शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

ग्रामसेवकांच्या संपाचा ग्रामस्थांना मोठा फटका; शासनाने तोडगा काढण्याची मागणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 16:48 IST

ग्रामस्थांना दाखले मिळत नसल्याने अडचण 

ठळक मुद्देविविध दाखले मिळत नसल्याने बेरोजगार युवकात अस्वस्थता

पैठण : ग्रामसेवक गेल्या १९ दिवसापासून संपावर गेल्याने ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. ग्रामसेवकांचा संप मिटविण्यासाठी शासन स्तरावर हालचाल झाली नसल्याने  ग्रामस्थात चिंतेचे वातावरण  निर्माण झाले आहे. पैठण तालुक्यातील १०७ ग्रामपंचायतीचे कामकाज बंद पडल्याने अडचणीत वाढ झाल्याचे दिसून आले आहे. सध्या शासनाच्या विविध खात्यात नोकर भरती सुरू असून अर्ज करण्यासाठी लागणारे विविध दाखले मिळत नसल्याने बेरोजगार युवकात यामुळे अस्वस्थता निर्माण झाली आहे.

पंचायतराज व्यवस्थेत ग्रामपंचायतीस पाया तर ग्रामसेवकास कणा मानले गेले आहे . पैठण तालुक्यातील १०७ ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांनी दैनंदिन कामकाजाचे शिक्के व दप्तर गटविकास अधिकारी यांच्याकडे जमा करून दि २२ ऑगस्ट पासून संप पुकारला आहे, तेव्हापासून ग्रामपंचायतीचे कामकाज ठप्प आहे.पैठण तालुक्यात अनेक गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून टँकरचा प्रस्ताव पंचायत समिती कडे कसा दाखल करावा असा मोठा प्रश्न अनेक गावासमोर सध्या निर्माण झाला आहे. दुष्काळ परिस्थिती मुळे शासनाच्या विविध योजना सध्या घोषित करण्यात आल्या आहेत या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रमाणपत्र मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. बेरोजगारांना नोकरीसाठी लागणारे प्रमाणपत्र मिळत नसल्याने युवकात अस्वस्थता आहे. ग्रामपंचायतीचे दैनंदिन कामकाज ठप्प पडल्याने गावातील स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दैनदिन येणाऱ्या अडीअडचणी कोणाकडे सागाव्या असा मोठा प्रश्न गावकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.

ग्रामसेवकांच्या आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष सखाराम दिवटे, सागर डोईफोडे, जिजाभाऊ मिसाळ, रमेश आघाव, उपाध्यक्ष नेमाणे सुनिता, खंडु वीर, ईश्वर सोमवंशी, कायदा सल्लागार पंडित सांगळे, संघटक सीमा सोनवणे, महिला संघटक आशा तुपे, संगीता दानवे, सुहासिनी कळसकर,मनीषा क्षीरसागर, दशरथ खराद, सुहास पाटील, प्रशांत साळवे, सिध्दार्थ काकडे, आण्णासाहेब कोरडे , सोमनाथ खराडे, विनायक इंगोले, नितिन निवारे,राजू दिलवाले,बाबासाहेब तांबे कैलास गायकवाड़ तुळशिराम पोतदार,संजय शिंदे यांच्यासह तालुक्यातील ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवक सहभागी आहेत.

काय आहेत ग्रामसेवकांच्या मागण्या....ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी पद रद्द करण्यात येऊन पंचायत विकास अधिकारी पद निर्मिती करणे. ग्रामसेवक संवर्गास प्रवास भत्ता शासन नियमाप्रमाणे मंजूर करावा. ग्रामसेवकाची शैक्षणिक अर्हता पदवी करावी, लोकसंख्येवर आधारित सजे व पदे याच्यात वाढ करावी, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी वेतन त्रुटी दूर करावी. सन २००५ नंतर रूजू झालेल्या ग्रामसेवकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी व आदर्श ग्रामसेवक  पुरस्काराची आगाऊ वेतनवाढ द्यावी. ग्रामसेवका कडील अतिरिक्त कामाचा बोजा कमी करावा.   

मोठ्या गावांना फटका......ग्रामसेवकाच्या संपामुळे मोठी लोकसंख्या असलेल्या गावातील नागरी समस्या वाढल्या आहेत पैठण तालुक्यातील चितेगाव, लोहगाव, पाचोड , बिडकीन , विहामांडवा , आडूळ, नवगाव, बालानगर, चांगतपुरी, पिंपळवाडी, आदी मोठ्या गावातील ग्रामपंचायतींना ग्रामसेवकाच्या संपाची झळ बसली आहे .  

तोडगा निघावा ग्रामसेवकांच्या  आंंदोलनामुळे विकास कामाना खिळ बसली असून दैनंदिन अडचणीचा सामना करावा लागत आहे. शासनाने संपावर तोडगा काढून संप मिटवावा व ग्रामीण भागातील जनतेला दिलासा द्यावा.- जाबेर पठाण, सरपंच बालानगर.

शासनाने मागण्या मान्य कराव्यात शासनाच्या योजना ग्रामीण भागातील ग्रामस्थापर्यत पोहचवण्यासाठी आम्ही रात्रदिवस काम करतो, या व्यतिरिक्त शासनाने वेळोवेळी सोपवलेली कामेही आम्ही करतो. इतर विभागाच्या योजना राबविण्याची जबाबदारी ग्रामसेवकावरच सोपण्यात येते, सर्व करूनही आमच्या संवर्गाच्या रास्त मागण्या शासन मान्य करत नाही. आंदोलन मागण्या मान्य होईपर्यंत सुरूच ठेवण्यात येणार आहे. शासनाने पदाधिकारी, ग्रामस्थ यांची गैरसोय होऊ नये यासाठी आमच्या रास्त मागण्या मान्य कराव्यात.- सागर डोईफोडे, सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटना

टॅग्स :StrikeसंपAurangabadऔरंगाबादgram panchayatग्राम पंचायतStudentविद्यार्थी