शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

जि.प.च्या निवडीकडे विधानसभेमुळे दुर्लक्ष

By admin | Updated: September 17, 2014 00:20 IST

हिंगोली : जिल्हा परिषद पदाधिकारी निवडीकडे विधानसभेच्या धामधुमीत राजकीयदृष्ट्या दुर्लक्षच होत आहे.

हिंगोली : जिल्हा परिषद पदाधिकारी निवडीकडे विधानसभेच्या धामधुमीत राजकीयदृष्ट्या दुर्लक्षच होत आहे. खरेतर मागची पदाधिकारी निवडच जिल्ह्यातील बऱ्याच राजकीय वितुष्टांना कारणीभूत ठरली होती. अजूनही त्याचे परिणाम शिवसेनेतील काहींना भोगावे लागत आहेत. मात्र यावेळी विधानसभेच्या उमेदवारीकडे लक्ष लागलेल्यांना जि.प.त रस नाही.मागील वेळी जि.प.तील पदाधिकारी निवडीवरून शिवसेनेत गटतटाच्या राजकारणाची मुहूर्तमेढ रोवली गेली होती. त्याचा परिणाम म्हणून राज्यात लाट असताना हिंगोली लोकसभेत शिवसेनेला आपली जागा गमवावी लागली होती. आताही सर्वांची भूमिका सावध आहे. थोडीही ठिणगी पडली तर प्रकरण भडकेल अन् पराभवाच्या होरपळीत ढकलले जाण्याची भीती आहे. माजी खा.सुभाष वानखेडे, माजी आ.गजानन घुगे, माजी आ. जयप्रकाश मुंदडा, जिल्हाप्रमुख संतोष बांगर या सर्वांना विश्वासात घेऊनच पक्षाला पुढची रणनीती आखावी लागणार आहे. त्यातच कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसही संधी शोधत आहे. गटातटाची भाषा झाल्यास सगळी सभापतीपदे सोडण्याची तयारी दर्शविण्यापर्यंत भूमिका घेतली जात आहे. विधानसभा निवडणुकीमुळे जि.प. तील गटतटांना फारसा वाव मिळत नसल्याचे मात्र दिसत आहे. वानखेडे यांना नांदेडात उमेदवारी पाहिजे आहे. तर घुगे यांना कळमनुरीत व मुंदडा यांना वसमतमध्ये. त्यामुळे पक्षाचा आदेश डावलणे तर अवघडच आहे. मात्र गट-तटाला खतपाणी घालणेही परवडणारे नाही, हे सगळेच जाणून आहेत. त्यामुळे सावध भूमिका घेत आहेत. मात्र कार्यकर्त्यांच्या महत्त्वाकांक्षांना आकाशही ठेंगणे आहे. त्यातून काही चमत्कार घडलाच तर नवल नाही. कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या काही जि. प. सदस्यांनी या पार्श्वभूमीवर खा. राजीव सातव, आ.जयप्रकाश दांडेगावकर, आ. भाऊराव पाटील गोरेगावकर यांची भेट घेतली होती. त्यामुळे त्यांची काय रणनीती राहते, याकडेही लक्ष लागले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)