शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
3
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
4
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
5
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
6
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
7
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
8
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
9
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
10
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
11
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
12
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
13
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
14
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
15
Operation Sindoor Live Updates: देशाच्या विविध भागांत मॉकड्रिल आणि ब्लॅकआऊट
16
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
17
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
18
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
19
Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जनं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु-धू धुतलं, ऐतिहासिक शतक ठोकलं!
20
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?

आयआयटीमध्ये यंदा औरंगाबादचे शंभर विद्यार्थी

By admin | Updated: June 20, 2014 01:11 IST

औरंगाबाद : आयआयटीमध्ये प्रवेशाची दारे खुली करणाऱ्या जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेचा गुरुवारी निकाल जाहीर झाला.

औरंगाबाद : आयआयटीमध्ये प्रवेशाची दारे खुली करणाऱ्या जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेचा गुरुवारी निकाल जाहीर झाला. या परीक्षेत औरंगाबादेतील सुमारे १०० विद्यार्थी यशस्वी झाले असून, देशभरातील वेगवेगळ्या आयआयटी संस्थांमध्ये त्यांना प्रवेश मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचे शिक्षण देणाऱ्या देशभरातील आयआयटी संस्थांमध्ये प्रथम वर्षाच्या सुमारे १८ हजार जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी दरवर्षी अखिल भारतीय स्तरावर जेईई परीक्षा घेतली जाते. या वर्षी ती गेल्या मे महिन्यात झाली. नाथ व्हॅली स्कूलचा अमेय राजगोपाल लोया याने आॅल इंडियातून १७० वा रँक मिळवला आहे. त्याला बारावीत ९३ टक्के गुण होते. या यशाबद्दल अमेयने सदर प्रतिनिधीला सांगितले की, जेईईची तयारी करण्यासाठी कोटा येथे गेलो होतो. रोज ४ ते ५ तास कोचिंग आणि नंतर ९ ते १० तास सेल्फ स्टडी. यश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट प्लॅनिंग आणि हार्डवर्क करणे आवश्यक आहे. तसेच अभ्यास करताना सर्व टॉपिकला समान महत्त्व द्यावे. नियमित सराव करावा, असेही तो म्हणाला. छत्रपती कॉलेजचा अक्षय मनोज दुसाद याने जेईई अ‍ॅडव्हान्समध्ये अखिल भारतीय स्तरावर ११३४ वा क्रमांक पटकावला. याच महाविद्यालयाचा अर्पित शिवशंकर स्वामी याने ओबीसी प्रवर्गातून मेरिट लिस्टमध्ये ६०६ वा रँक पटकावला. देवगिरी महाविद्यालयाची नेहा मनोज मुथियान हिने आॅल इंडियातून ३०१० वा क्रमांक मिळविला. तिने जेईईची तयारी राजस्थानमधील कोटा येथे केली. आपल्या यशाचे श्रेय तिने आई-वडिलांना दिले आहे. कन्नड येथील जवाहर नवोदय विद्यालयाचा विद्यार्थी पुष्करराज महेंद्र ढाके याने ओबीसी प्रवर्गातून ४९ वा क्रमांक मिळवला आहे. या विद्यार्थ्यांना २० ते २४ जूनदरम्यान आॅनलाईन पसंती फॉर्म भरून आयआयटी संस्थांमधील प्रवेश निश्चित करावा लागणार आहे.