शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

मराठवाड्याच्या विकासाची चर्चा करीत हैैदराबाद मुक्तिदिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 00:20 IST

‘मराठवाड्याचा विकास’ हा कळीचा विषय घेऊन आज दिवसभर नामवंत वक्त्यांनी व निमंत्रितांनी त्यावर नागेश्वरवाडी येथील स्वामी रामानंद तीर्थ संस्थेच्या सभागृहात सकाळपासून खल केला

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : ‘मराठवाड्याचा विकास’ हा कळीचा विषय घेऊन आज दिवसभर नामवंत वक्त्यांनी व निमंत्रितांनी त्यावर नागेश्वरवाडी येथील स्वामी रामानंद तीर्थ संस्थेच्या सभागृहात सकाळपासून खल केला. सकाळच्या सत्रात प्रा. डॉ. धनश्री महाजन यांनी ‘दांडेकर, इंडिकेटर ते केळकर समिती, पुढे काय?’ या विषयावर मांडणी केली. त्यानंतर प्राचार्य जीवन देसाई यांनी ‘मराठवाड्यातील शिक्षण’ या विषयावरची मांडणी केली.दुपारच्या सत्रात ‘मराठवाड्याचा औद्योगिक विकास’ यावर पॉवर प्रेझेंटेशन सादर केले. तर ‘पर्जन्याधारित शेती’ या विषयावरची सविस्तर मांडणी कृषितज्ज्ञ विजयअण्णा बोराडे यांनी केली. कडवंचीचे उदाहरण देत त्यांनी जमिनीच्या उताराप्रमाणे पाणलोट करा, असा सल्ला त्यांनी यावेळी दिला. डॉ. एस. बी. वराडे हे अध्यक्षस्थानी होते. त्या- त्या विषयांवर यावेळी प्रश्नोत्तरेही रंगली.प्रा. डॉ. सुधीर गव्हाणे हे बीजभाषण करणार होते. परंतु ते उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच प्रा. डी. एच. पवार यांचे ‘सिंचन व्यवस्थापन आणि उद्या’ या विषयावरचे भाषण होऊ शकले नाही.दळणवळणाच्या साधनांचा मोठा अभाव...विकासासाठी लागणाºया दळणवळणाच्या सोयी-सुविधांचा रस्ते आणि रेल्वेचा मराठवाड्यात कसा अभाव आहे, हे मुकुंद कुलकर्णी यांनी दाखवून दिले. मराठवाड्याच्या तुलनेत पश्चिम महाराष्टÑ व कोकणात दळणवळणाच्या सोयी अधिक आहेत, याकडे त्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. मराठवाड्यात ३६ एमआयडीसी आहेत. त्यापैकी औरंगाबाद, लातूर आणि बीड हे जिल्हे रोजगार निर्मितीचे जिल्हे आहेत, असे सांगून त्यांनी एमएसएमईचे धोरण बदलण्याची आवश्यकता प्रतिपादिली. कृषी आधारित उद्योग, एमएसएमई क्लस्टर, सरकारी विभाग बीपीओ, पर्यटन यावर भर देण्याचा सल्ला कुलकर्णी यांनी दिला. ड्रायपोर्ट यायला आणखी तीन चार वर्षे लागतील, असे त्यांचे म्हणणे पडले. त्यांनी आणखी सांगितले की, २०१६ नंतर देशातच गुंतवणुकीचे प्रमाण घटल्याचे दिसून येते. महाराष्टÑातही ही गुंतवणूक घटली असून, ती फक्त १० टक्के आहे. याचा अर्थ महाराष्टÑाचे स्पर्धक वाढले असा होतो.कोरडवाहू शेती परवडणारीविजयअण्णा बोराडे यांनी सांगितले की, कोरडवाहू म्हणजेच पर्जन्याधारित शेती. खरे तर कोरडवाहू शेती परवडणारी असते; पण आता ती परवडत नाही. कारण उत्पादन आणि खर्च याचा ताळमेळ नाही. आता शेतकºयाला प्रत्येक वेळी सरकारकडे जावे लागते. उत्पादन आणि खर्च याचे प्रमाण व्यस्त झाल्याने आज शेतकरी उद्ध्वस्त होताना दिसतोय. पूर्वीच्या काळात कोरडवाहू शेतीची तक्रार नव्हती. कोणतेही पीक आज पदरात पडतच नाही. खरे तर यावर संशोधन व्हायला हवे.हक्काच्या सहकाराची मधुर फळे आपण चाखू शकलो नाहीत आणि हक्काची एसटी बस बंद पाडायला निघालो. तसेच हक्काच्या शाळाही बंद पाडून इंग्रजी शाळांच्या प्रेमात पडतोय. सरकारलाही या जिल्हा परिषद आणि मनपाच्या शाळा बंदच पाडायच्या आहेत, असा आरोप बोराडे यांनी केला. या हक्काच्या शाळा त्या कोरडवाहू शेतकºयांच्या मुलांना घेऊ द्यायला पाहिजेत. आता त्याच बंद होत चालल्याने त्यांच्या मुलांनी शिकण्यासाठी जायचे कुठे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्यांनी आणखी सांगितले की, आज नाती सीमित होत चालली आहेत. घरात आजी-आजोबा, चुलते, चुलत्या, अशी विद्यापीठे आहेत, ती नामशेष होत चालली आहेत. एकत्र कुटुंब पद्धतीमुळे खर्चाला आळा बसत होता. आता तोे वाढतो. त्यामुळे आता नवी कुटुंब व्यवस्था उभी करण्याची गरज निर्माण झाली आहे.शेतकºयांच्या मालाला हमी भाव मिळू द्यायचा नाही, असा सरकारचाच प्रयत्न दिसतो. कारण सारा माल बाजारात गेल्यानंतर हमी भाव सुरू होतो. मागेल त्याला शेततळे शक्य नाही. पर्जन्यआधारित बागायतदार निर्माण झाला पाहिजे, यावर भर देत बोराडे यांनी कडवंची पॅटर्नचा आवर्जून उल्लेख केला. सारंग टाकळकर यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रा. मोहन फुले यांनी आभार मानले.प्राचार्य शरद अदवंत, जे.के. जाधव, उमेश दाशरथी, ना.वि. देशपांडे, प्राचार्य दिनकर बोरीकर, अ‍ॅड. डी.आर. शेळके, ज्ञानप्रकाश मोदाणी, ओमप्रकाश मोदाणी, अण्णा खंदारे, प्रताप बोराडे, श्रीराम वरूडकर, प्रा. संजय गायकवाड, पंजाबराव वडजे, मनोरमा शर्मा, अ‍ॅड. प्रदीप देशमुख, डॉ. संजय मून आदींनी यावेळी झालेल्या चर्चेत भाग घेतला.