शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

सकाळच्या दिल्ली-औरंगाबाद विमानाला प्रवाशांचा प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 18:10 IST

नव्या विमानसेवेच्या गरजेवर शिक्कामोर्तब

ठळक मुद्देपहिल्या दिवशी ७२, तर दुसऱ्या दिवशीचे बुकिंग शंभरावरऔरंगाबादहून जेट एअरवेजचे सकाळ आणि सायंकाळचे विमान मार्चपासून बंद

औरंगाबाद : हज यात्रेनिमित्त एअर इंडियाकडून ७ दिवसांसाठी सकाळच्या वेळेत चालविण्यात येणाऱ्या दिल्ली- औरंगाबाद विमानाला रविवारी पहिल्याच दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे शहरातून नव्या विमानसेवेची किती गरज आहे, हे स्पष्ट होत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

औरंगाबादहून जेट एअरवेजचे सकाळ आणि सायंकाळचे विमान मार्चपासून बंद झाले. त्यामुळे पर्यटन, उद्योगासह विविध क्षेत्रांवर परिणाम होत असल्याने नव्या विमानसेवेची अवघ्या शहरवासीयांना प्रतीक्षा लागली आहे. जेट एअरवेजचे विमान बंद झाल्यापासून चिकलठाणा विमानतळावरून सकाळच्या वेळेत विमान नाही; परंतु हज यात्रेच्या निमित्ताने विमानतळ सकाळच्या सत्रात गजबजत आहे. चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून २७ जुलैपर्यंत हज यात्रेकरू  औरंगाबादहून थेट जेद्दाहला रवाना होणार आहेत. हज यात्रेसाठी दिल्लीहून औरंगाबादला येणाऱ्या विमानातून यंदा प्रवासी वाहतूक केली जात आहे. 

अवघ्या ७ दिवसांसाठी उड्डाण घेणाऱ्या सकाळच्या वेळेतील दिल्ली- औरंगाबाद विमानातून पहिल्याच दिवशी रविवारी दिल्लीहून ७२ प्रवासी औरंगाबादला दाखल झाले, तर दुसऱ्या दिवशीच्या म्हणजे सोमवारी दिल्लीहून येणाऱ्या विमानाची बुकिंग शंभरावर असल्याची माहिती एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांनी दिली. केवळ सात दिवसांसाठी का होईना, प्रवाशांना दिल्ली- औरंगाबाद विमानसेवा यानिमित्ताने उपलब्ध झाली आहे. 

जेट एअरवेजच्या विमानसेवेमुळे सकाळच्या वेळेत औरंगाबादला मुंबई आणि दिल्ली हवाई क नेक्टिव्हिटी मिळत होती; परंतु आता ही कनेक्टिव्हिटी केवळ एअर इंडियाच्या माध्यमातूनच सुरू आहे. तीदेखील सायंकाळी. त्यामुळे दिल्लीहून औरंगाबाद- मुंबईला ये-जा करणाऱ्यांना अर्ध्या दिवसाची प्रतीक्षा करावी लागते. सकाळच्या वेळेत मुंबई, दिल्लीसह अन्य शहरांसाठी विमान सुरू झाले, तर पर्यटन, उद्योग क्षेत्रासह प्रवाशांची मोठी सुविधा होईल. त्यामुळे नव्या विमानसेवेकडे लक्ष लागले आहे. 

स्पाईस जेट, ‘इंडिगो’च्या वेळापत्रकाची प्रतीक्षाचिकलठाणा विमानतळावरून विमानसेवा वाढविण्याच्या दृष्टीने विविध माध्यमांतून प्रयत्न केले जात आहेत. त्यास विमान कंपन्यांचा प्रतिसाद मिळत असून, लवकरच विमानसेवा सुरूहोण्याची आशा निर्माण झाली आहे. स्पाईस जेट, इंडिगो या विमान कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी विमानतळावर पाहणी केली आहे. आॅगस्टपासून विमानसेवा सुरू करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे वेळापत्रक कधी जाहीर होते, याची उत्सुकता शहरवासीयांना लागली आहे.

सकाळी विमान गरजेचेसकाळच्या वेळेत विमानाची मागणी आहे. पर्यटनाचा विचार करता तशी गरजदेखील आहे. सात दिवसांसाठी येणाऱ्या विमानाला मिळणाऱ्या प्रतिसादावरून हे दिसून येत आहे, असे औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फोरमचे अध्यक्ष जसवंत सिंह राजपूत म्हणाले.

टॅग्स :Aurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळtourismपर्यटनdelhiदिल्लीAurangabadऔरंगाबाद