शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
3
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
4
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
5
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
6
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
7
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
8
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
11
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
12
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
13
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
14
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
15
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
16
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
17
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
18
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
19
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
20
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय

वीज बिल कसे भरू? आधी मीटर बदलून द्या साहेब ! मीटर बदलून हवे असल्यास काय कराल?

By साहेबराव हिवराळे | Updated: November 10, 2023 15:29 IST

वाढीव बिल आले की, वाद निर्माण होऊन एक तर महावितरणला नुकसान, नाही तर वीज ग्राहकांना त्रास सहन करावा लागतो

छत्रपती संभाजीनगर : ग्राहकांच्या वीज वापराचे अचूक देयक, हे वीज ग्राहकांसोबतच महावितरणसाठीही लाभकारक आहे. त्यामुळेच अचूक बिलिंगला महावितरणकडून प्राथमिकता मिळते. नादुरुस्त मीटरमुळे ग्राहकांना मनस्ताप, तर महावितरणला नुकसान सहन करावे लागते. मीटर बंद, तुटलेला डिस्प्ले, नादुरुस्त मीटरमुळे वीज वापराची कमी-अधिक प्रमाणात नोंद या कारणांमुळे ग्राहकांचा अचूक वीज वापर नोंदविला जात नाही.

वाढीव बिल आले की, वाद निर्माण होऊन एक तर महावितरणला नुकसान, नाही तर वीज ग्राहकांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळेच महावितरणने नियमित आणि अचूक बिलिंगला सर्वोच्च प्राधान्य देत आवश्यक त्या सुधारणा केल्या आहेत.

मीटर खराब असल्याच्या महिनाभरात २५ ते ३० तक्रारीजिल्ह्यात मीटर जळाल्याच्या व नादुरुस्त झाल्याच्या दरमहा सरासरी २५ ते ३० तक्रारी असतात. रोज प्रत्येक तक्रारीची नोंद घेऊन तक्रारी एक-दोन दिवसांत सोडवल्याचा महावितरण दावा करते.

मीटर बंद असल्याच्या तक्रारीमीटर नादुरुस्त झाल्याबाबत ग्राहकांनी नोंदवलेल्या तक्रारींची पडताळणी करून तक्रारीत तथ्य आढळल्यास मीटर बदलून देण्यात येते. मंजूर भार कमी-जास्त करण्याच्या मागणीप्रमाणे आवश्यकतेनुसार मीटर बदलले जाते.

त्वरित मिळेना मीटर

दोन दिवसांत मीटर बदलून मिळते, असे सांगितले जाते. परंतु, कारवाई आणि कामकाजात होणारे अडसर पाहता बहुतांश वेळी मीटर बदलण्यासाठी विलंब होत आहे. त्वरित मीटर मिळत नसल्याची ओरड आहे.मीटर मिळण्यात अडचणी काय?

मीटर बदलून हवे असल्यास काय कराल?मोबाइल ॲपवर किंवा नजीकच्या महावितरण कार्यालयात तक्रार नोंदवता येते. या तक्रारींची पडताळणी करून तातडीने मीटर बदलण्याचा दावा महावितरण करते.

अचूक वीजबिलामुळे ग्राहकांच्या तक्रारी व त्यातून निर्माण होणारा असंतोष; या दोन्ही बाबी टाळल्या जातात. ग्राहक समाधानी व महावितरणलाही वितरित केलेल्या विजेचा अचूक परतावा, यात मीटरवरील अचूक वीजमापन महत्त्वपूर्ण ठरते. नादुरुस्त अथवा बंद मीटरवर महावितरणचे लक्ष असतेच; शिवाय तक्रारी असल्यास संबंधित ग्राहकांनी तातडीने संपर्क साधावा.- महावितरण अधिकारी

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादmahavitaranमहावितरण