शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
2
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
3
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
4
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
5
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
6
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
7
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
8
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
9
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
10
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
11
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
12
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
13
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
14
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
15
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
16
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
17
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
18
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
19
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
20
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...

कसे होणार आत्मनिर्भर? जिल्हा उद्योग केंद्राच्या ७५ टक्के प्रस्तावांना बँकांकडून केराची टोपली

By बापू सोळुंके | Updated: May 13, 2024 19:46 IST

जिल्हा उद्योग केंद्राकडून येणाऱ्या सुशिक्षित बेरोजगारांच्या कर्जप्रस्तावाबाबत विविध बँका नकारात्मक भूमिका घेत असल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

छत्रपती संभाजीनगर : मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने बेरोजगारांना उद्योग, व्यवसाय करण्यासाठी अनुदानावर कर्ज सुविधा उपलब्ध करण्यात येते. शासनाच्या या योजनेतून कर्ज मिळावे, यासाठी जिल्ह्यातील तब्बल ४ हजार १४१ बेरोजगारांनी जिल्हा उद्योग केंद्राकडे कर्ज प्रस्ताव सादर केले होते. जिल्हा उद्योग केंद्राने हे प्रस्ताव विविध बँकांना पाठविले होते. यांपैकी ७५ टक्के प्रस्तावांना बँकांनी केराची टोपली दाखविल्याची धक्कादायक माहिती आहे.

राज्यातील युवक-युवतींच्या सर्जनशीलतेला वाव मिळून देण्यासाठी राज्य सरकारकडून स्वयंरोजगाराला प्राधान्य दिले जात आहे. याअंतर्गत जिल्हा उद्याेग केंद्राच्या वतीने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत उद्योग, व्यवसाय करण्यासाठी कर्ज प्रस्ताव सादर करणाऱ्यांना बँकांमार्फत कर्जसुविधा उपलब्ध केली जाते. कर्जावर २५ ते ३५ टक्के अनुदान देण्यात येते. सन २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी शासनाने जिल्हा उद्योग केंद्रामार्फत ९५० कर्ज प्रस्ताव बँकांमार्फत मंजूर करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते.

मागील आर्थिक वर्षात शहरातील ४ हजार १४१ सुशिक्षित बेरोजगारांनी जिल्हा उद्योग केंद्राकडे उद्योग-व्यवसायासाठी कर्ज प्रस्ताव सादर केले होते. या प्रस्तावांची छाननी करून उद्योग केंद्राच्या अधिकाऱ्यांनी राष्ट्रीयीकृत, सहकारी आणि खासगी बँकांना कर्ज प्रस्ताव पाठविले होते. बँकांनी ते मंजूर करून बेरोजगारांना उद्योग-व्यवसाय करण्यासाठी कर्ज देणे अपेक्षित होते. मात्र, जिल्हा उद्योग केंद्राने पाठविलेल्या एकूण प्रस्तावांपैकी केवळ ६८८ बेरोजगारांना कर्ज दिले; तर २ हजार ९३९ बेरोजगारांचे कर्ज प्रस्ताव बँकांनी नाकारले. गतवर्षीचे १९५९ कर्जप्रकरणे अद्यापही बँकांकडे निर्णयाविना प्रलंबित असल्याचे जिल्हा उद्योग केंद्राकडून समजले. २०२३-२४ या आर्थिक वर्षात शासनाकडून मिळालेल्या उद्दिष्टापैकी केवळ ६० टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यास बँकांनी सहकार्य केल्याची माहिती उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी दिली.

बँकांची नकारघंटा कायमजिल्हा उद्योग केंद्राकडून येणाऱ्या सुशिक्षित बेरोजगारांच्या कर्जप्रस्तावाबाबत विविध बँका नकारात्मक भूमिका घेत असल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. डीआयसीकडून आलेल्या प्रस्तावांवर निर्णय घेतला जात नाही. यामुळे डीआयसीचे अधिकारी विविध बँकांना भेटी देऊन कर्ज प्रकरणावर निर्णय घेण्याची विनंती करतात; परंतु बऱ्याचदा काहीतरी कारण नोंदवून कर्ज प्रस्ताव नाकारण्यातच बँका धन्यता मानतात, असा अनुभव आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादbankबँक