शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
2
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
3
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
4
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
5
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
6
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
7
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
8
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
9
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
10
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
11
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
12
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
13
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
14
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
15
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
16
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
17
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
18
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
19
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
20
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा

सवलतीच मिळणार नसतील तर मग ओबीसीत राहून उपयोग काय? सुवर्णकार समाजाला हव्यात सुविधा! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 15:23 IST

महाराष्ट्रात ओबीसीमध्ये ३५० च्यावर जाती आहेत. दिवसेंदिवस त्या वाढतच आहेत; पण सवलती काहीच नाही. सुवर्णकार समाजही ओबीसीच आहे; पण ओबीसी म्हणून वाट्याला काहीच येत नाही. मग त्यात राहायचं कशाला, असा प्रश्न पडला आहे. निदान बार्टीसारख्या सुविधा तरी द्या. कौशल्य प्रशिक्षण द्या. जेणेकरून तरुणांना तरी त्याचा फायदा होईल, अशी अपेक्षा लोकमतच्या ‘बिरादरी’ या लोकप्रिय सदरात व्यक्त करण्यात आली. 

- स. सो. खंडाळकर 

औरंगाबाद : महाराष्ट्रात ओबीसीमध्ये ३५० च्यावर जाती आहेत. दिवसेंदिवस त्या वाढतच आहेत; पण सवलती काहीच नाही. सुवर्णकार समाजही ओबीसीच आहे; पण ओबीसी म्हणून वाट्याला काहीच येत नाही. मग त्यात राहायचं कशाला, असा प्रश्न पडला आहे. निदान बार्टीसारख्या सुविधा तरी द्या. कौशल्य प्रशिक्षण द्या. जेणेकरून तरुणांना तरी त्याचा फायदा होईल, अशी अपेक्षा लोकमतच्या ‘बिरादरी’ या लोकप्रिय सदरात व्यक्त करण्यात आली. 

लाड सुवर्णकार समाजाचे अध्यक्ष भास्करराव टेहरे, सोनार सेवा महासंघाचे  मराठवाडा अध्यक्ष मधुकरराव टाक, सुवर्णकार शैक्षणिक मंडळाचे अध्यक्ष व शहर काँग्रेसचे सरचिटणीस सुरेश टाक, सोनार महासंघाचे सचिव शंकरराव महादाने, सराफ सुवर्णकार फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष सोपानराव मुंडलिक, मराठवाडा अहिर सुवर्णकार शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मनोहरराव विखणकर, एमजीएमच्या अपघात विभागाचे प्रमुख डॉ. अशोक हवेलीकर, उद्योगपती नितीन उदावंत, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र वालनीकर, पोलखोल टाईम्सचे संपादक भगवान शहाणे, आम्ही सुवर्णकार मंडळाच्या खजिनदार अनिता शहाणे, अखिल सुवर्णकार महासंघाच्या  माजी अध्यक्षा अनिता काटे, अखिल सुवर्णकार महासंघाच्या महिला आघाडीच्या पदाधिकारी आशा सवखेडकर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी विभागाचे शहर- जिल्हाध्यक्ष गजानन सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते शशिकांत उदावंत व तेजस्वी उदावंत तसेच भारतीय प्रतिभूती आणि विनिमय बोर्डाचे वित्तीय प्रशिक्षक प्रभाकरराव उदावंत आदींनी यावेळी झालेल्या चर्चेत भाग घेतला व अनेक मुद्दे मांडले. 

होलमार्क आणि जीएसटीमुळेही सराफा व्यवसाय अडचणीत सापडला आहे. ग्रामीण भागातील सुवर्णकार समाजाला अद्यापही जीएसटी कळलेला नाही. त्यामुळेही धंद्यावर खूप मोठा परिणाम होत आहे, असे सुरेश टाक यांनी सांगितले. सरकारच्या निर्णयप्रक्रि येत सुवर्णकार समाजाचा कुणीही नाही. त्यामुळे मागे ४२ दिवस दुकाने बंद ठेवूनही आमच्या मागण्यांची कुणीही दखल घेतली नाही, याची आम्हाला खंत वाटते, असे रवींद्र वालनीकर यांनी नमूद केले. सुवर्णकार समाज कष्टाळू आहे. शिक्षणाचे प्रमाण ६० टक्के असावे. इतर समाजाप्रमाणेच सुवर्णकार समाजातही मुला-मुलींचे प्रमाण विषम बनले आहे. विशेषत: स्मार्ट फोनमुळे घटस्फोटाचेही प्रमाण वाढले आहे. येत्या मार्चमध्ये ५१ जोडप्यांचा औरंगाबादेत सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यासाठी एक पैसाही फी आकारली जाणार नाही. मागेही सामूहिक विवाह सोहळा मोठ्या प्रमाणावर आयोजित केला गेला होता. तत्कालीन मंत्री राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते सामूहिक विवाह सोहळ्याचे उद्घाटन झाले होते. यावर्षीही मोठ्या प्रमाणावर सामूहिक विवाह सोहळा होईल. विशेष म्हणजे हा विवाह सोहळा सर्व शाखीय सुवर्णकार समाजाचा असेल, अशी माहिती देऊन सुवर्णकार समाज दिवसेंदिवस आर्थिकदृष्ट्या खचत चालल्याने सरकारने संत नरहरी महाराज सुवर्णकार आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करून समाजाला आर्थिक हातभार लावावा. ही फार दिवसांपासूनची मागणी आहे. त्यासाठी पाठपुरावाही केला पण यश येत नाही, अशी खंत सर्वांनीच व्यक्त केली. 

...आणि पोलीस येऊन उचलून नेतात सुवर्णकार समाज सतत ४११ कलमांच्या धाकाखाली जगतोय. एक तर सराफ व्यवसायावर प्रचंड अतिक्रमण होत आहे. बंगाली, ब्राह्मण, जैन, मारवाडी, मराठा समाजही या व्यवसायात उतरतोय. यामुळे सुवर्णकार समाजाचा हा मूळ धंदा उद्ध्वस्त होतोय. त्यातच ४११ कलम. दागिने चोराने सुवर्णकाराचे एखादे दुकान दाखवायला उशीर... पोलीस त्याला उचलून नेतात. लवचीक, भांडणे न करणारा, कष्टाळू असा हा  सुवर्णकार समाज पोलिसांच्या गाडीत बसताच खचून जातो. पोलिसांकडून मिळणारी वागणूक बघून हबकून जातो. त्यातच अनेकांवर मृत्यू ओढवल्याची किती उदाहरणे सांगावीत? असा सवाल उपस्थित करताना भास्कर टेहरे गहिवरून गेले. ४११ कलम रद्द करण्याची मागणी यावेळी उपस्थित सर्वांनीच केली. 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद