शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
2
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
3
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
4
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
5
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
6
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
7
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
8
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
9
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
10
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
11
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
12
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
13
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
14
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
15
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
16
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
17
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
18
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
19
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
20
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
Daily Top 2Weekly Top 5

मोफत विजेचा निर्णय झाला तर शहरात दीड लाख ग्राहकांना फायदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2020 14:22 IST

जिल्ह्यात ० ते १०० युनिटच्या ग्राहकांची संख्या २ लाख ६१ हजार

ठळक मुद्दे० ते १०० युनिट विजेचा वापर करणाऱ्या ग्राहकांची संख्या सर्वाधिक सर्वसामान्य गरीब नागरिकांचा यामध्ये मोठ्या प्रमाणात समावेश आहे.

औरंगाबाद : दिल्लीत आम आदमी पक्षाने ० ते १०० युनिट मोफत वीज देण्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. या निर्णयाच्या आधारावर दिल्लीत आम आदमी पक्षाने तिसऱ्यांदा सत्ता मिळविली. महाराष्ट्रातील  महाविकास आघाडी सरकारही राज्यात घरगुती ग्राहकांना मोफत वीज देण्याचा विचार करीत आहे. भविष्यात शासनाने हा निर्णय घेतल्यास औरंगाबाद शहरातच १ लाख ६६ हजार, तर जिल्ह्यात २ लाख ६१ हजार घरगुती वीज ग्राहकांना फायदा होऊ शकतो.

वीज वितरण कंपनीतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ० ते १०० युनिट विजेचा वापर करणाऱ्या ग्राहकांची संख्या सर्वाधिक आहे. सर्वसामान्य गरीब नागरिकांचा यामध्ये मोठ्या प्रमाणात समावेश आहे. राज्य शासनाने मोफत वीज देण्याचा निर्णय घेतल्यास वीज वितरण कंपनीला दरमहा कोट्यवधी रुपयांचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागेल. राज्य शासन या मोबदल्यात वीज कंपनीला काही रक्कम देणार का? यावरही बरेच काही अवलंबून आहे. शंभर टक्के विजेचे वसुली होत नाही. लाईन लॉसचे प्रमाण जास्त असल्याने अगोदरच वीज कंपनी संकटात आहे. त्यात मोफत विजेचा भार कंपनीला सहन होणार नसल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. कंपनीतील अनावश्यक खर्च कमी करा, असे वारंवार वरिष्ठांकडून सांगण्यात येते. कितीही प्रयत्न केले तरी हा खर्च कमी होत नाही. अत्यावश्यक कामांवर आणि आणीबाणीच्या परिस्थितीत कोट्यवधी रुपये कंपनीस खर्च करावेच लागतात. नैसर्गिक आपती, उन्हाळ्यात  ट्रान्स्फॉर्मर खराब होणे, तारा वितळणे हे प्रमाणही बरेच आहे.

४ रुपये ३३ पैसे एका युनिटचे दरऔरंगाबाद शहरात ० ते १०० युनिटपर्यंत एका युनिटचे दर वहन आकारासह ४ रुपये ३३ पैसे आकारण्यात येतात. १०० युनिटचे बिल ७७० रुपये होते. अनेक ग्राहक शंभर युनिट विजेचा वापरच करीत नाहीत. ५० ते ७० मध्ये बहुतांश ग्राहकांचा समावेश असतो. काही ग्राहक ९० पर्यंत जातात.

शहरात १२ कोटी ८३ लाखऔरंगाबाद शहातील १ लाख ६६ ग्राहकांना मोफत वीज देण्याचा निर्णय घेतल्यास वीज कंपनीला १२ कोटी ८३ लाख रुपयांवर पाणी फेरावे लागेल. जिल्ह्यातील ग्राहकांची संख्या २ लाख ६१ हजार ७६ ग्राहकांना मोफत वीज दिल्यास २० कोटी १० लाख वीज कंपनीच्या तिजोरीत येणार नाहीत. एकूणच औरंगाबाद जिल्ह्यात वीज कंपनीला ३३ ते ३४ कोटी रुपये माफ करावे लागतील.

टॅग्स :electricityवीजAurangabadऔरंगाबादState Governmentराज्य सरकारmahavitaranमहावितरण