शहरं
Join us  
Trending Stories
1
मेक्सिकोमध्ये GenZचे जोरदार आंदोलन, तरूण रस्त्यावर का उतरले? इतका तीव्र संताप कशासाठी?
2
Shubman Gill Hospitalised : शुभमन गिलला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ; BCCI नं दिली मोठी अपडेट
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेेंबर २०२५: आर्थिक लाभ होतील, मित्र व स्नेह्यांची भेट आनंददायी राहील.
4
पाकिस्तानची सौदी अरेबियानंतर आता आणखी एका मुस्लिम देशाशी हातमिळवणी? नवा 'प्लॅन' काय?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना घवघवीत यश, मनसोक्त जगण्याचा काळ; नोकरीत प्रगती, इच्छापूर्ती!
6
'प्रेम? ही तर ओव्हररेटेड भावना', धनुषच्या उत्तराने सर्वच चकित; क्रिती म्हणाली, 'मला नाही वाटत...'
7
'वाराणसी' एस एस राजामौलींच्या सिनेमाचं टायटल घोषित, महेश बाबूचा व्हिडीओ टीझर आऊट
8
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
9
Kalyan: रेल्वेतून पडून जखमी; डॉक्टरांनी घरी पाठवले, काही तासांत मृत्यू!
10
ड्रायव्हिंग टेस्ट फक्त नावापुरती! मुंबई RTO मध्ये स्टिअरिंगवर हात ठेवताच मिळतंय लायसन्स
11
JJ Hospital: जेजे रुग्णालयाची कॅन्सर रुग्णांसाठी ११ एकर जागेची मागणी!
12
Mumbai: मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळा येथे बांधकाम सुरू असताना माती कोसळली; २ ठार, ३ जखमी
13
Court: राजकारण्यांवरील खटल्यांचा निपटारा करा! महाराष्ट्र, गोव्यातील ४७८ प्रकरणांवर हायकोर्टाचे आदेश
14
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
15
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
16
Vasai: बालदिनीच क्रूर शिक्षा! शाळेत उशिरा आली म्हणून १०० उठाबशा, विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
17
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
18
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
19
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
20
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
Daily Top 2Weekly Top 5

मदत केली नाही, तर ‘त्या’ दोन संस्थांवर सक्त कारवाईचा खंडपीठाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 23:12 IST

खंडपीठाच्या यापूर्वीच्या आदेशानुसार वाल्मी आणि शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय यांनी सुखना आणि खाम नदीमधील अतिक्रमणांच्या निश्चितीसाठी मोजणी करण्यास सहकार्य केले नाही, तर त्यांच्यावर सक्तीची कारवाई करण्यात येईल, असे औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस.व्ही. गंगापूरवाला आणि न्या. आर.जी. अवचट यांनी बुधवारी (दि.२१) स्पष्ट केले. याचिकेवर दोन आठवड्यांनंतर पुढील सुनावणी होणार आहे.

ठळक मुद्देसुखना आणि खाम नदीमधील अतिक्रमणांचे प्रकरण ; वाल्मी आणि शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाला इशारा

औरंगाबाद : खंडपीठाच्या यापूर्वीच्या आदेशानुसार वाल्मी आणि शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय यांनी सुखना आणि खाम नदीमधील अतिक्रमणांच्या निश्चितीसाठी मोजणी करण्यास सहकार्य केले नाही, तर त्यांच्यावर सक्तीची कारवाई करण्यात येईल, असे औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस.व्ही. गंगापूरवाला आणि न्या. आर.जी. अवचट यांनी बुधवारी (दि.२१) स्पष्ट केले. याचिकेवर दोन आठवड्यांनंतर पुढील सुनावणी होणार आहे.खाम आणि सुखना नदीपात्रातील अतिक्रमणे निश्चित करण्याची जबाबदारी पूर्ण करण्यात वाल्मी आणि शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सहकार्य करीत नसल्याचे सुनावणीदरम्यान निदर्शनास आणून देण्यात आले असता खंडपीठाने वरीलप्रमाणे आदेश दिला.सुखना व खाम नदीपात्रातील अतिक्रमणे काढून टाकण्यासंदर्भात अ‍ॅड. नरसिंग जाधव यांनी (पार्टी इन पर्सन) याचिका दाखल केली आहे. यापूर्वी खंडपीठाने नदीपात्रातील वीटभट्ट्या काढण्याचा आदेश महापालिकेला दिला होता. त्याअनुषंगाने १९७० साली या दोन्ही नद्यांचे काढलेले नकाशे यापूर्वी खंडपीठात सादर करण्यात आले होते. औरंगाबादचे अधीक्षक भूमी अभिलेख नसीम बानो आणि उपअभियंता (लघु पाटबंधारे) दिलीप साठे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन सद्य:स्थितीतील अतिक्रमणांची संख्या स्पष्ट केली होती. अ‍ॅड. जाधव यांनी सुरुवातीस सुखना नदीवरील वीटभट्ट्यांची अतिक्रमणे काढण्याबाबत याचिका दाखल केली होती. त्यानंतर त्यांनी दोन्ही नद्यांमधील मानवनिर्मित अतिक्रमणे संपूर्णपणे काढून टाकण्याची विनंती केली होती. अतिक्रमणांमुळे नद्यांचे पात्र अरुंद होऊन पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाणी कमी पडते आहे. औद्योगिक वसाहतीमधील कंपन्यांमधून नदीमध्ये सोडण्यात येणाऱ्या दूषित पाण्यामुळे नदीचे पाणी प्रदूषित होत आहे. सर्व कंपन्यांनी नदीमध्ये दूषित पाणी सोडू नये, असे आदेश देण्याचीही विनंती त्यांनी केली आहे. सहायक सरकारी वकील मंजूषा देशपांडे, महापालिकेतर्फे अ‍ॅड. जयंत शहा आणि प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे अ‍ॅड. पी.पी. मोरे काम पाहत आहेत.

टॅग्स :Courtन्यायालयAurangabadऔरंगाबाद