शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
3
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
4
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
5
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
6
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
7
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
8
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
9
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
10
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
11
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
12
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
13
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
14
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
15
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
16
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
17
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
18
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
19
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
20
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं

नगरसेवकांनी मनावर घेतले तर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 00:03 IST

लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : कचºयावरून शहरात एकीकडे रणकंदन माजले आहे. परंतु दुसरीकडे शहरातील ठाकरेनगर व पवननगर हे वॉर्ड ...

ठळक मुद्देआदर्श उपक्रम : ठाकरेनगर, पवननगरात ओल्या कचºयापासून खतनिर्मिती

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : कचºयावरून शहरात एकीकडे रणकंदन माजले आहे. परंतु दुसरीकडे शहरातील ठाकरेनगर व पवननगर हे वॉर्ड असे आहेत की, त्यांना नारेगावकरांनी केलेल्या ‘कचरा कोंडी’शी काहीच सोयरसुतक नाही. या वॉर्डात मागील दोन वर्षांपासून ओल्या कचºयापासून खत तयार केला जात असून, ते शेतकºयांना मोफत दिले जात आहे.नारेगावच नाही तर शहराच्या आसपासच्या कोणत्याही गावातील गावकरी कचरा टाकून देण्यास तयार नाहीत. नारेगावात कचरा टाकू नये, असा स्पष्ट आदेश न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे शहरात कचरा कोंडी झाली आहे. या पार्श्वभूमीवर बोटावर मोजण्याइतकेच काही वॉर्ड शहरवासीयांसाठी मार्गदर्शक ठरले आहेत. या वॉर्डात निघणाºया कचºयाची विल्हेवाट वॉर्डातच लावली जाते. यात पवननगरात (वॉर्ड क्र.३०) २०१५ पासून वर्गीकरण करून ओल्या कचºयाचे खत तयार केले जात आहे. मागील तीन वर्षांपासून येथील नागरिक ओला कचरा व सुका कचरा वेगवेगळा करूनच घंटागाडीत टाकतात. सर्व कचरा फरशी मैदानावर आणला जातो. मैदानाच्या कडेला ११ खड्डे करण्यात आले आहेत. त्यात ओला कचरा टाकण्यात येतो. सात दिवसांनंतर तयार झालेले खत शेतकºयांना मोफत दिल्या जाते. सुक्या कचºयामध्ये प्लास्टिक, लोखंड, कागद हे विक्री केले जातात. याच पद्धतीने ठाकरेनगरातील (वॉर्ड क्र. ८१) छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा मैदानात ओल्या कचºयापासून खत तयार करण्यासाठी मोठे खड्डे के ले आहेत. येथेही दर आठवड्याला तयार झालेले खत शेतकºयांना मोफत दिल्या जाते. तसेच सुका कचरा भंगारात विकल्या जातो. हा सुका कचरा घेण्यासाठी भंगार विक्रेते मैदानात गाडी घेऊन येतात व तेथेच वजन करून त्याचे पैसे स्वच्छता कर्मचाºयांना देतात. शहरात जागोजागी कचºयाचे ढिगारे लागले असताना हे वॉर्ड स्वच्छ आहेत. येत्या काळात प्रत्येक वॉर्डात अशाच प्रकारे कचºयाचे वर्गीकरण करून त्याची विल्हेवाट लावावी लागेल.मात्र, त्यासाठी वॉर्डाचा कायापालट करण्याचा निर्णय नगरसेवकांना घ्यावा लागणार आहे. नगरसेवक व नंतर रहिवाशांची मानसिकता बदलावी लागणार आहे. तरच कचरामुक्त व स्वच्छ शहराची कल्पना प्रत्यक्षात उतरेल. कोणत्याही नेत्याला चीनमध्ये जाण्याची गरज पडणार नाही.दोन वर्षांपासून वॉर्डात होते कचºयाचे खतमागील दोन वर्षांपासून ठाकरेनगर वॉर्डात आम्ही ओल्या व सुक्या कचºयाचे वर्गीकरण करीत आहोत व मनपाच्या मैदानातच कोपºयात खड्डे खोदून तेथे ओल्या कचºयापासून खतनिर्मिती करीत आहोत. दररोज २ ते ३ टन कचºयाची येथे खतनिर्मिती केली जाते. ६ महिन्यांपूर्वी मनपाला ३५ लाख रुपयांचे बजेट असलेले प्रकल्पाचे सादरीकरण केले होते. यात ओल्या व सुक्या कचºयाची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी, सोयी-सुविधा पुरविण्यासाठीच्या उपाययोजना होत्या. मात्र, मनपा प्रशासनाने प्रस्ताव लालफितीत ठेवला आहे.-दामूअण्णा शिंदे, माजी नगरसेवक (ठाकरेनगर वॉर्ड)दररोज ६ टन कचºयाची योग्य पद्धतीने विल्हेवाटमागील तीन वर्षांपासून पवननगर वॉर्डात दररोज ५.५० लाख ते ६ लाख टन कचºयाचे वर्गीकरण करून त्याची विल्हेवाट लावली जात आहे. यासाठी फरशी मैदानावर ११ खड्डे तयार करण्यात आले. त्यात ४ टन ओल्या कचºयापासून खतनिर्मिती केली जाते. दररोज सुमारे ५ हजार रुपयांचा सुका कचरा (ज्यात भंगार असते) विकल्या जातो. त्याचे पैसे स्वच्छता कर्मचाºयांना वाटून दिले जातात. खत शेतकºयांना मोफत दिल्या जाते. मागील तीन वर्षांत पवननगर वॉर्डातून नारेगाव येथे कचरा पाठविण्यात आला नाही. वॉर्डातच त्याचे विघटन करण्यात आले. यासाठी नागरिकांची मानसिकता तयार करावी लागली. -नितीन चित्ते, नगरसेवक (पवननगर वॉर्ड)