शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

उद्धव ठाकरेंना जाऊन सांगणार, खैरेंना लोकसभेचे तिकीट देऊ नका- हुसेन दलवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 01:26 IST

मी मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन सांगणार आहे की, चंद्रकांत खैरे यांना आगामी लोकसभा निवडणुकीचे शिवसेनेचे तिकीट देऊ नका. खैरेंची प्रतिमा बिघडली आहे. हा माणूस दंगली भडकवत फिरतोय, अशी तक्रार मी ठाकरे यांच्याकडे करणार आहे.’ असे हुसेन दलवाई यांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : ‘आज मी औरंगाबादेतील दंगलग्रस्त भागाची पाहणी केली. खा. चंद्रकांत खैरे आणि लच्छू पहिलवान यांनीच दंगल भडकावली, अशी तक्रार नागरिकांनी माझ्याकडे केली. मात्र, या दोघांनाही हात लावायला पोलीस अद्याप तयार नाहीत. या दोघांवर पोलिसांनी तातडीने कारवाई केली पाहिजे. शिवाय मी मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन सांगणार आहे की, चंद्रकांत खैरे यांना आगामी लोकसभा निवडणुकीचे शिवसेनेचे तिकीट देऊ नका. खैरेंची प्रतिमा बिघडली आहे. हा माणूस दंगली भडकवत फिरतोय, अशी तक्रार मी ठाकरे यांच्याकडे करणार आहे.’ असे काँग्रेसचे राज्यसभा सदस्य हुसेन दलवाई यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले....हे तर भाजपला आव्हानदलवाई म्हणाले की, हिंमत असेल तर माझ्यावर कारवाई करूनच दाखवा, असे आव्हान खा. खैरे देत आहेत. हे भाजपला आव्हान आहे. कारण गृहखाते खुद्द मुख्यमंत्र्यांकडे आहे. काँग्रेसचे सरकार असते, तर आतापर्यंत खैरेंना अटक झाली असती. कायद्यासमोर गुंड असो की पुंड, सारे सारखेच असतात. कायदा आणि सुव्यवस्थेचे रक्षण करणे हे पोलिसांचे कर्तव्य असते; परंतु औरंगाबादचे पोलीस शिवसेनेचे कार्यकर्ते असल्यासारखेच वागत आहेत. ते जर कायद्याचे पालन करू शकत नसतील, तर त्यांनी खाकी वर्दी उतरवून ठेवली पाहिजे. लच्छू पहिलवान गेल्या सहा महिन्यांपासून वातावरण बिघडवत होता. तो हप्तेखोरी करीत होता. त्याच्यावर तेव्हाच कारवाई झाली असती, तर कदाचित दंगल घडली नसती. आताही पोलीस जर लच्छू पहिलवानवर कारवाई करीत नसतील, तर या हप्तेखोरीत पोलिसांचा हात असावा, अशी शंका घ्यावी लागेल.‘जय श्रीराम’ची घोषणाऔरंगाबादची दंगल ही भाजप व शिवसेना यांच्यातील आपसातील सत्ता संघर्षावरून घडली आहे. पोलिसांची त्यांना साथ मिळालेली आहे. पोलिसांच्या गोळीबारात हरीस हा मुलगा दगावला, असे सांगत असले तरी त्याला पोलिसांनी मारून टाकले आहे, असा आमचा आरोप आहे. घरात त्याचे प्रेत पडलेले असताना पोलीस पुन्हा त्याच्याच घरी जाऊन कोम्बिंग आॅपरेशन करतात. त्यावेळी वर्दीतले पोलीस ‘जय श्रीराम’ची घोषणा देतात आणि विशिष्ट समाजाला अर्वाच्य शिवीगाळ करतात, हे फार भयानक आहे, अशी जळजळीत प्रतिक्रियाही दलवाई यांनी दिली.एमआयएम हा पक्ष नव्हे. हा काही सेक्युलर फोर्स नाही. त्यामुळे जो-जो जातीयवादी आहे, त्याच्या विरोधात आम्ही ठामपणे उभे राहू, असेही दलवाई यांनी स्पष्ट केले व येथील खासदार लच्छू पहिलवानच्या पातळीला का जातात? असा सवाल करून आश्चर्य व्यक्तकेले.यावेळी युसूफ अन्सारी, डॉ. पवन डोंगरे, मुद्दसर अन्सारी, आबेदा आपा, पंकजा माने आदींची उपस्थिती होती.

 

टॅग्स :Aurangabad Violenceऔरंगाबाद हिंसाचारHussein Dalwaiहुसेन दलवाई