शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

सवलतीच मिळणार नसतील तर मग ओबीसीत राहून उपयोग काय? सुवर्णकार समाजाला हव्यात सुविधा! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 15:23 IST

महाराष्ट्रात ओबीसीमध्ये ३५० च्यावर जाती आहेत. दिवसेंदिवस त्या वाढतच आहेत; पण सवलती काहीच नाही. सुवर्णकार समाजही ओबीसीच आहे; पण ओबीसी म्हणून वाट्याला काहीच येत नाही. मग त्यात राहायचं कशाला, असा प्रश्न पडला आहे. निदान बार्टीसारख्या सुविधा तरी द्या. कौशल्य प्रशिक्षण द्या. जेणेकरून तरुणांना तरी त्याचा फायदा होईल, अशी अपेक्षा लोकमतच्या ‘बिरादरी’ या लोकप्रिय सदरात व्यक्त करण्यात आली. 

- स. सो. खंडाळकर 

औरंगाबाद : महाराष्ट्रात ओबीसीमध्ये ३५० च्यावर जाती आहेत. दिवसेंदिवस त्या वाढतच आहेत; पण सवलती काहीच नाही. सुवर्णकार समाजही ओबीसीच आहे; पण ओबीसी म्हणून वाट्याला काहीच येत नाही. मग त्यात राहायचं कशाला, असा प्रश्न पडला आहे. निदान बार्टीसारख्या सुविधा तरी द्या. कौशल्य प्रशिक्षण द्या. जेणेकरून तरुणांना तरी त्याचा फायदा होईल, अशी अपेक्षा लोकमतच्या ‘बिरादरी’ या लोकप्रिय सदरात व्यक्त करण्यात आली. 

लाड सुवर्णकार समाजाचे अध्यक्ष भास्करराव टेहरे, सोनार सेवा महासंघाचे  मराठवाडा अध्यक्ष मधुकरराव टाक, सुवर्णकार शैक्षणिक मंडळाचे अध्यक्ष व शहर काँग्रेसचे सरचिटणीस सुरेश टाक, सोनार महासंघाचे सचिव शंकरराव महादाने, सराफ सुवर्णकार फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष सोपानराव मुंडलिक, मराठवाडा अहिर सुवर्णकार शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मनोहरराव विखणकर, एमजीएमच्या अपघात विभागाचे प्रमुख डॉ. अशोक हवेलीकर, उद्योगपती नितीन उदावंत, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र वालनीकर, पोलखोल टाईम्सचे संपादक भगवान शहाणे, आम्ही सुवर्णकार मंडळाच्या खजिनदार अनिता शहाणे, अखिल सुवर्णकार महासंघाच्या  माजी अध्यक्षा अनिता काटे, अखिल सुवर्णकार महासंघाच्या महिला आघाडीच्या पदाधिकारी आशा सवखेडकर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी विभागाचे शहर- जिल्हाध्यक्ष गजानन सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते शशिकांत उदावंत व तेजस्वी उदावंत तसेच भारतीय प्रतिभूती आणि विनिमय बोर्डाचे वित्तीय प्रशिक्षक प्रभाकरराव उदावंत आदींनी यावेळी झालेल्या चर्चेत भाग घेतला व अनेक मुद्दे मांडले. 

होलमार्क आणि जीएसटीमुळेही सराफा व्यवसाय अडचणीत सापडला आहे. ग्रामीण भागातील सुवर्णकार समाजाला अद्यापही जीएसटी कळलेला नाही. त्यामुळेही धंद्यावर खूप मोठा परिणाम होत आहे, असे सुरेश टाक यांनी सांगितले. सरकारच्या निर्णयप्रक्रि येत सुवर्णकार समाजाचा कुणीही नाही. त्यामुळे मागे ४२ दिवस दुकाने बंद ठेवूनही आमच्या मागण्यांची कुणीही दखल घेतली नाही, याची आम्हाला खंत वाटते, असे रवींद्र वालनीकर यांनी नमूद केले. सुवर्णकार समाज कष्टाळू आहे. शिक्षणाचे प्रमाण ६० टक्के असावे. इतर समाजाप्रमाणेच सुवर्णकार समाजातही मुला-मुलींचे प्रमाण विषम बनले आहे. विशेषत: स्मार्ट फोनमुळे घटस्फोटाचेही प्रमाण वाढले आहे. येत्या मार्चमध्ये ५१ जोडप्यांचा औरंगाबादेत सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यासाठी एक पैसाही फी आकारली जाणार नाही. मागेही सामूहिक विवाह सोहळा मोठ्या प्रमाणावर आयोजित केला गेला होता. तत्कालीन मंत्री राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते सामूहिक विवाह सोहळ्याचे उद्घाटन झाले होते. यावर्षीही मोठ्या प्रमाणावर सामूहिक विवाह सोहळा होईल. विशेष म्हणजे हा विवाह सोहळा सर्व शाखीय सुवर्णकार समाजाचा असेल, अशी माहिती देऊन सुवर्णकार समाज दिवसेंदिवस आर्थिकदृष्ट्या खचत चालल्याने सरकारने संत नरहरी महाराज सुवर्णकार आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करून समाजाला आर्थिक हातभार लावावा. ही फार दिवसांपासूनची मागणी आहे. त्यासाठी पाठपुरावाही केला पण यश येत नाही, अशी खंत सर्वांनीच व्यक्त केली. 

...आणि पोलीस येऊन उचलून नेतात सुवर्णकार समाज सतत ४११ कलमांच्या धाकाखाली जगतोय. एक तर सराफ व्यवसायावर प्रचंड अतिक्रमण होत आहे. बंगाली, ब्राह्मण, जैन, मारवाडी, मराठा समाजही या व्यवसायात उतरतोय. यामुळे सुवर्णकार समाजाचा हा मूळ धंदा उद्ध्वस्त होतोय. त्यातच ४११ कलम. दागिने चोराने सुवर्णकाराचे एखादे दुकान दाखवायला उशीर... पोलीस त्याला उचलून नेतात. लवचीक, भांडणे न करणारा, कष्टाळू असा हा  सुवर्णकार समाज पोलिसांच्या गाडीत बसताच खचून जातो. पोलिसांकडून मिळणारी वागणूक बघून हबकून जातो. त्यातच अनेकांवर मृत्यू ओढवल्याची किती उदाहरणे सांगावीत? असा सवाल उपस्थित करताना भास्कर टेहरे गहिवरून गेले. ४११ कलम रद्द करण्याची मागणी यावेळी उपस्थित सर्वांनीच केली. 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद