शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

मी अस्वस्थतेला शब्द देतो : बालाजी सुतार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 13:10 IST

बी. रघुनाथ पुरस्कार  वितरण साधेपणाने 

ठळक मुद्देबालाजी सुतार यांनी यावेळी सद्य:स्थितीवर भाष्य केले व लेखनामागची प्रेरणा सांगितली.

औरंगाबाद : मी अस्वस्थतेला शब्द देतो, असे उद्गार प्रसिद्ध कथाकार बालाजी सुतार यांनी सोमवारी येथे काढले. यंदाचा ‘बी. रघुनाथ पुरस्कार’ स्वीकारताना ते बोलत होते. 

नाथ समूहाच्या कार्यालयात अत्यंत साधेपणाने हा पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न झाला. नाथ समूहाचे चेअरमन नंदकिशोर कागलीवाल यांच्या हस्ते रोख ११ हजार रुपये, शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सुतार यांचा सन्मान करण्यात आला. कोरोना आपत्तीमुळे यावर्षी नाथ संध्या हा कार्यक्रमही रद्द करण्यात आला. मागील २१ वर्षांपासून नाथ समूह आणि परिवर्तन यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.

बालाजी सुतार यांनी यावेळी सद्य:स्थितीवर भाष्य केले व लेखनामागची प्रेरणा सांगितली. ‘सरलेलं शतक आणि चालू शतक यांच्या सांध्यावरचा हा अस्वस्थ करणारा कालखंड. या काळाला शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न एक लेखक म्हणून मी करीत असतो,’ असे त्यांनी सांगितले. प्रा. डॉ. दासू वैद्य यांनी पुरस्कार निवडीमागची भूमिका स्पष्ट केली. आशय आणि अभिव्यक्ती या दोन्ही पातळीवर बालाजी सुतार यांचे लेखन अवला आहे, असे ते म्हणाले. श्रीकांत उमरीकर यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन केले. प्रा. अजित दळवी, अनुया दळवी, लक्ष्मीकांत धोंड, डॉ. आनंद निकाळजे, नीना निकाळजे व प्रा. मोहन फुले यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले. यावेळी सतीश कागलीवाल, सुनील देशपांडे, राजेंद्र जोशी, संतोष जोशी, शिव फाळके आदींची प्रमुख उपस्थिती होती. .............

टॅग्स :literatureसाहित्यAurangabadऔरंगाबाद