शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
3
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
4
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
5
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
6
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
7
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
8
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
9
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
10
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
11
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
12
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
13
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
14
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
15
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
16
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
17
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
18
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
19
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
20
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
Daily Top 2Weekly Top 5

सकाळच्या दिल्ली-औरंगाबाद विमानाला प्रवाशांचा प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 18:10 IST

नव्या विमानसेवेच्या गरजेवर शिक्कामोर्तब

ठळक मुद्देपहिल्या दिवशी ७२, तर दुसऱ्या दिवशीचे बुकिंग शंभरावरऔरंगाबादहून जेट एअरवेजचे सकाळ आणि सायंकाळचे विमान मार्चपासून बंद

औरंगाबाद : हज यात्रेनिमित्त एअर इंडियाकडून ७ दिवसांसाठी सकाळच्या वेळेत चालविण्यात येणाऱ्या दिल्ली- औरंगाबाद विमानाला रविवारी पहिल्याच दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे शहरातून नव्या विमानसेवेची किती गरज आहे, हे स्पष्ट होत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

औरंगाबादहून जेट एअरवेजचे सकाळ आणि सायंकाळचे विमान मार्चपासून बंद झाले. त्यामुळे पर्यटन, उद्योगासह विविध क्षेत्रांवर परिणाम होत असल्याने नव्या विमानसेवेची अवघ्या शहरवासीयांना प्रतीक्षा लागली आहे. जेट एअरवेजचे विमान बंद झाल्यापासून चिकलठाणा विमानतळावरून सकाळच्या वेळेत विमान नाही; परंतु हज यात्रेच्या निमित्ताने विमानतळ सकाळच्या सत्रात गजबजत आहे. चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून २७ जुलैपर्यंत हज यात्रेकरू  औरंगाबादहून थेट जेद्दाहला रवाना होणार आहेत. हज यात्रेसाठी दिल्लीहून औरंगाबादला येणाऱ्या विमानातून यंदा प्रवासी वाहतूक केली जात आहे. 

अवघ्या ७ दिवसांसाठी उड्डाण घेणाऱ्या सकाळच्या वेळेतील दिल्ली- औरंगाबाद विमानातून पहिल्याच दिवशी रविवारी दिल्लीहून ७२ प्रवासी औरंगाबादला दाखल झाले, तर दुसऱ्या दिवशीच्या म्हणजे सोमवारी दिल्लीहून येणाऱ्या विमानाची बुकिंग शंभरावर असल्याची माहिती एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांनी दिली. केवळ सात दिवसांसाठी का होईना, प्रवाशांना दिल्ली- औरंगाबाद विमानसेवा यानिमित्ताने उपलब्ध झाली आहे. 

जेट एअरवेजच्या विमानसेवेमुळे सकाळच्या वेळेत औरंगाबादला मुंबई आणि दिल्ली हवाई क नेक्टिव्हिटी मिळत होती; परंतु आता ही कनेक्टिव्हिटी केवळ एअर इंडियाच्या माध्यमातूनच सुरू आहे. तीदेखील सायंकाळी. त्यामुळे दिल्लीहून औरंगाबाद- मुंबईला ये-जा करणाऱ्यांना अर्ध्या दिवसाची प्रतीक्षा करावी लागते. सकाळच्या वेळेत मुंबई, दिल्लीसह अन्य शहरांसाठी विमान सुरू झाले, तर पर्यटन, उद्योग क्षेत्रासह प्रवाशांची मोठी सुविधा होईल. त्यामुळे नव्या विमानसेवेकडे लक्ष लागले आहे. 

स्पाईस जेट, ‘इंडिगो’च्या वेळापत्रकाची प्रतीक्षाचिकलठाणा विमानतळावरून विमानसेवा वाढविण्याच्या दृष्टीने विविध माध्यमांतून प्रयत्न केले जात आहेत. त्यास विमान कंपन्यांचा प्रतिसाद मिळत असून, लवकरच विमानसेवा सुरूहोण्याची आशा निर्माण झाली आहे. स्पाईस जेट, इंडिगो या विमान कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी विमानतळावर पाहणी केली आहे. आॅगस्टपासून विमानसेवा सुरू करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे वेळापत्रक कधी जाहीर होते, याची उत्सुकता शहरवासीयांना लागली आहे.

सकाळी विमान गरजेचेसकाळच्या वेळेत विमानाची मागणी आहे. पर्यटनाचा विचार करता तशी गरजदेखील आहे. सात दिवसांसाठी येणाऱ्या विमानाला मिळणाऱ्या प्रतिसादावरून हे दिसून येत आहे, असे औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फोरमचे अध्यक्ष जसवंत सिंह राजपूत म्हणाले.

टॅग्स :Aurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळtourismपर्यटनdelhiदिल्लीAurangabadऔरंगाबाद