शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
2
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
3
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
4
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
5
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
6
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
7
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
8
हुंडाबळीच्या खटल्यात पती, सासूला सक्तमजुरी; १५ वर्षांची शिक्षा
9
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
10
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
11
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
12
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
13
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
14
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
15
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
16
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
17
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
18
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
19
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
20
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे

दीड लाख शेतकऱ्यांना व्याजमाफीचा लाभ!

By admin | Updated: August 6, 2014 02:17 IST

रामेश्वर काकडे , नांदेड जिल्ह्यात झालेल्या गारपीट व अवकाळी पावसाचा फटका मोठ्या संख्येने शेतकऱ्यांना बसल्यामुळे हजारो हेक्टरवरील पिके गारपिटीमध्ये उद्ध्वस्त झाली.

रामेश्वर काकडे , नांदेडजिल्ह्यात झालेल्या गारपीट व अवकाळी पावसाचा फटका मोठ्या संख्येने शेतकऱ्यांना बसल्यामुळे हजारो हेक्टरवरील पिके गारपिटीमध्ये उद्ध्वस्त झाली. आपद्ग्रस्तांना दिलासा देण्यासाठी त्यांनी घेतलेल्या पीककर्जावरील व्याज माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला असून याचा जिल्ह्यातील जवळपास दीड लाख शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात जिल्ह्यात गारपीट व वादळामुळे हजारो हेक्टरवरील पिके आडवी पडली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी बी-बियाणांसाठी टाकलेला खर्चही निघाला नसल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले होते़ त्यात निराश झालेल्या काही शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्गही स्वीकारला़ शासनाकडून मदतीसाठी होणाऱ्या विलंबामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना होती़ त्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने हेक्टरी अनुदान दिले. मात्र सध्या खरीप हंगामही काही भागामध्ये हातचा गेल्यात जमा आहे. यामुळे शेतकऱ्यांनी घेतलेले पीककर्ज कसे फेडावे असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा टाकला आहे. आॅगस्ट उजाडला तरी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला नाही़ त्यामुळे पेरण्याही खोळंबल्या आहेत़ आर्थिक संकटात सापडलेल्या बळीराजाला मदत देण्यासाठी शासनाने त्यांच्या कर्जाचे तीन वर्षांसाठी पुनर्गठन करण्याचा तसेच त्यावर आकारले जाणारे व्याज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. नुकसानग्रस्त भागातील पीककर्जदार शेतकऱ्यांना डिसेंबर २०१४ पर्यंत पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेत ० टक्के व्याजाचा लाभ मिळणार आहे. यापूर्वी जून २०१४ पर्यंत किंवा ३६५ दिवसापर्यंंत व्याजाचा फायदा मिळणार आहे. जिल्ह्यात १ लाख ६५ हजार शेतकरी आपद्ग्रस्त असून यापैकी जवळपास दीड लाख शेतकऱ्यांनी पीककर्ज उचलेले आहे.सन २०१३-१४ या वर्षात २ लाख ४१ हजार २२१ शेतकऱ्यांना १४४० कोटी रुपयांच्या पीककर्जाचे वाटप करण्यात आलेले आहे. एकूण पीककर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांपैकी अंदाजे दीड लाख शेतकरी नुकसानग्रस्त भागातील आहेत. तर दुसरीकडे पंचनाम्याच्या जाचक अटीमुळे अनेक भागातील अल्पभूधारक शेतकरी मात्र लाभापासून वंचित राहिले आहेत.