शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

वीज बिल कसे भरू? आधी मीटर बदलून द्या साहेब ! मीटर बदलून हवे असल्यास काय कराल?

By साहेबराव हिवराळे | Updated: November 10, 2023 15:29 IST

वाढीव बिल आले की, वाद निर्माण होऊन एक तर महावितरणला नुकसान, नाही तर वीज ग्राहकांना त्रास सहन करावा लागतो

छत्रपती संभाजीनगर : ग्राहकांच्या वीज वापराचे अचूक देयक, हे वीज ग्राहकांसोबतच महावितरणसाठीही लाभकारक आहे. त्यामुळेच अचूक बिलिंगला महावितरणकडून प्राथमिकता मिळते. नादुरुस्त मीटरमुळे ग्राहकांना मनस्ताप, तर महावितरणला नुकसान सहन करावे लागते. मीटर बंद, तुटलेला डिस्प्ले, नादुरुस्त मीटरमुळे वीज वापराची कमी-अधिक प्रमाणात नोंद या कारणांमुळे ग्राहकांचा अचूक वीज वापर नोंदविला जात नाही.

वाढीव बिल आले की, वाद निर्माण होऊन एक तर महावितरणला नुकसान, नाही तर वीज ग्राहकांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळेच महावितरणने नियमित आणि अचूक बिलिंगला सर्वोच्च प्राधान्य देत आवश्यक त्या सुधारणा केल्या आहेत.

मीटर खराब असल्याच्या महिनाभरात २५ ते ३० तक्रारीजिल्ह्यात मीटर जळाल्याच्या व नादुरुस्त झाल्याच्या दरमहा सरासरी २५ ते ३० तक्रारी असतात. रोज प्रत्येक तक्रारीची नोंद घेऊन तक्रारी एक-दोन दिवसांत सोडवल्याचा महावितरण दावा करते.

मीटर बंद असल्याच्या तक्रारीमीटर नादुरुस्त झाल्याबाबत ग्राहकांनी नोंदवलेल्या तक्रारींची पडताळणी करून तक्रारीत तथ्य आढळल्यास मीटर बदलून देण्यात येते. मंजूर भार कमी-जास्त करण्याच्या मागणीप्रमाणे आवश्यकतेनुसार मीटर बदलले जाते.

त्वरित मिळेना मीटर

दोन दिवसांत मीटर बदलून मिळते, असे सांगितले जाते. परंतु, कारवाई आणि कामकाजात होणारे अडसर पाहता बहुतांश वेळी मीटर बदलण्यासाठी विलंब होत आहे. त्वरित मीटर मिळत नसल्याची ओरड आहे.मीटर मिळण्यात अडचणी काय?

मीटर बदलून हवे असल्यास काय कराल?मोबाइल ॲपवर किंवा नजीकच्या महावितरण कार्यालयात तक्रार नोंदवता येते. या तक्रारींची पडताळणी करून तातडीने मीटर बदलण्याचा दावा महावितरण करते.

अचूक वीजबिलामुळे ग्राहकांच्या तक्रारी व त्यातून निर्माण होणारा असंतोष; या दोन्ही बाबी टाळल्या जातात. ग्राहक समाधानी व महावितरणलाही वितरित केलेल्या विजेचा अचूक परतावा, यात मीटरवरील अचूक वीजमापन महत्त्वपूर्ण ठरते. नादुरुस्त अथवा बंद मीटरवर महावितरणचे लक्ष असतेच; शिवाय तक्रारी असल्यास संबंधित ग्राहकांनी तातडीने संपर्क साधावा.- महावितरण अधिकारी

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादmahavitaranमहावितरण