शहरं
Join us  
Trending Stories
1
“कोणी कुणाला काढलंय तेच कळत नाही”; राज ठाकरेंचा ECवर निशाणा, मतदारयादीतील एकसमान नावंच वाचून दाखवली
2
'निवडणुकीत पराभव दिसू लागल्याने कारण शोधण्याचा खटाटोप'; शिष्ठमंडळाच्या बैठकीवर शंभूराज देसाईंची टीका
3
Gold Price Today 15 October: आजही सोन्यात तेजी, पण चांदीचे दर घसरले; पाहा १८,२२ आणि २४ कॅरेट सोन्याचे दर
4
Bihar Election JDU: चिराग पासवानांना नितीश कुमारांचा झटका; दावा केलेल्या जागांवरच उतरवले उमेदवार
5
"...तेव्हा तर अजित पवार तावातावाने बोलत होते"; मतदार याद्यांच्या घोळावरुन बोलताना राज ठाकरेंनी सुनावलं
6
अजब देश! संसद, सरकार, सैन्य सगळं आहे, पण जगाच्या नकाशावर अस्तित्वच नाही, कारण काय?
7
तामिळनाडूत हिंदी गाणी, चित्रपट आणि जाहिरातींवर बंदी; स्टॅलिन सरकारने आणले विधेयक
8
AFG vs BAN : वयाच्या चाळीशीत नबीनं रचला इतिहास; पाक खेळाडूच्या वर्ल्ड रेकॉर्डला लावला सुरुंग
9
Good News: महागाई ते ट्रेड डील पर्यंत... मोदी सरकारसाठी दोन दिवसांत आल्या एका पाठोपाठ एक ४ गुड न्यूज
10
'निवडणूक आयोगाची वेबसाईट बाहेरुन कोण तर चालवतंय', जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
"माझ्या नवऱ्याला मार, नाहीतर मी..."; ५ मुलांच्या आईचा हट्ट, बॉयफ्रेंडपेक्षा १२ वर्षांनी आहे मोठी
12
“माओवाद १०० टक्के संपणार, भूपतीची शरणागती मोठी गोष्ट”; CM फडणवीसांनी केले पोलिसांचे अभिनंदन
13
“राहुल गांधींनी मतदारयादीतील घोळ देश पातळीवर मांडला, हे निकोप लोकशाहीला घातक”: थोरात
14
Ranji Trophy : पृथ्वी शॉचा फ्लॉप शो! मुंबईकरासह चौघांच्या पदरी भोपळा पडल्यानं महाराष्ट्र संघ अडचणीत
15
"पत्नीला म्हणाले, बसमध्ये बसलोय", तो कॉल ठरला शेवटचा, जितेशचा होरपळून गेला जीव; ओळखही पटेना
16
तालिबानकडे मिसाईल कुठून आली? हल्ला होताच गाफिल पाकिस्तान हादरला; ६५ वर्षांपूर्वी...
17
Pankaj Dheer Death: 'महाभारत'मधील 'कर्ण' काळाच्या पडद्याआड, अभिनेते पंकज धीर यांचं कर्करोगानं निधन
18
बाबासाहेब पाटलांनी पालकमंत्रिपद सोडलं, त्यांच्या जागी 'या' नेत्याला मिळाली जबाबदारी
19
दिवाळीपूर्वी 'या' दिग्गज कंपनीचा मोठा झटका! १५ टक्के कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणार? काय आहे कारण?
20
Priyal Yadav : प्रेरणादायी! वडील तिसरी, आई सातवी पास; अकरावी नापास प्रियल कशी झाली डेप्युटी कलेक्टर?

हायब्रीड जातींनी संपविले ‘फूल आणि फुलांवरील भ्रमरांचे नाते’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 11:39 IST

ना कोणता सुगंध, ना त्यामध्ये कोणता मकरंद...

ठळक मुद्देगुलाब फुलांपासून दूर जात आहेत, भ्रमर आणि इतर कीटकमहाराष्ट्रात गावरान गुलाबासाठी पोषक वातावरण नाही.

- रुचिका पालोदकर 

औरंगाबाद : ‘व्हॅलेंटाईन डे’ची सगळ्यात सोपी, सुंदर आणि स्वस्तातील भेट म्हणजे गुलाबाची फुले. या फु लांमुळे दोन प्रेमी जीव एकत्र येत असले तरी ‘फूल आणि फुलांवरील भ्रमर’ हे नाते मात्र कायमचे दुरावत आहे. ना कोणता सुगंध, ना त्यामध्ये मकरंद. यामुळे बागेत फुललेले शेकडो हायब्रीड गुलाब पाहूनही बिचाऱ्या भ्रमराची परिस्थिती मात्र ‘दुरून फुले साजिरे’ अशीच आहे.

गावराण गुलाब आता बघायलाही मिळत नसल्यामुळे गुलाबालाही सुगंध असतो, हे येणारी पिढी कदाचित विसरूनही जाईल. वरवर बघता हा प्रकार अगदी किरकोळ वाटत असला, तरी याचा दूरगामी परिणाम फुलांवर वाढणारे भ्रमर, मधमाशा आणि पराग कणांचे सिंचन करणाऱ्या कीटकांच्या अनेक जाती- प्रजाती यांच्यावर होतो आहे. हा एक अतिसुक्ष्म रुपातील पर्यावरणीय परिणाम आहे, असे पर्यावरण अभ्यासक सांगतात. फुले आणि त्यातही गुलाबांच्या फुलांना कायमच मागणी असते. गावरान गुलाबासाठी १५ डिग्री सेल्सिअस इतके कमी तापमान लागते. त्यामुळे महाराष्ट्रात गावरान गुलाबासाठी पोषक वातावरण नाही. म्हणूनच वाढती मागणी आणि पुरवठा यात समतोल साधण्यासाठी मोठ्या प्रमाणावर हायब्रीड गुलाब वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे. व्हॅलेंटाईन डे, लग्नसराई, सणासुदीचे दिवस या काळात तर मागणी खूप जास्त वाढलेली असते. त्यामुळे एका गुलाबासाठी साधारण १५ ते २० रुपये एवढी किंमत मोजावी लागते.

रसायनांचा अधिक मारागावरान गुलाब हा कोणत्याही औषधाविना येतो. मात्र त्याचे आयुष्य कमी असल्यामुळे  आज बाजारात ८० ते ९० टक्के हायब्रीड  गुलाबच दिसतो आहे. आपल्या पुढच्या पिढीला गावरान गुलाब कदाचित बघताही येणार नाही. रसायनांच्या वापरामुळे हायब्रीड गुलाब जास्त टिकतात. पण रसायनांच्या अतिवापरामुळे या फुलांमधील मकरंद गावरान फुलांप्रमाणे नसतो. त्यामुळे भुंगे किंवा अन्य कीटकांचा त्यावर निभाव लागणे शक्य होत नाही. रसायनयुक्त मकरंद मधमाशांसाठी प्राणघातक ठरतो. शास्त्रज्ञ आइनस्टाईनच्या मते मधमाशा नष्ट झाल्या तर अवघ्या चार वर्षांत मानवी जात नष्ट होऊ शकते, यावरून या गोष्टीचे गांभीर्य लक्षात येते.                    - मिलिंद गिरधारी

भ्रमरांचा रसभंगहायब्रीड गुलाबांमध्ये इसेन्शिअल अ‍ॅरोमॅटिक आॅईलच्या ग्लॅण्डस् एकतर नसतात किंवा मग फार कमी असतात. मकरंद कमी असतो. त्यामुळे पराग सिंचन करणारे  कीटक याठिकाणी येत नाहीत. आले तरी आॅईल आणि मकरंद न मिळाल्याने त्यांचा भ्रमनिरास होतो. हायब्रीड फुले फक्त  शोभिवंत असतात. त्यातून त्यांना काहीही मिळत नाही. पण मराठवाड्यातील तापमान आणि आजची फु लांची गरज पाहता, हायब्रीड फुले लावणे गरजेचे झाले आहे. - प्रा. अरविंद धाबे 

टॅग्स :Valentine Dayव्हॅलेंटाईन्स डेAurangabadऔरंगाबादAgriculture Sectorशेती क्षेत्र