीत राष्ट्रीय पक्षसुद्धा जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करून निवडणुका लढवताना दिसत आहेत. हे धोक्याचे लक्षण असल्याचेही डॉ. जोंधळे यांनी सांगितले. 

अध्यक्षीय समारोप डॉ. अशोक तेजनकर यांनी केला. प्रास्ताविक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. शुजा शाकीर यांनी केले, तर आभार प्रा. मुख्तार शेख यांनी मानले. उद्घाटनानंतर ‘निवडणुका सुधारणा’ यावर पहिले सत्र पार पडले. यात अध्यक्ष म्हणून प्रा. मृदुल निळे, तर प्रा. साकेत आंबेरखान यांनी सहभाग नोंदवला. दुसरे सत्र ‘प्रसारमाध्यमे आणि राजकारण’ यावर झाले. यात अध्यक्षस्थानी प्रा. जयदेव डोळे होते, तर राहुल रानाळकर, सुभाष बोर्डे यांनी सहभाग नोंदवला. पहिल्या दिवशीचे शेवटचे सत्र ‘धर्म आणि जातीचे राजकारण : मतदान वर्तणूक’ या विषयावर पार पडले. यात अध्यक्षस्थानी प्रा. जहीर अली होते, तर प्रा. प्रकाश पवार व प्रा. श्रीराम येरनकर यांनी सहभाग नोंदवला.

लोकशाहीने निवडून येऊन बनतात हुकूमशहानिवडणुकांमध्ये मूलभूत प्रश्नांना बगल देऊन निष्क्रिय मुद्यांवर जेव्हा निवडणुका प्रभावित केल्या जातात. तेव्हा लोकशाही मार्गाने निवडून आलेली सरकारे हुकूमशाही स्थापन करतात. त्याचे जागतिक अनुभव अनेक असल्याचे डॉ. जोंधळे यांनी सांगितले. असे होऊ नये, यासाठी सजग नागरिकांनी स्वत:च्या पातळीवर लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे आवाहन डॉ. जोंधळे यांनी केले. 

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादEducationशिक्षणProfessorप्राध्यापक