शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

उद्धव ठाकरेंना जाऊन सांगणार, खैरेंना लोकसभेचे तिकीट देऊ नका- हुसेन दलवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 01:26 IST

मी मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन सांगणार आहे की, चंद्रकांत खैरे यांना आगामी लोकसभा निवडणुकीचे शिवसेनेचे तिकीट देऊ नका. खैरेंची प्रतिमा बिघडली आहे. हा माणूस दंगली भडकवत फिरतोय, अशी तक्रार मी ठाकरे यांच्याकडे करणार आहे.’ असे हुसेन दलवाई यांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : ‘आज मी औरंगाबादेतील दंगलग्रस्त भागाची पाहणी केली. खा. चंद्रकांत खैरे आणि लच्छू पहिलवान यांनीच दंगल भडकावली, अशी तक्रार नागरिकांनी माझ्याकडे केली. मात्र, या दोघांनाही हात लावायला पोलीस अद्याप तयार नाहीत. या दोघांवर पोलिसांनी तातडीने कारवाई केली पाहिजे. शिवाय मी मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन सांगणार आहे की, चंद्रकांत खैरे यांना आगामी लोकसभा निवडणुकीचे शिवसेनेचे तिकीट देऊ नका. खैरेंची प्रतिमा बिघडली आहे. हा माणूस दंगली भडकवत फिरतोय, अशी तक्रार मी ठाकरे यांच्याकडे करणार आहे.’ असे काँग्रेसचे राज्यसभा सदस्य हुसेन दलवाई यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले....हे तर भाजपला आव्हानदलवाई म्हणाले की, हिंमत असेल तर माझ्यावर कारवाई करूनच दाखवा, असे आव्हान खा. खैरे देत आहेत. हे भाजपला आव्हान आहे. कारण गृहखाते खुद्द मुख्यमंत्र्यांकडे आहे. काँग्रेसचे सरकार असते, तर आतापर्यंत खैरेंना अटक झाली असती. कायद्यासमोर गुंड असो की पुंड, सारे सारखेच असतात. कायदा आणि सुव्यवस्थेचे रक्षण करणे हे पोलिसांचे कर्तव्य असते; परंतु औरंगाबादचे पोलीस शिवसेनेचे कार्यकर्ते असल्यासारखेच वागत आहेत. ते जर कायद्याचे पालन करू शकत नसतील, तर त्यांनी खाकी वर्दी उतरवून ठेवली पाहिजे. लच्छू पहिलवान गेल्या सहा महिन्यांपासून वातावरण बिघडवत होता. तो हप्तेखोरी करीत होता. त्याच्यावर तेव्हाच कारवाई झाली असती, तर कदाचित दंगल घडली नसती. आताही पोलीस जर लच्छू पहिलवानवर कारवाई करीत नसतील, तर या हप्तेखोरीत पोलिसांचा हात असावा, अशी शंका घ्यावी लागेल.‘जय श्रीराम’ची घोषणाऔरंगाबादची दंगल ही भाजप व शिवसेना यांच्यातील आपसातील सत्ता संघर्षावरून घडली आहे. पोलिसांची त्यांना साथ मिळालेली आहे. पोलिसांच्या गोळीबारात हरीस हा मुलगा दगावला, असे सांगत असले तरी त्याला पोलिसांनी मारून टाकले आहे, असा आमचा आरोप आहे. घरात त्याचे प्रेत पडलेले असताना पोलीस पुन्हा त्याच्याच घरी जाऊन कोम्बिंग आॅपरेशन करतात. त्यावेळी वर्दीतले पोलीस ‘जय श्रीराम’ची घोषणा देतात आणि विशिष्ट समाजाला अर्वाच्य शिवीगाळ करतात, हे फार भयानक आहे, अशी जळजळीत प्रतिक्रियाही दलवाई यांनी दिली.एमआयएम हा पक्ष नव्हे. हा काही सेक्युलर फोर्स नाही. त्यामुळे जो-जो जातीयवादी आहे, त्याच्या विरोधात आम्ही ठामपणे उभे राहू, असेही दलवाई यांनी स्पष्ट केले व येथील खासदार लच्छू पहिलवानच्या पातळीला का जातात? असा सवाल करून आश्चर्य व्यक्तकेले.यावेळी युसूफ अन्सारी, डॉ. पवन डोंगरे, मुद्दसर अन्सारी, आबेदा आपा, पंकजा माने आदींची उपस्थिती होती.

 

टॅग्स :Aurangabad Violenceऔरंगाबाद हिंसाचारHussein Dalwaiहुसेन दलवाई