शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींची अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
4
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
5
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
6
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
7
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
8
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
9
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
10
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
11
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
12
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
13
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
14
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
15
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
16
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
17
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
18
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
19
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
20
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!

...तर बिबटे, तडस शहरात येतील !

By admin | Updated: March 18, 2016 01:52 IST

जालना : जेथे माणसाला हंडाभर पाण्यासाठी भटकण्याची वेळ आली तेथे वन्यप्राण्यांची काय गत. पाणीटंचाईच्या झळा मार्चमध्येच तीव्र होत असून,

जालना : जेथे माणसाला हंडाभर पाण्यासाठी भटकण्याची वेळ आली तेथे वन्यप्राण्यांची काय गत. पाणीटंचाईच्या झळा मार्चमध्येच तीव्र होत असून, याचा सर्वाधित फटका वन्य प्राण्यांना बसत आहे. भोकरदन, बदनापूर तालुक्यात हरीण, काळविट, वानर, तडस, बिबटे या प्राण्यांनी पाण्याच्या शोधार्थ आपला मोर्चा लोकवस्तीकडे वळविला आहे. बदनापूर तालुक्यातील चनेगावमध्ये दोन दिवसांपूर्वी बिबट्याने दोघांवर केलेल्या हल्ल्यातून वनविभागाने धडा घेण्याची गरज आहे. तात्काळ उपाययोजना केल्या नाहीत तर वन्य प्राणी शहरात दिसल्यास नवल नाही.जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढत आहे. कडक उन्हामुळे जलसाठे तसेच राना-वनात असलेले पाणवठे कोरडेठाक पडल्याने वन्य प्राणी पाण्याच्या शोधार्थ शहराकडे वळत आहेत. हरीण, कोल्हे, लांडगे, मोर, नील गायी आदी विविध प्राणी गाववस्तीकडे येत असल्याने ग्रामस्थही दहशतीखाली आहेत. दोन दिवसांपूर्वी बदनापूर तालुक्यातील चनेगाव शिवारात बिबट्या सदृश्य प्राण्याने दोन जणांवर हल्ला करून गंभीर जखमी केले होते. जिल्ह्यातील दक्षिण व उत्तर वन विभागाचे आठ तालुक्यांत मिळून ९ हजार हेक्टर पेक्षा जास्त वनक्षेत्र आहे. वन क्षेत्रात हजारो वन्य प्राण्यांचे वास्तव्य असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात येते. प्रत्यक्ष आकडेवारीचा अनेकदा मेळ नसल्याने कोणते प्राणी किती याची निश्चित माहिती वनविभागाकडेही उपलब्ध नाही. यंदा झालेल्या अल्प पावसामुळे जंगलांमध्ये असलेले नैसर्गिक तलाव तसेच जलसाठे जानेवारीतच आटले. जालना तालुक्यात ८ पेक्षा अधिक पाणवठे आहेत. यात जालना शहर परिसरात दोन, दरेगाव वन शिवारात ४, हदगाव २, बावणेपांगरी एक असे पाणवठे आहेत. चार तालुके मिळून १४ वनतळे बांधण्यात आली आहेत. गरजेनुसार येथे पाणीपुरवठा केला जातो. उत्तर विभागात जालना, बदनापूर, जाफराबाद व बदनापूर हे तालुके येतात. या चार तालुक्यांत हरणे, कोल्हे, लांडगे, मोर व नील गायी आहे. याची मोजणी नसली तरी हे प्रमाण हजारोंच्या घरात असल्याचे वन अधिकारी एम.आर. निकुंभ यांनी सांगितले. काही सामाजिक संघटनाही वन्य प्राण्यांच्या पाण्यासाठी पुढाकार घेत असल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)बदनापूर तालुक्यातील चनेगाव शिवारात मंगळवारी बिबट्या सदृश वन्यप्राणी पाण्याच्या शोधात लोकवस्तीकडे आला होता. त्याच्या हल्ल्यात दोन ग्रामस्थ गंभीर जखमी झाले होते. प्रत्यक्षात हा प्राणी बिबट्याऐवजी तडस असावा, असा वनविभागाचा प्राथमिक अंदाज आहे. मंगळवारी २० वन कर्मचाऱ्यांनी चनेगाव शिवाराचा संपूर्ण परिसर पिंजून काढत या प्राण्याचा शोध घेतला. बुधवारी सकाळी तेथे पिंजरा लावण्यात आला. ४त्या ठिकाणी पाच कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. या प्राण्याचा कसून शोध घेतला जात आहे. दरम्यान, मंगळवारी चनेगाव येथील ग्रामस्थांनी धाव घेतल्यानंतर बिबट्याने धामणगाव शिवाराकडे धूम ठोकली, असे कडूबा तायडे, अनिल तायडे, कृष्णा घुगे, ज्ञानेश्वर गुळमकर, गणेश मुटकूळे जगन मुटकूळे या प्रत्यक्षदर्शींनी सांगितले असले तरी वनविभागाचा दावा वेगळा असल्याचे सांगण्यात आले. ४बिबट्या सदृश प्राणी बुलडाणा जिल्ह्यातील धाड वा इतर गावातून तसेच भोकरदनच्या सीमेवरील धावडा, मेहगाव, जाळीचा देव जंगलातून आला असावा. दोन दिवसांपासून रेकी सुरू आहे. लवकरच या प्राण्याचा आम्ही शोध लावू असा दावा वन अधिकारी निकुंभ यांनी केला. चनेगाव शिवारात हिंस्त्र श्वापद लक्षात घेता एकाट्याने फिरू नये गटागटाने जावे, काही आढळ्यास वन विभागाशी संपर्क साधावा.