शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण बँकेची कितीदा बदलणार ‘पाटी’; देशातील ५६ क्षेत्रीय ग्रामीण बँकांचे ३८ बँकांत होणार एकत्रीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 18:16 IST

देशातील ५६ क्षेत्रीय ग्रामीण बँकांचे ३८ बँकांमध्ये एकत्रीकरण करण्यात येणार आहे. यासंदर्भात केंद्र शासनाच्या पातळीवर हालचाल सुरू झाली आहे.

ठळक मुद्देसतत नाव बदलण्यामुळे खातेदारांचा विश्वास उडत असल्याची खंत ग्रामीण बँकांच्या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.

औरंगाबाद : देशातील ५६ क्षेत्रीय ग्रामीण बँकांचे ३८ बँकांमध्ये एकत्रीकरण करण्यात येणार आहे. यासंदर्भात केंद्र शासनाच्या पातळीवर हालचाल सुरू झाली आहे. त्यात सध्या तरी मराठवाड्यातील महाराष्ट्र ग्रामीण बँकेचा समावेश नसला तरी भविष्यात विदर्भ व महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे एकत्रीकरण होऊ शकते. मात्र, यापूर्वी दोनदा ग्रामीण बँकांच्या पाट्या बदलल्या आहेत. आता पुन्हा पाटी बदलणार का, सतत नाव बदलण्यामुळे खातेदारांचा विश्वास उडत असल्याची खंत ग्रामीण बँकांच्या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.

बँकांचा विस्तार ग्रामीण भागात करण्यासाठी राष्ट्रीयीकृत बँकांच्या सहकार्याने क्षेत्रीय ग्रामीण बँका देशात निर्माण करण्यात आल्या. या बँकांमुळे प्रामुख्याने पीक कर्जाचे लाभ शेतकऱ्यांना मिळावे, हा उद्देश होता. देशात १९६ ग्रामीण बँका होत्या. मात्र, अनेक बँका तोट्यात चालत असल्याने त्यांच्या एकत्रीकरणाला सुरुवात झाली. २०११-१२ मध्ये त्यांची संख्या ८२ वर आणण्यात आली. ८२ पैकी काही बँका बंद पडल्या. सध्या त्यांची संख्या ५६ आहे. केंद्रीय मंत्रालय आता या बँकांचे पुन्हा एकत्रीकरण करून ३८ करण्याच्या विचारात आहे.

या संदर्भात सर्व राज्य शासनाला पत्र पाठवून ‘नाहरकत’ मागविली आहेत. सध्या महाराष्ट्रात दोन ग्रामीण बँका अस्तित्वात आहेत. यात महाराष्ट्र बँक पुरस्कृत महाराष्ट्र ग्रामीण बँक व दुसरी बँक आॅफ इंडिया पुरस्कृत विदर्भ ग्रामीण बँक  होय. मात्र, देशात ग्रामीण बँकांचे एकत्रीकरण करून  ३८ ग्रामीण बँका ठेवण्यात येणार असल्या तरी त्यात महाराष्ट्रातील या दोन ग्रामीण बँकांचा समावेश नाही. पण प्रशासकीय खर्च कमी करण्यासाठी भविष्यात या दोन्ही ग्रामीण बँकांचे एकत्रीकरण होण्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

एकत्रीकरण नको विलीनीकरण करा

मराठवाडा, खान्देश, नाशिक, पुणे, ठाणे या भागात महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या ३१४ शाखा आहेत. १६५० कर्मचारी या बँकेत कामाला आहेत. पूर्वी १० ग्रामीण बँका अस्तित्वात होत्या. त्यातील २००८ मध्ये औरंगाबाद-जालना ग्रामीण बँक व  ठाणे ग्रामीण बँकेचे एकत्रीकरण करून महाराष्ट्र गोदावरी ग्रामीण बँक अस्तित्वात आली. पुन्हा २० जुलै २०१० मध्ये गोदावरी ग्रामीण बँक व सर्वात जुनी मराठवाडा ग्रामीण बँकेचे एकत्रीकरण होऊन महाराष्ट्र ग्रामीण बँक स्थापन करण्यात आली. अजूनही महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे अस्तित्व टिकून आहे. याआधी दोनदा बँकेचे नाव बदलले आहे. यामुळे खातेदारांचा विश्वास बँकेवरून उडत आहे. आता एकत्रीकरण न करता थेट महाराष्ट्र बँकेतच ग्रामीण बँकेचे विलीनीकरण करा, अशी मागणी अधिकारी, कर्मचारी करीत आहेत.

महाराष्ट्र बँकेत विलीनीकरण हाच योग्य उपायभारत सरकारचे ५० टक्के, राज्य सरकार १५ टक्के तर पुरस्कृत बँकेचे ३५ टक्के भांडवल  ग्रामीण बँकेत गुंतविलेले असते. ग्रामीण बँकांचे एकत्रीकरण करून काही फायदा नाही. कारण त्यांच्या पायाभूत सुविधाच कच्च्या आहेत. या बँकांचे पुरस्कृत बँकांमध्ये विलीनीकरण करणे हाच योग्य उपाय आहे. यात महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे महाराष्ट्र बँकेत व विदर्भ ग्रामीण बँकेचे बँक आॅफ इंडियात विलीनीकरण करण्यात यावे, ही आमची मागणी आहे.-देवीदास तुळजापूरकर, सहसचिव, आॅल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन

 

टॅग्स :bankबँकGovernmentसरकार