शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

जायकवाडी धरणावरील जलविद्युत प्रकल्प बंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 00:34 IST

‘एनओसी’ नाही : गोदापात्रातील बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे कारण

संजय जाधवपैठण : जायकवाडी धरणात मोठ्या प्रमाणात जलसाठा असताना धरणावरील जलविद्युत प्रकल्प महिनाभरापासून संबंधित विभागास बंद ठेवावा लागला आहे. यामुळे महिनाभरापासून या विद्युत प्रकल्पातून एकाही युनिटची भर विद्युत निर्मितीत पडलेली नाही. जायकवाडी प्रशासनाने विद्युत प्रकल्प चालू करण्यासाठी ‘एनओसी’ दिली नसल्याने विद्युत प्रकल्प बंद ठेवण्यात आला असल्याचे जलविद्युतचे कार्यकारी अभियंता उन्मेश पाटील यांनी सांगितले. दरम्यान, जायकवाडी प्रशासनाच्या वतीने गोदापात्रातील चनकवाडी बंधाºयाच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने विद्युत प्रकल्प बंद ठेवावा, असे आदेश विद्युत विभागास देण्यात आले आहेत, असे जायकवाडी प्रशासनाने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.जायकवाडी धरणातून विद्युत निर्मिती केल्यानंतर गोदावरी पात्रात पाणी सोडले जाते. हे पाणी खाली वाहून जाऊ नये म्हणून धरणाच्या खाली पाच किलोमीटर अंतरावर चनकवाडी येथे बंधारा बांधून पाणी थोपविण्यात आले आहे. दरम्यान, या बंधाºयाच्या खाली गोदावरी पात्रात आपेगाव येथे मोठा बंधारा बांधण्यात आला आहे. चनकवाडी बंधाºयाच्या गेटचे काम सुरू असल्याने विद्युत निर्मिती थांबविण्यात आली आहे. वास्तविक पाहता यानंतर लगेचच आपेगाव बंधारा असल्याने विद्युत निर्मितीनंतर सुटलेले पाणी या बंधाºयात थोपवले जाणार आहे. असे असतानाही केवळ पाणी वाया जाऊ नये म्हणून विद्युत निर्मिती बंद ठेवण्याचा निर्णय मोठा अजब असल्याचे मानले जात आहे.गोदावरी पात्रातील चनकवाडी बंधाºयाच्या गेट दुरुस्तीचे काम तब्बल महिनाभरापासून सुरू आहे. जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या वतीने अत्यंत संथगतीने बंधाºयाच्या दुरुस्तीचे काम करण्यात येत असून यामुळे महिनाभरापासून जलविद्युत प्रकल्प बंद ठेवण्यात आला आहे. जायकवाडी धरणात मोठ्या प्रमाणात जलसाठा असताना विद्युत निर्मिती बंद ठेवण्याची दुर्दैवी वेळ विद्युत विभागावर आली आहे.आपेगाव, हिरडपुरीसाठी पाणीसोडा -शेतकºयांची मागणीदरम्यान, जायकवाडी धरणातून आपेगाव व हिरडपुरीसाठी पाणी सोडा, अशी आग्रही मागणी शेतकºयांतून होत असून आपेगावच्या जि.प. सदस्या शिल्पा ज्ञानेश्वर कापसे व पैठण तालुक्यातील पदाधिकाºयांनी शासकीय स्तरावर केली आहे. यापूर्वीही जायकवाडी धरणातून आपेगाव व हिरडपुरीसाठी जायकवाडी प्रशासनास पाणी सोडावे लागले होते. यंदाही गोदाकाठच्या गावात टंचाई निर्माण झाल्याने पाणी सोडावेच लागणार आहे. त्यामुळे विद्युत निर्मितीनंतर गोदावरी पात्रात सुटणारे पाणी वाया जाणार नाही हे निश्चित आहे. या परिस्थितीत केवळ पाणी वाया जाणार म्हणून विद्युतप्रकल्प बंद ठेवण्याचा निर्णय जायकवाडी प्रशासनाने घेतल्याने विद्युत निर्मितीत तोटा झाला आहे.१२ मेगावॅट क्षमतेचा जायकवाडी धरणावरील जलविद्युत प्रकल्प आहे. या प्रकल्पातून जलविद्युत निर्मिती करताना जायकवाडी धरणातून पाणी गोदावरी पात्रात सोडले जाते. सोडलेले पाणी रात्रीच्या वेळेस पुन्हा प्रकल्पाचे टर्बाईन उलटे फिरवून गोदावरी पात्रातील पाणी धरणात ओढले जाते. या प्रक्रियेने पाण्याची बचत तर होतेच; परंतु गोदावरी पात्रात भाविकांना नेहमी स्वच्छ पाणी उपलब्ध राहते. महिनाभरापासून जलविद्युत प्रकल्प बंद पडला असून, धरणातून पाणी सुटणे व परत धरणात ओढण्याची प्रक्रिया बंद पडली आहे.आठ-पंधरा दिवसांत सुरू होणारचनकवाडी बंधाºयाची दुरुस्ती सुरू असून आणखी आठ ते पंधरा दिवसांचा कालावधी दुरुस्तीसाठी लागू शकतो. दुरुस्ती होताच जलविद्युत प्रकल्प सुरू होईल.-अशोक चव्हाणधरण अभियंता, जायकवाडी

टॅग्स :electricityवीजDamधरण