शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

शेकडो हातपंप बंद अवस्थेत..!

By admin | Updated: March 28, 2016 00:09 IST

जालना : शहरातील विविध प्रभाग मिळून पालिकेचे शेकडो हातपंप तसेच विद्युतपंप आहेत. परंतु पालिकेच्या दुर्लक्षामुळे असंख्य पंप बंद तर काही गायब आहेत.

जालना : शहरातील विविध प्रभाग मिळून पालिकेचे शेकडो हातपंप तसेच विद्युतपंप आहेत. परंतु पालिकेच्या दुर्लक्षामुळे असंख्य पंप बंद तर काही गायब आहेत. परिणामी नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. प्रभागातील नागरिकांना प्रभागतच पाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून ठिकठिकाणी बोरींग करण्यात आलेल्या आहेत.नगर पालिकेने नवीन व जुना जालना मिळून प्रभाग निहाय ९५० पेक्षा जास्त हातपंप, विंधन विहिरी केलेल्या आहेत. प्रत्यक्षात आज रोजी काही बोटावर मोजण्या इतककेच पंप सुरू आहेत. पालिका दरवर्षी हातपंप तसेच विंधन विहिरींसाठी लाखो रूपयांचे नियोजन करते. खर्च होतो. प्रत्यक्षात बोरींग दिसत नसल्याचे वास्तव चित्र आहे. हातपंप दिसत असले तरी ते बंद असतात. शहरात गत काही वर्षांपासून हजारो बोरींग व विंधन विहिरी करण्यात आल्या. प्रत्यक्षात या बोरींग कोठे गेल्या हा प्रश्नच आहे. पालिकेच्या दाव्यानुसार ९५० बोरींग आहेत. यापैकी ३०० बोरींग उपयोगात येऊ शकत नाहीत. उर्वरित ६५० बोरींगपैकी ३०० पेक्षा अधिक सुरू आहेत तर ३०० बोरींग किरकोळ दुरूस्ती कराव्या लागणार आहेत. यासाठी पालिकेकडून नियोजन करण्यात येत आहे. यंदा अत्यल्प पाऊस झाल्याने बहुतांश ठिकाणच्या घरगुती तसेच सार्वजनिक ठिकाणच्या बोरींगचे पाणीही फेब्रुवारी महिन्यातच आटले आहे. काही ठिकाणी मुबलक पाणी असले तरी या बोरींग दुरूस्त नाहीत. पालिकेकडून कधी साहित्य नाही तर कधी मनुष्यबळ कमी असल्याचे सांगून दुरूस्तीकडे टाळाटाळ केली जात आहे. विशेषत: झोपडपट्टी भागातील रहिवाशांना या बोरींग महत्वपूर्ण ठरत असल्या तरी याकडे पालिकेचा कानाडोळा आहे. पालिकेने या बोरींगची दुरूस्ती करावी, अशी मागणी होत आहे. पालिकेकडून ९५० बोरींग अस्तित्वात असल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात एवढ्या बोरींग असतील की नाही असा प्रश्न उपस्थित होतो. १२ प्रभागांचे सर्व्हेक्षण केल्यास प्रत्येक प्रभागात एखाद दोन बोरींग सुरू असतील. उन्हाळ्याचे दिवस तसेच शहरात तीव्र पाणीटंचाई लक्षात घेता पालिकेने बंद असलेले हातपंप तात्काळ दुरूस्त करावेत, अशी मागणी होत आहे. नागरिकांकडून वारंवार मागणी होऊनही हातपंप सुरू केले जात नाहीत.ज्या हातपंपांना चांगले पाणी आहे त्या ठिकाणी वीजपंप बसविण्यात यावेत, अशी मागणीही काही वसाहतींमधून जोर धरत आहे. वीजपंप लावल्यास सर्वच नागरिकांना मुबलक पाणी मिळेल असे नागरिकांचे म्हणणे आहे. एकूणच नगर पालिकेने नवीन बोरींग करण्याऐवजी आहे त्या बोरींग व्यवस्थित दुरूस्त केल्यास शहरातील पाणीटंचाईचा प्रश्न बऱ्यापैकी सुटू शकेल. बोरींग विभागात रिक्त असलेल्या जागा भरण्यात याव्यात, अशी मागणी जोर धरत आहे. (प्रतिनिधी)