शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतरिम दिलासा हवा असेल तर मजबूत युक्तिवाद सादर करा; वक्फ सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
2
गावालाच जवानांचा वेढा, ५ जहाल माओवादी ताब्यात; तीन महिलांचा समावेश, ३६ लाख रुपयांचे होते बक्षीस
3
कल्याणमध्ये स्लॅब कोसळून सहा ठार; सहा जखमी; मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांचे अर्थसहाय्य
4
आंदोलनाची धार कमी झाल्यानंतर भुजबळांना मिळाली मंत्रिपदाची संधी; धनंजय मुंडेंचे दोर कापले
5
राज्यात पाच वर्षांत ३५ लाख घरे; झोपडपट्टीमुक्त शहरांचा संकल्प 
6
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
7
वैभव सूर्यंवशीनं धरले MS धोनीचे पाय; मग रंगली स्फोटक बॅटरमध्ये दडलेल्या संस्कारी मुलाची चर्चा
8
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
9
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड
10
कामात दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई; पालकमंत्री बावनकुळे यांचा इशारा
11
कहानी पुरी फिल्मी है : चिमुकले गाडीत, आई फलाटावर पाणी भरत राहिली अन् ट्रेन मुंबईच्या दिशेने निघाली
12
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
13
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
14
गुड न्यूज! नागपूर -बिलासपूर मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला आणखी आठ डब्बे जोडणार
15
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
16
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
17
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
18
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
19
परीक्षेच्या शेवटच्या दिवशी विद्यार्थिनीने केली आत्महत्या; लातूरच्या शासकीय महिला तंत्रनिकेतनच्या वसतिगृहात घेतला गळफास
20
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन

जि.प.च्या निवडीकडे विधानसभेमुळे दुर्लक्ष

By admin | Updated: September 17, 2014 00:20 IST

हिंगोली : जिल्हा परिषद पदाधिकारी निवडीकडे विधानसभेच्या धामधुमीत राजकीयदृष्ट्या दुर्लक्षच होत आहे.

हिंगोली : जिल्हा परिषद पदाधिकारी निवडीकडे विधानसभेच्या धामधुमीत राजकीयदृष्ट्या दुर्लक्षच होत आहे. खरेतर मागची पदाधिकारी निवडच जिल्ह्यातील बऱ्याच राजकीय वितुष्टांना कारणीभूत ठरली होती. अजूनही त्याचे परिणाम शिवसेनेतील काहींना भोगावे लागत आहेत. मात्र यावेळी विधानसभेच्या उमेदवारीकडे लक्ष लागलेल्यांना जि.प.त रस नाही.मागील वेळी जि.प.तील पदाधिकारी निवडीवरून शिवसेनेत गटतटाच्या राजकारणाची मुहूर्तमेढ रोवली गेली होती. त्याचा परिणाम म्हणून राज्यात लाट असताना हिंगोली लोकसभेत शिवसेनेला आपली जागा गमवावी लागली होती. आताही सर्वांची भूमिका सावध आहे. थोडीही ठिणगी पडली तर प्रकरण भडकेल अन् पराभवाच्या होरपळीत ढकलले जाण्याची भीती आहे. माजी खा.सुभाष वानखेडे, माजी आ.गजानन घुगे, माजी आ. जयप्रकाश मुंदडा, जिल्हाप्रमुख संतोष बांगर या सर्वांना विश्वासात घेऊनच पक्षाला पुढची रणनीती आखावी लागणार आहे. त्यातच कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसही संधी शोधत आहे. गटातटाची भाषा झाल्यास सगळी सभापतीपदे सोडण्याची तयारी दर्शविण्यापर्यंत भूमिका घेतली जात आहे. विधानसभा निवडणुकीमुळे जि.प. तील गटतटांना फारसा वाव मिळत नसल्याचे मात्र दिसत आहे. वानखेडे यांना नांदेडात उमेदवारी पाहिजे आहे. तर घुगे यांना कळमनुरीत व मुंदडा यांना वसमतमध्ये. त्यामुळे पक्षाचा आदेश डावलणे तर अवघडच आहे. मात्र गट-तटाला खतपाणी घालणेही परवडणारे नाही, हे सगळेच जाणून आहेत. त्यामुळे सावध भूमिका घेत आहेत. मात्र कार्यकर्त्यांच्या महत्त्वाकांक्षांना आकाशही ठेंगणे आहे. त्यातून काही चमत्कार घडलाच तर नवल नाही. कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या काही जि. प. सदस्यांनी या पार्श्वभूमीवर खा. राजीव सातव, आ.जयप्रकाश दांडेगावकर, आ. भाऊराव पाटील गोरेगावकर यांची भेट घेतली होती. त्यामुळे त्यांची काय रणनीती राहते, याकडेही लक्ष लागले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)