शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

हुश्श... दोन वेळा रद्द झालेल्या महाभरतीचे शुल्क परत मिळण्याचा मार्ग मोकळा

By विजय सरवदे | Updated: September 15, 2023 19:32 IST

अनेकांचा जीव भांड्यात; उमेदवारांना नमूद करावा लागेल अर्ज क्रमांक

छत्रपती संभाजीनगर : राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये विविध संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी शासनाने मार्च २०१९ आणि ऑगस्ट २०२१ मध्ये महाभारतीची घोषणा केली होती. त्यासाठी हजारो तरुणांनी रीतसर परीक्षा शुल्क भरून अर्ज केले; पण आतापर्यंत ती भरतीच झाली नाही. त्यामुळे उद्विग्न उमेदवारांकडून शुल्क परत मिळण्याविषयी आवाज उठविला. तथापि, तूर्तास तरी ६५ टक्के शुल्क परत करण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला असून त्यासाठी लिंक सुरू करण्यात आली आहे.

सुशिक्षित बेरोजगार तरुणांना संधी देण्याचा दावा करत शासनाने पुन्हा एकदा जिल्हा परिषदेतील विविध पदांसाठी मेगा भरतीची घोषणा केली. ५ ते २५ ऑगस्टदरम्यान या भरतीसाठी हजारो उमेदवारांनी पुन्हा एकदा अर्ज केले. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा पूर्वीचे शुल्क परत मिळण्याचा मुद्दा ऐरणीवर आला होता.

औरंगाबाद जि.प.मध्ये पूर्वी सन २०१९ च्या भरतीसाठी श्रेणी ‘क’मधील विविध १८ संवर्गाची पदे, तर ऑगस्ट २०२१ मध्ये विविध पाच संवर्गांची पदे भरण्याची जाहिरात प्रसिद्ध झाली होती. यासाठी खुल्या वर्गातील उमेदवारांनी ५०० रुपये, तर आरक्षित प्रवर्गाच्या उमेदवारांनी २५० रुपये परीक्षा शुल्क व अर्ज भरले होते. मात्र, जाहीर करण्यात आलेली दोन्ही वर्षांतील महाभरती रद्द झाली. त्यानंतर आजपर्यंत ना भरती झाली, ना अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांचे शुल्क परत मिळाले.

दरम्यान, आता ग्रामविकास विभागाने रद्द झालेल्या मागील महाभरतीसाठी अर्ज भरलेल्या उमेदवारांना शुल्क परत देण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी लिंक सुरू करण्यात आली आहे. शुल्क परत मिळण्यासाठी उमेदवारांना तेव्हाचा अर्ज क्रमांक लिंकमध्ये नमूद करावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना व उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शन तुपे यांनी केले आहे.

शुल्कापोटी ६५ टक्के रक्कम मिळणारऔरंगाबाद जिल्ह्यातील हजारो उमेदवारांचे तब्बल एक कोटी ३९ लाख ६७ हजार ७५० रुपये परीक्षा शुल्क जमा झाले होते. त्यापैकी शासनाने ६५ टक्के रक्कम अर्थात ९० लाख ७९ हजार ३८ रुपये परीक्षा शुल्क आपल्या जिल्हा परिषदेकडे पाठविले आहे. उर्वरित ३५ टक्के रकमेविषयी मात्र, प्रशासनही अनभिज्ञ आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादState Governmentराज्य सरकार