शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
2
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
3
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
4
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
5
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
6
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
7
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
8
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
9
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
10
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
11
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
12
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
13
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
14
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
15
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
16
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
17
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
18
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
19
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
20
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण

मोफत विजेचा निर्णय झाला तर शहरात दीड लाख ग्राहकांना फायदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2020 14:22 IST

जिल्ह्यात ० ते १०० युनिटच्या ग्राहकांची संख्या २ लाख ६१ हजार

ठळक मुद्दे० ते १०० युनिट विजेचा वापर करणाऱ्या ग्राहकांची संख्या सर्वाधिक सर्वसामान्य गरीब नागरिकांचा यामध्ये मोठ्या प्रमाणात समावेश आहे.

औरंगाबाद : दिल्लीत आम आदमी पक्षाने ० ते १०० युनिट मोफत वीज देण्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. या निर्णयाच्या आधारावर दिल्लीत आम आदमी पक्षाने तिसऱ्यांदा सत्ता मिळविली. महाराष्ट्रातील  महाविकास आघाडी सरकारही राज्यात घरगुती ग्राहकांना मोफत वीज देण्याचा विचार करीत आहे. भविष्यात शासनाने हा निर्णय घेतल्यास औरंगाबाद शहरातच १ लाख ६६ हजार, तर जिल्ह्यात २ लाख ६१ हजार घरगुती वीज ग्राहकांना फायदा होऊ शकतो.

वीज वितरण कंपनीतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ० ते १०० युनिट विजेचा वापर करणाऱ्या ग्राहकांची संख्या सर्वाधिक आहे. सर्वसामान्य गरीब नागरिकांचा यामध्ये मोठ्या प्रमाणात समावेश आहे. राज्य शासनाने मोफत वीज देण्याचा निर्णय घेतल्यास वीज वितरण कंपनीला दरमहा कोट्यवधी रुपयांचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागेल. राज्य शासन या मोबदल्यात वीज कंपनीला काही रक्कम देणार का? यावरही बरेच काही अवलंबून आहे. शंभर टक्के विजेचे वसुली होत नाही. लाईन लॉसचे प्रमाण जास्त असल्याने अगोदरच वीज कंपनी संकटात आहे. त्यात मोफत विजेचा भार कंपनीला सहन होणार नसल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. कंपनीतील अनावश्यक खर्च कमी करा, असे वारंवार वरिष्ठांकडून सांगण्यात येते. कितीही प्रयत्न केले तरी हा खर्च कमी होत नाही. अत्यावश्यक कामांवर आणि आणीबाणीच्या परिस्थितीत कोट्यवधी रुपये कंपनीस खर्च करावेच लागतात. नैसर्गिक आपती, उन्हाळ्यात  ट्रान्स्फॉर्मर खराब होणे, तारा वितळणे हे प्रमाणही बरेच आहे.

४ रुपये ३३ पैसे एका युनिटचे दरऔरंगाबाद शहरात ० ते १०० युनिटपर्यंत एका युनिटचे दर वहन आकारासह ४ रुपये ३३ पैसे आकारण्यात येतात. १०० युनिटचे बिल ७७० रुपये होते. अनेक ग्राहक शंभर युनिट विजेचा वापरच करीत नाहीत. ५० ते ७० मध्ये बहुतांश ग्राहकांचा समावेश असतो. काही ग्राहक ९० पर्यंत जातात.

शहरात १२ कोटी ८३ लाखऔरंगाबाद शहातील १ लाख ६६ ग्राहकांना मोफत वीज देण्याचा निर्णय घेतल्यास वीज कंपनीला १२ कोटी ८३ लाख रुपयांवर पाणी फेरावे लागेल. जिल्ह्यातील ग्राहकांची संख्या २ लाख ६१ हजार ७६ ग्राहकांना मोफत वीज दिल्यास २० कोटी १० लाख वीज कंपनीच्या तिजोरीत येणार नाहीत. एकूणच औरंगाबाद जिल्ह्यात वीज कंपनीला ३३ ते ३४ कोटी रुपये माफ करावे लागतील.

टॅग्स :electricityवीजAurangabadऔरंगाबादState Governmentराज्य सरकारmahavitaranमहावितरण