शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

आयआयटीमध्ये यंदा औरंगाबादचे शंभर विद्यार्थी

By admin | Updated: June 20, 2014 01:11 IST

औरंगाबाद : आयआयटीमध्ये प्रवेशाची दारे खुली करणाऱ्या जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेचा गुरुवारी निकाल जाहीर झाला.

औरंगाबाद : आयआयटीमध्ये प्रवेशाची दारे खुली करणाऱ्या जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेचा गुरुवारी निकाल जाहीर झाला. या परीक्षेत औरंगाबादेतील सुमारे १०० विद्यार्थी यशस्वी झाले असून, देशभरातील वेगवेगळ्या आयआयटी संस्थांमध्ये त्यांना प्रवेश मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचे शिक्षण देणाऱ्या देशभरातील आयआयटी संस्थांमध्ये प्रथम वर्षाच्या सुमारे १८ हजार जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी दरवर्षी अखिल भारतीय स्तरावर जेईई परीक्षा घेतली जाते. या वर्षी ती गेल्या मे महिन्यात झाली. नाथ व्हॅली स्कूलचा अमेय राजगोपाल लोया याने आॅल इंडियातून १७० वा रँक मिळवला आहे. त्याला बारावीत ९३ टक्के गुण होते. या यशाबद्दल अमेयने सदर प्रतिनिधीला सांगितले की, जेईईची तयारी करण्यासाठी कोटा येथे गेलो होतो. रोज ४ ते ५ तास कोचिंग आणि नंतर ९ ते १० तास सेल्फ स्टडी. यश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट प्लॅनिंग आणि हार्डवर्क करणे आवश्यक आहे. तसेच अभ्यास करताना सर्व टॉपिकला समान महत्त्व द्यावे. नियमित सराव करावा, असेही तो म्हणाला. छत्रपती कॉलेजचा अक्षय मनोज दुसाद याने जेईई अ‍ॅडव्हान्समध्ये अखिल भारतीय स्तरावर ११३४ वा क्रमांक पटकावला. याच महाविद्यालयाचा अर्पित शिवशंकर स्वामी याने ओबीसी प्रवर्गातून मेरिट लिस्टमध्ये ६०६ वा रँक पटकावला. देवगिरी महाविद्यालयाची नेहा मनोज मुथियान हिने आॅल इंडियातून ३०१० वा क्रमांक मिळविला. तिने जेईईची तयारी राजस्थानमधील कोटा येथे केली. आपल्या यशाचे श्रेय तिने आई-वडिलांना दिले आहे. कन्नड येथील जवाहर नवोदय विद्यालयाचा विद्यार्थी पुष्करराज महेंद्र ढाके याने ओबीसी प्रवर्गातून ४९ वा क्रमांक मिळवला आहे. या विद्यार्थ्यांना २० ते २४ जूनदरम्यान आॅनलाईन पसंती फॉर्म भरून आयआयटी संस्थांमधील प्रवेश निश्चित करावा लागणार आहे.