शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
3
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
4
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
5
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
6
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
7
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
8
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
9
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
10
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
11
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
12
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
13
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
14
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
15
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
16
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
17
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
18
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
19
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
20
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
Daily Top 2Weekly Top 5

आयआयटीमध्ये यंदा औरंगाबादचे शंभर विद्यार्थी

By admin | Updated: June 20, 2014 01:11 IST

औरंगाबाद : आयआयटीमध्ये प्रवेशाची दारे खुली करणाऱ्या जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेचा गुरुवारी निकाल जाहीर झाला.

औरंगाबाद : आयआयटीमध्ये प्रवेशाची दारे खुली करणाऱ्या जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेचा गुरुवारी निकाल जाहीर झाला. या परीक्षेत औरंगाबादेतील सुमारे १०० विद्यार्थी यशस्वी झाले असून, देशभरातील वेगवेगळ्या आयआयटी संस्थांमध्ये त्यांना प्रवेश मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचे शिक्षण देणाऱ्या देशभरातील आयआयटी संस्थांमध्ये प्रथम वर्षाच्या सुमारे १८ हजार जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी दरवर्षी अखिल भारतीय स्तरावर जेईई परीक्षा घेतली जाते. या वर्षी ती गेल्या मे महिन्यात झाली. नाथ व्हॅली स्कूलचा अमेय राजगोपाल लोया याने आॅल इंडियातून १७० वा रँक मिळवला आहे. त्याला बारावीत ९३ टक्के गुण होते. या यशाबद्दल अमेयने सदर प्रतिनिधीला सांगितले की, जेईईची तयारी करण्यासाठी कोटा येथे गेलो होतो. रोज ४ ते ५ तास कोचिंग आणि नंतर ९ ते १० तास सेल्फ स्टडी. यश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट प्लॅनिंग आणि हार्डवर्क करणे आवश्यक आहे. तसेच अभ्यास करताना सर्व टॉपिकला समान महत्त्व द्यावे. नियमित सराव करावा, असेही तो म्हणाला. छत्रपती कॉलेजचा अक्षय मनोज दुसाद याने जेईई अ‍ॅडव्हान्समध्ये अखिल भारतीय स्तरावर ११३४ वा क्रमांक पटकावला. याच महाविद्यालयाचा अर्पित शिवशंकर स्वामी याने ओबीसी प्रवर्गातून मेरिट लिस्टमध्ये ६०६ वा रँक पटकावला. देवगिरी महाविद्यालयाची नेहा मनोज मुथियान हिने आॅल इंडियातून ३०१० वा क्रमांक मिळविला. तिने जेईईची तयारी राजस्थानमधील कोटा येथे केली. आपल्या यशाचे श्रेय तिने आई-वडिलांना दिले आहे. कन्नड येथील जवाहर नवोदय विद्यालयाचा विद्यार्थी पुष्करराज महेंद्र ढाके याने ओबीसी प्रवर्गातून ४९ वा क्रमांक मिळवला आहे. या विद्यार्थ्यांना २० ते २४ जूनदरम्यान आॅनलाईन पसंती फॉर्म भरून आयआयटी संस्थांमधील प्रवेश निश्चित करावा लागणार आहे.