शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

घर चालवायचे कसे; गळ्यातली चेन मोडायची वेळ आली, कसले ब्रेक दी चेन ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 14:36 IST

सध्या वाढलेली महागाई आणि कोरोनामुळे व्यवसायावर आलेले संकट याचा ताळमेळ साधताना महिलांची कसरत होत आहे.

ठळक मुद्दे गृहिणींचे आर्थिक नियोजन पुन्हा ढासळले

औरंगाबाद : लॉकडाऊन, ब्रेक दी चेन यामुळे हातावर पोट असणाऱ्या हजारो कुटुंबांचे आर्थिक नियोजन पुन्हा एकदा कोलमडले आहे. ब्रेक दि चेनमुळे व्यवसायावर आलेली कुऱ्हाड पाहता लवकरच आता गळ्यातली चेन मोडायची वेळ आमच्यावर न येवो, असे व्यापाऱ्यांचे आणि त्यांच्या घरचे नियोजन पाहणाऱ्या त्यांच्या गृहलक्ष्मींचे म्हणणे आहे. 

दर महिन्याला ठराविक रक्कम घरात आणून देणे हे पुरुषाचे काम असले तरी त्या रकमेतून सगळा घरखर्च भागवून काही रकमेची बचत करून ठेवणे, हे गृहिणीचेच काम असते. सध्या वाढलेली महागाई आणि कोरोनामुळे व्यवसायावर आलेले संकट याचा ताळमेळ साधताना महिलांची कसरत होत आहे. मिळकत आणि खर्च यांची सांगड घालणे कोरोना आणि ब्रेक दि चेनने पुन्हा एकदा कठीण होऊन बसले आहे, असे काही महिलांनी सांगितले.कोरोनाने मरण्यापेक्षा उपासमारीने मरण्याची वेळ सर्वसामान्यांवर आली आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तू, औषधी यांना जशी परवानगी दिली, तशीच परवानगी आमच्या व्यवसायालाही द्या, असे अनेक घरच्या गृहिणींचे म्हणणे आहे.

आता कुठे सुरू झाला होता व्यवसाय , कर्ज कसे फेडायचे ?मागच्या लॉकडाऊनच्या झळा सोसल्यानंतर आता कुठे मागच्या काही महिन्यांपासून विविध व्यवसायांची गाडी पुन्हा रूळावर येऊ लागली होती. लोकांच्या मनातली भीती कमी झाली होती आणि ते पुन्हा पहिल्यासारखी खरेदी करू लागले होते. पण पुन्हा हे 'ब्रेक दि चेन' आले. यामुळे कोरोनाची चेन ब्रेक होईल की नाही, हे माहित नाही, पण आमच्या उद्योगांची चेन मात्र नक्कीच ब्रेक झाली असल्याचे काही व्यापारी म्हणाले.

पुन्हा हे नवे संकट गरिबाला जगू द्यायचेच नाही, असेच जणू सरकारने ठरविले आहे. आता कुठे मागच्या लॉकडाऊन काळात झालेली उधार-उसणवारी फिटत आली होती. तर पुन्हा हे नवे संकट उभे राहिले. माझ्या मालकांची पानटपरी आहे. राेज कमावले तरच खाऊ शकू अशी परिस्थिती आहे. याचा विचार करून पुन्हा टपरी सुरू करायला परवानगी द्यावी.- अरुणा शिंदे

उत्पन्न थांबले आहेसरकार याला ब्रेक दि चेन असे म्हणत असले तरी हे एक प्रकारचे लॉकडाऊनच आहे. यामुळे शहरातील हजारो दुकाने बंद झाली असून, दुकानाचे मालक असो किंवा कामगार, प्रत्येकाचेच उत्पन्न थांबले आहे. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने जशी चालू आहेत, तशी अन्य व्यापाऱ्यांनाही त्यांची दुकाने चालू ठेवण्याची परवानगी द्यावी.- कीर्ती कासलीवाल

उपासमारीची वेळ कोरोना हा रोग दिवसेंदिवस वाढत असला तरी आता मात्र लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. विजेचे बिल, किराणा, बँकेचे हफ्ते, दवाखाना-औषधी यांसारखे अनेक खर्च दर महिन्याला भागवावेच लागतात. गरजेचे असणारे हे खर्च भागविणेही आता सर्वसामान्यांना कठीण झाले आहे. त्यामुळे विशिष्ट वेळ देऊन सर्वच दुकाने चालू झाली पाहिजे.- स्नेहल बोर्डे

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद