शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या सांगण्यावरून शिवसेना चालणार का?; संतप्त शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांचं पुण्यात आंदोलन
2
"ड्रग्ज... शिंदे... माजी पोलीस अधिकारी..., राज्याचं राजकारण नशेबाज झालंय!"; राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
3
पुन्हा राज्यसभेवर संधी मिळेल का? मोदी सरकारमधील सहा मंत्र्यांची 2026 मध्ये ‘अग्निपरीक्षा’
4
सरकारी कर्मचारी दांपत्यांना दिलासा! पती-पत्नीची एकाच शहरात नियुक्ती करण्याचे केंद्राचे निर्देश
5
Accident : भाड्याने थार घेतली, गर्लफ्रेंडला भेटायला निघाला; समोर कुटुंब दिसताच गाडी पळवू लागला अन्... 
6
Ola Electric ला सरकारकडून मिळणार ३६६.७८ कोटी रुपयांचा मोठा दिलासा; शेअरमध्ये जोरदार तेजी, जाणून घ्या
7
क्रिकेटमधील उल्लेखनीय कामगिरीची दखल; वैभव सूर्यवंशीचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय बाल पुरस्काराने गौरव
8
सर्व (पक्ष) समावेशक भाजपा नीती! काँग्रेस रिकामी, उद्धवसेनेचे घर खाली, मनसेचा कणा मोडला
9
कोंबडी आधी की अंडं? शतकानुशतके पडलेल्या या जुन्या प्रश्नाचं उत्तर अखेर वैज्ञानिकांना सापडलं
10
तुम्ही सुद्धा 'हर्बल टी' पिता का? FSSAI नं कंपन्यांना दिला इशारा, नक्की प्रकरण काय?
11
Girish Mahajan : भाजपामध्ये प्रवेशाचे 'महाभारत'; मंत्री गिरीश महाजन यांना घेराव; निष्ठावंतांवरच अन्याय का?
12
गोपनीय बैठका अन् भाजपाच्या 'एकहाती' सत्तेला खिंडार पाडण्याची रणनीती; जळगावात 'कणकवली पॅटर्न'?
13
Viral : टेक्नोलॉजिया! अवघ्या एका विटेत पठ्ठ्याने तयार केला रूम हीटर; ५० रुपयांच्या खर्चात थंडी केली गायब
14
ऑनलाइन सेवा विस्कळीत होणार? 'या' ९ मागण्यांसाठी डिलिव्हरी बॉईजचे देशव्यापी आंदोलन
15
शिंदेसेनेकडून ४२ जागांचा प्रस्ताव, जागा वाटपाचा तिढा सुटेना; तीन मंत्र्यांसह नेत्यांची जंबो बैठक
16
"मला खूप दुखतंय...", उपचारांसाठी ८ तास वेटिंग; कॅनडात वडिलांसमोर भारतीयाचा तडफडून मृत्यू
17
Travel : 'या' देशात मुस्लिम  बहुसंख्य, पण नोटांवर आहे गणपती! भारतातून १००००० रुपये घेऊन जाल तर कोट्यधीश व्हाल
18
महापालिका निवडणूक: मतांचे विभाजन कोणाच्या पथ्यावर? काँग्रेसचे गणित बिघडण्याची शक्यता! 
19
Shyam Dhani Industries IPO: मसाला बनवणाऱ्या कंपनीनं मागितलेले ₹३८ कोटी, गुंतवणूकदारांनी झोळीत टाकले ₹२५,००० कोटी; पाहा डिटेल्स
20
कंपनीच्या CEO चा कारनामा, आयटी मॅनेजरसोबत गँगरेप; कारच्या डॅशकॅम सगळं रेकॉर्ड झालं, मग...
Daily Top 2Weekly Top 5

शंभरावर गुरुजींवरील अतिरिक्ततेचे गंडांतर टळले

By admin | Updated: May 18, 2014 00:49 IST

उस्मानाबाद : समयोजनानंतरही जिल्हाभरातून सुमारे १५० च्या आसपास शिक्षक, मुख्याध्यापक अतिरिक्त झाले होते.

 उस्मानाबाद : समयोजनानंतरही जिल्हाभरातून सुमारे १५० च्या आसपास शिक्षक, मुख्याध्यापक अतिरिक्त झाले होते. त्यांच्या समायोजनांचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. या शिक्षकांना बाहेरच्या जिल्ह्यात पाठविण्याशिवाय शिक्षण विभागासमोर दुसरा पर्याय नव्हता. असे असतानाच १७ मे रोजी झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये अशा गुरुजींसाठी दिलासादायक निर्यण झाला आहे. आता पहिली ते सातवी वर्गातील दीडशे विद्यार्थ्यांना एक मुख्याध्यापक दिला जाणार आहे. त्यामुळे जवळपास शंभर शिक्षकांवरील अतिरिक्ततेचे गंडातर टळणार आहे. इंग्रजी शाळांचे जाळे दिवसेंदिवस ग्रामीण भागातही विस्तारु लागले आहे. त्यामुळे वर्षागणिक विद्यार्थीसंख्या कमी होवू लागली असून, शिक्षकही त्याचप्रमाणात अतिरिक्त होवू लागले आहेत. यावेळी शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) गुरुजींची निश्चिती करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्हाभरातून सुमारे २६४ वर गुरुजी अतिरिक्त ठरले होते. या गुरुजींचे रिक्त जागांवर समायोजन करुनही सुमारे दीडशे शिक्षकांना जिल्ह्याबाहेर पाठविण्याची वेळ आली होती. त्यामुळे गुरुजीही चांगलेच धास्तावले होते. दरम्यान, यासंदर्भात शिक्षण आयुक्त आणि शिक्षण उपसंचालक यांनी राज्यातील सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी व्हीडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बैठक घेतली. यावेळी अतिरिक्त शिक्षकांच्या प्रश्नावर बराचकाळ चर्चा झाली. त्यानंतर शिक्षकांसाठी दिलादायक निर्णय झाला आहे. पूर्वी पहिली ते पाचवी या वर्गात दीडशे किंवा त्यापेक्षा अधिक विद्यार्थी संख्या असल्यास एक मुख्याध्यापक दिला जात असे. मात्र आता पहिली ते सातवी या वर्गांची पटसंख्या दीडशेपेक्षा जास्त असल्यास एक मुख्याध्यापक दिला जाणार आहे. त्यामुळे आता अतिरिक्त १४५ पैकी १०० मुख्याध्यापकांना जिल्ह्यात राहता येणार आहे. या निर्णयामुळे अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न बर्‍यापैकी सुटला आहे. (प्रतिनिधी) जिल्ह्यात ज्या ठिकाणी जिल्हा परिषदेची ४ थी पर्यंत शाळा आहे, तेथे पाचवीचा तर ज्या ठिकाणी सातवीपर्यंत शाळा आहे तेथे आठवीचा वर्ग सुरु करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. विशेष म्हणजे पूर्वी हे वर्ग सुरु करण्यासाठी किमान २० विद्यार्थी संख्या असणे बंधनकारक होते. परंतु यावेळी शासनाने सदरील अटही काढून टाकली आहे. त्यामुळे आता कितीही पटसंख्या असली आगामी शैक्षणिक वर्षापासून हे वर्ग सुरु करण्यात येणार आहेत. मात्र शिक्षक नियुक्ती पुढच्या वर्षी केली जाणार आहे.