शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

उद्धव ठाकरेंना जाऊन सांगणार, खैरेंना लोकसभेचे तिकीट देऊ नका- हुसेन दलवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 01:26 IST

मी मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन सांगणार आहे की, चंद्रकांत खैरे यांना आगामी लोकसभा निवडणुकीचे शिवसेनेचे तिकीट देऊ नका. खैरेंची प्रतिमा बिघडली आहे. हा माणूस दंगली भडकवत फिरतोय, अशी तक्रार मी ठाकरे यांच्याकडे करणार आहे.’ असे हुसेन दलवाई यांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : ‘आज मी औरंगाबादेतील दंगलग्रस्त भागाची पाहणी केली. खा. चंद्रकांत खैरे आणि लच्छू पहिलवान यांनीच दंगल भडकावली, अशी तक्रार नागरिकांनी माझ्याकडे केली. मात्र, या दोघांनाही हात लावायला पोलीस अद्याप तयार नाहीत. या दोघांवर पोलिसांनी तातडीने कारवाई केली पाहिजे. शिवाय मी मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन सांगणार आहे की, चंद्रकांत खैरे यांना आगामी लोकसभा निवडणुकीचे शिवसेनेचे तिकीट देऊ नका. खैरेंची प्रतिमा बिघडली आहे. हा माणूस दंगली भडकवत फिरतोय, अशी तक्रार मी ठाकरे यांच्याकडे करणार आहे.’ असे काँग्रेसचे राज्यसभा सदस्य हुसेन दलवाई यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले....हे तर भाजपला आव्हानदलवाई म्हणाले की, हिंमत असेल तर माझ्यावर कारवाई करूनच दाखवा, असे आव्हान खा. खैरे देत आहेत. हे भाजपला आव्हान आहे. कारण गृहखाते खुद्द मुख्यमंत्र्यांकडे आहे. काँग्रेसचे सरकार असते, तर आतापर्यंत खैरेंना अटक झाली असती. कायद्यासमोर गुंड असो की पुंड, सारे सारखेच असतात. कायदा आणि सुव्यवस्थेचे रक्षण करणे हे पोलिसांचे कर्तव्य असते; परंतु औरंगाबादचे पोलीस शिवसेनेचे कार्यकर्ते असल्यासारखेच वागत आहेत. ते जर कायद्याचे पालन करू शकत नसतील, तर त्यांनी खाकी वर्दी उतरवून ठेवली पाहिजे. लच्छू पहिलवान गेल्या सहा महिन्यांपासून वातावरण बिघडवत होता. तो हप्तेखोरी करीत होता. त्याच्यावर तेव्हाच कारवाई झाली असती, तर कदाचित दंगल घडली नसती. आताही पोलीस जर लच्छू पहिलवानवर कारवाई करीत नसतील, तर या हप्तेखोरीत पोलिसांचा हात असावा, अशी शंका घ्यावी लागेल.‘जय श्रीराम’ची घोषणाऔरंगाबादची दंगल ही भाजप व शिवसेना यांच्यातील आपसातील सत्ता संघर्षावरून घडली आहे. पोलिसांची त्यांना साथ मिळालेली आहे. पोलिसांच्या गोळीबारात हरीस हा मुलगा दगावला, असे सांगत असले तरी त्याला पोलिसांनी मारून टाकले आहे, असा आमचा आरोप आहे. घरात त्याचे प्रेत पडलेले असताना पोलीस पुन्हा त्याच्याच घरी जाऊन कोम्बिंग आॅपरेशन करतात. त्यावेळी वर्दीतले पोलीस ‘जय श्रीराम’ची घोषणा देतात आणि विशिष्ट समाजाला अर्वाच्य शिवीगाळ करतात, हे फार भयानक आहे, अशी जळजळीत प्रतिक्रियाही दलवाई यांनी दिली.एमआयएम हा पक्ष नव्हे. हा काही सेक्युलर फोर्स नाही. त्यामुळे जो-जो जातीयवादी आहे, त्याच्या विरोधात आम्ही ठामपणे उभे राहू, असेही दलवाई यांनी स्पष्ट केले व येथील खासदार लच्छू पहिलवानच्या पातळीला का जातात? असा सवाल करून आश्चर्य व्यक्तकेले.यावेळी युसूफ अन्सारी, डॉ. पवन डोंगरे, मुद्दसर अन्सारी, आबेदा आपा, पंकजा माने आदींची उपस्थिती होती.

 

टॅग्स :Aurangabad Violenceऔरंगाबाद हिंसाचारHussein Dalwaiहुसेन दलवाई