शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर भाजपाच्या नेत्यांना विचारूनच राष्ट्रवादीचे विलिनीकरण”; अजितदादांच्या नेत्यांचे विधान
2
शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून दाखवा; मंत्री नितेश राणेंचं राज ठाकरेंना आव्हान
3
२ मुख्यमंत्र्यांना अटक करून चर्चेत आलेले ईडीमधील दिग्गज अधिकाऱ्याने अचानक का दिला राजीनामा?
4
Reliance Q1 Results: ही आहे मुकेश अंबानींची जादू; ३ महिन्यांत केली २६,९९४ कोटी रुपयांची कमाई, जाणून घ्या
5
Changur Baba : २२ बँक खाती, ६० कोटींचा व्यवहार... मुंबई ते पनामा मनी लाँड्रिंग नेटवर्क; छांगुर बाबा प्रकरणात मोठा खुलासा
6
धक्कादायक! ठाण्यात रेल्वे प्लॅटफॉर्मवर महिलेवर बलात्काराचा प्रयत्न, विरोध करताच मालगाडीसमोर ढकललं
7
ऋतुराज गायकवाडनं चांगली संधी गमावली! आयत्या वेळी इंग्लंडला न जाण्याचा निर्णय घेत संघाला दिला धक्का
8
मुलींसाठी पार्टनरने घेतली होती खेळणी, पण रशियन महिलेची भेटच झाली नाही; गुहेतील कुटुंबाबत नवी माहिती
9
या देशात दोन भारतीय नागरिकांची हत्या, एकाचे दहशतवाद्यांनी अपहरण केले; दूतावास अ‍ॅक्शनमोडवर
10
अतूट नातं! "पतीची सेवा करणं हेच..."; पाठीवर घेऊन पत्नीने पूर्ण केली १५० किमीची कावड यात्रा
11
Video: संयुक्त राष्ट्राच्या कार्यक्रमात खणखणीत मराठीत भाषण; वर्षा देशपांडे यांचं होतंय कौतुक
12
मुंबईच्या रस्त्यांवरुन Ola-Uber आणि Rapido का आहेत गायब? जाणून घ्या का सुरुये बेमुदत संप
13
Asia Cup 2025 : आशिया कप स्पर्धेसंदर्भातील बैठकीला जाण्यास BCCI नाही तयार, कारण...
14
'गुगल अन् मेटा'च्या अडचणी वाढणार! ईडीने पाठवली नोटीस, ऑनलाइन बेटिंग अ‍ॅप प्रकरणात चौकशीसाठी बोलावले
15
“राज ठाकरे यांचे आव्हान दुबेला नाही, तर भाजपाला; आम्ही १०० टक्के एकत्र आहोत”: संजय राऊत
16
ठाकरे ब्रॅँड बाजारात चालत नाही, जनतेला आवडत नाही; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
17
पक्षातून मोठ्या प्रमाणात आऊटगोइंग सुरू आहे, त्याला उपाय काय? उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
18
“ठाकरे स्वार्थी नाही, प्रामाणिक-निर्भीड; ठाकरे ब्रँड पुसू इच्छिणारे पुसले गेले”: उद्धव ठाकरे
19
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंनी चूक कबूल केली, म्हणाले...
20
म्युच्युअल फंड KYC आता तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयातून करता येणार, कर्मचारी करणार तुमची मदत

जलविद्युत प्रकल्प सुरू

By admin | Updated: August 10, 2016 00:27 IST

पैठण : पाण्याच्या कमतरतेसह तांत्रिक कारणामुळे गेल्या वर्षभरापासून बंद असलेला जायकवाडी धरणावरील जलविद्युत प्रकल्प सोमवारपासून (दि.८) सुरू करण्यात झाला आहे.

पैठण : पाण्याच्या कमतरतेसह तांत्रिक कारणामुळे गेल्या वर्षभरापासून बंद असलेला जायकवाडी धरणावरील जलविद्युत प्रकल्प सोमवारपासून (दि.८) सुरू करण्यात झाला आहे. यामुळे जायकवाडी धरणाच्या खाली गोदावरी पात्रात पाणी सोडणे व गोदापात्रातील पाणी परत धरणात ओढणे ही प्रक्रिया सुरू झाली आहे. यामुळे गोदाकाठी धार्मिक विधी करणाऱ्यांत समाधानाचे वातावरण पसरले आहे.जायकवाडी प्रकल्पावरील जल विद्युत गेल्या वर्षी तांत्रिक बिघाडामुळे बंद पडला होता. त्यातच १४ मार्च २०१६ पासून जायकवाडी जोत्याखाली गेल्यामुळे हा प्रकल्प सुरू होऊ शकला नव्हता. जायकवाडीत पुरेसा पाणी साठा होताच, हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. या प्रकल्पातून १२ मेगावॅट विजेची निर्मिती होते. ही वीज नॅशनल ग्रीडला पुरविली जाते. जायकवाडी धरणात अपेक्षित जलसाठा झाल्यामुळे यंदा धरणातून सिंचनासाठी ठरल्याप्रमाणे रोटेशन देता येणार आहे. यामुळे जायकवाडी धरणाच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या शेतकऱ्यांत मोठे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. नाशिक जिल्ह्यातील धरण समूहातून जायकवाडीत येणाऱ्या पाण्याचा येवा घटला असून, अहमदनगर जिल्ह्यातील धरणातून नाममात्र पाणी जायकवाडीत दाखल होत आहे. गोदावरी व प्रवराचे मिळून जायकवाडीत सोमवारी २६,६६६ क्युसेक्स क्षमतेने आवक सुरू होती. ती मंगळवारी १३,००० क्युसेक्स एवढी घटली आहे. जायकवाडी धरणात मंगळवारी सायंकाळी ४९.६६% जलसाठा झाल्याचे धरण अभियंता अशोक चव्हाण यांनी सांगितले. नाशिक जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. यामुळे येथील धरण समूहातून विसर्ग नाममात्र ठेवण्यात आले. यामुळे गोदावरी पात्रात नांदुर मधमेश्वर धरणातून मंगळवारी केवळ १५,८४६ क्युसेक्स विसर्ग होत होता. नगरच्या पाण्याचा दिलासा अहमदनगर जिल्ह्यातील मुळा धरणातून सोडलेले पाणी रविवारी दुपारी गोदावरी नदीला प्रवरा संगम येथे येऊन मिळाले. मुळा धरणातून मंगळवारी ६,००० वरून ७,००० क्युसेक्स विसर्ग करण्यात आला. ओझर वेअरमधून सोडण्यात आलेला २,८३० क्युसेक्सचा विसर्ग मंगळवारी ५,६६१ करण्यात आला, हे पाणी जायकवाडी धरणात दाखल होत आहे.