शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

हुश्श... दोन वेळा रद्द झालेल्या महाभरतीचे शुल्क परत मिळण्याचा मार्ग मोकळा

By विजय सरवदे | Updated: September 15, 2023 19:32 IST

अनेकांचा जीव भांड्यात; उमेदवारांना नमूद करावा लागेल अर्ज क्रमांक

छत्रपती संभाजीनगर : राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये विविध संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी शासनाने मार्च २०१९ आणि ऑगस्ट २०२१ मध्ये महाभारतीची घोषणा केली होती. त्यासाठी हजारो तरुणांनी रीतसर परीक्षा शुल्क भरून अर्ज केले; पण आतापर्यंत ती भरतीच झाली नाही. त्यामुळे उद्विग्न उमेदवारांकडून शुल्क परत मिळण्याविषयी आवाज उठविला. तथापि, तूर्तास तरी ६५ टक्के शुल्क परत करण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला असून त्यासाठी लिंक सुरू करण्यात आली आहे.

सुशिक्षित बेरोजगार तरुणांना संधी देण्याचा दावा करत शासनाने पुन्हा एकदा जिल्हा परिषदेतील विविध पदांसाठी मेगा भरतीची घोषणा केली. ५ ते २५ ऑगस्टदरम्यान या भरतीसाठी हजारो उमेदवारांनी पुन्हा एकदा अर्ज केले. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा पूर्वीचे शुल्क परत मिळण्याचा मुद्दा ऐरणीवर आला होता.

औरंगाबाद जि.प.मध्ये पूर्वी सन २०१९ च्या भरतीसाठी श्रेणी ‘क’मधील विविध १८ संवर्गाची पदे, तर ऑगस्ट २०२१ मध्ये विविध पाच संवर्गांची पदे भरण्याची जाहिरात प्रसिद्ध झाली होती. यासाठी खुल्या वर्गातील उमेदवारांनी ५०० रुपये, तर आरक्षित प्रवर्गाच्या उमेदवारांनी २५० रुपये परीक्षा शुल्क व अर्ज भरले होते. मात्र, जाहीर करण्यात आलेली दोन्ही वर्षांतील महाभरती रद्द झाली. त्यानंतर आजपर्यंत ना भरती झाली, ना अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांचे शुल्क परत मिळाले.

दरम्यान, आता ग्रामविकास विभागाने रद्द झालेल्या मागील महाभरतीसाठी अर्ज भरलेल्या उमेदवारांना शुल्क परत देण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी लिंक सुरू करण्यात आली आहे. शुल्क परत मिळण्यासाठी उमेदवारांना तेव्हाचा अर्ज क्रमांक लिंकमध्ये नमूद करावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना व उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शन तुपे यांनी केले आहे.

शुल्कापोटी ६५ टक्के रक्कम मिळणारऔरंगाबाद जिल्ह्यातील हजारो उमेदवारांचे तब्बल एक कोटी ३९ लाख ६७ हजार ७५० रुपये परीक्षा शुल्क जमा झाले होते. त्यापैकी शासनाने ६५ टक्के रक्कम अर्थात ९० लाख ७९ हजार ३८ रुपये परीक्षा शुल्क आपल्या जिल्हा परिषदेकडे पाठविले आहे. उर्वरित ३५ टक्के रकमेविषयी मात्र, प्रशासनही अनभिज्ञ आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादState Governmentराज्य सरकार