शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
2
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
3
'आता आणखी खेळाडू निवृत्त होतील...'; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने केला धक्कादायक दावा
4
आरोग्य विमा घेताना फसगत नको! 'हे' ६ प्रश्न विचाराच, अन्यथा पैसे वाया जातील!
5
IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला...
6
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी कॅनडात खलिस्तानवाद्यांवर जोरदार कारवाई, अनेकांना अटक...
7
Raj Kushwaha : "सोनम वयाने मोठी, बॉस होती, राज फक्त नोकर"; आईने घेतली लेकाची बाजू, म्हणाली...
8
विशेष लेख: मोठ्या पवारांची भाजपच्या दारावर टकटक?
9
'PM मोदींनी आपला हट्टीपणा सोडावा', असीम मुनीरच्या अमेरिका दौऱ्यावरुन काँग्रेसची टीका
10
आजचा अग्रलेख - किती मुले केव्हा? की नकोच?
11
राज कुशवाह तर मोहरा, सोनमचं खरं प्रेम कुणीतरी दुसरंच...? राजा रघुवंशी प्रकरणात नवा 'ट्विस्ट'
12
अंबानींना टक्कर देऊ शकतील का मस्क? स्टारलिंकच्या इंटरनेटच्या किंमतीवरूनच येईल अंदाज
13
जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाने केळी बागांना तडाखा; मोठे वृक्ष उन्मळून पडले, रस्ता रात्री ९ पासून बंद
14
प्राजक्ताच्या 'मदनमंजिरी'वर युरोपीयन्सचा डान्स, लावणीवर महिलांसह पुरुषांनीही धरला ठेका, अभिनेत्री म्हणाली...
15
भारतासोबत अतिशय घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
16
३००० रुपयांवरील UPI पेमेंट वर शुल्क लागणार का, सरकारनं काय म्हटलं? जाणून घ्या डिटेल्स
17
आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी : पंढरीच्या वाटेत दर पाच किलोमीटरवर आपला दवाखाना, दहा खाटांचे आयसीयू
18
मालाडमध्ये मांजरीसोबत अमानुष प्रकार, संतापजनक घटनेचा व्हिडीओ समोर!
19
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
20
निवृत्तीचे वय ६० करण्यास होतोय विरोध, दुसरीकडे ६५ पर्यंत काम करण्याची मुभा

काही करीत नसाल, तर निदान मुले तरी जन्माला घाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 01:00 IST

जे लोक देशासाठी काहीच करीत नाहीत त्यांनी किमान मुलांना तरी जन्माला घालावे, असा अजब सल्ला साध्वी प्रज्ञासिंह यांनी दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : इतर धर्मीयांचे वर्चस्व रोखण्यासाठी व हिंदू धर्माचे अस्तित्व टिकवण्यासाठी हिंदूंनी जास्तीत जास्त मुलांना जन्माला घालावे. जे लोक देशासाठी काहीच करीत नाहीत त्यांनी किमान मुलांना तरी जन्माला घालावे, असा अजब सल्ला साध्वी प्रज्ञासिंह यांनी दिला. जनूभाऊ रानडे यांचा दहावा स्मृतिदिन व शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी राष्ट्रहित जनाधार विश्वस्त मंडळातर्फे आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. मंचावर डॉ. विभाश्री, अंबरीश महाराज, नवनाथ महाराज, डॉ. वीरूपाक्ष शिवाचार्य, शिवाजी शेरकर, राजीव जहागीरदार, संजय बारगजे आदी उपस्थित होते.संत तुकाराम नाट्यगृहात पार पडलेल्या कार्यक्रमात ‘भगवा रंग त्यागाचा’ या विषयावर बोलताना त्या म्हणाल्या, मुलांच्या भरणपोषणाची क्षमता नाही म्हणून एकाच मुलावर थांबण्याचा निर्णय घेऊ नका. बाहेरून आलेल्या कित्येक लोकांना नाही तरी आपण देशात खाऊ-पिऊ घालतच आहोत. तुमच्या मुलांना सांभाळण्याची जबाबदारी आम्ही घेऊ. हिंदूंची लोकसंख्या वाढली नाही, तर आगामी काळात इतर धर्म अतिक्रमण करून हिंदूंच्या अस्तित्वावर धोका आणतील, असा इशाराही त्यांना दिला.शिवाजी महाराजांनी सहा लग्न केल्याचा दाखला देत प्रज्ञासिंह यांनी देशासाठी एकापेक्षा अधिक लग्नकेले तरी चालेल, असे वक्तव्यकेले. मुलांना बहीण-भाऊनसल्यामुळे आजकाल मुलांमध्ये नैराश्याचे प्रमाण वाढत असून, आत्महत्या वाढत असल्याचाही निष्कर्ष काढत त्यांनी मुलांच्या संख्येवरून वाद होणे योग्य नसल्याचे म्हटले.विविध क्षेत्रांत भरीव कामगिरी करणा-या महिलांचा यावेळी ‘मातृशक्ती सन्मान’ करण्यात आला. अर्पण पतंगे या शाळकरी विद्यार्थ्याने पोवाडा सादर केला, तर पार्थबावस्कर यांनी सूत्रसंचालनआणि हेमंत त्रिवेदी यांनी आभार मानले.भगव्या रंगाला दहशतवादाचा ठपका लावणे एका मोठ्या षड्यंत्राचा भाग असल्याचे सांगत प्रज्ञासिंह यांनी भगवा हा ‘त्याग, समर्पण आणि शौर्याचा’ रंग असल्याचे म्हटले. देशविरोधी आणि मनात कपट बाळगणारे लोक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रखर राष्ट्रवादाला घाबरतात. भगवा रंग म्हणजे या प्रखर राष्ट्रवादाचे प्रतीक आहे, असेही त्या म्हणाल्या.