शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
4
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
5
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
7
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
8
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
10
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
11
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
12
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
13
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
14
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
15
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
16
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
17
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
18
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
19
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
20
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...

ग्रामीण बँकेची कितीदा बदलणार ‘पाटी’; देशातील ५६ क्षेत्रीय ग्रामीण बँकांचे ३८ बँकांत होणार एकत्रीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 18:16 IST

देशातील ५६ क्षेत्रीय ग्रामीण बँकांचे ३८ बँकांमध्ये एकत्रीकरण करण्यात येणार आहे. यासंदर्भात केंद्र शासनाच्या पातळीवर हालचाल सुरू झाली आहे.

ठळक मुद्देसतत नाव बदलण्यामुळे खातेदारांचा विश्वास उडत असल्याची खंत ग्रामीण बँकांच्या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.

औरंगाबाद : देशातील ५६ क्षेत्रीय ग्रामीण बँकांचे ३८ बँकांमध्ये एकत्रीकरण करण्यात येणार आहे. यासंदर्भात केंद्र शासनाच्या पातळीवर हालचाल सुरू झाली आहे. त्यात सध्या तरी मराठवाड्यातील महाराष्ट्र ग्रामीण बँकेचा समावेश नसला तरी भविष्यात विदर्भ व महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे एकत्रीकरण होऊ शकते. मात्र, यापूर्वी दोनदा ग्रामीण बँकांच्या पाट्या बदलल्या आहेत. आता पुन्हा पाटी बदलणार का, सतत नाव बदलण्यामुळे खातेदारांचा विश्वास उडत असल्याची खंत ग्रामीण बँकांच्या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.

बँकांचा विस्तार ग्रामीण भागात करण्यासाठी राष्ट्रीयीकृत बँकांच्या सहकार्याने क्षेत्रीय ग्रामीण बँका देशात निर्माण करण्यात आल्या. या बँकांमुळे प्रामुख्याने पीक कर्जाचे लाभ शेतकऱ्यांना मिळावे, हा उद्देश होता. देशात १९६ ग्रामीण बँका होत्या. मात्र, अनेक बँका तोट्यात चालत असल्याने त्यांच्या एकत्रीकरणाला सुरुवात झाली. २०११-१२ मध्ये त्यांची संख्या ८२ वर आणण्यात आली. ८२ पैकी काही बँका बंद पडल्या. सध्या त्यांची संख्या ५६ आहे. केंद्रीय मंत्रालय आता या बँकांचे पुन्हा एकत्रीकरण करून ३८ करण्याच्या विचारात आहे.

या संदर्भात सर्व राज्य शासनाला पत्र पाठवून ‘नाहरकत’ मागविली आहेत. सध्या महाराष्ट्रात दोन ग्रामीण बँका अस्तित्वात आहेत. यात महाराष्ट्र बँक पुरस्कृत महाराष्ट्र ग्रामीण बँक व दुसरी बँक आॅफ इंडिया पुरस्कृत विदर्भ ग्रामीण बँक  होय. मात्र, देशात ग्रामीण बँकांचे एकत्रीकरण करून  ३८ ग्रामीण बँका ठेवण्यात येणार असल्या तरी त्यात महाराष्ट्रातील या दोन ग्रामीण बँकांचा समावेश नाही. पण प्रशासकीय खर्च कमी करण्यासाठी भविष्यात या दोन्ही ग्रामीण बँकांचे एकत्रीकरण होण्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

एकत्रीकरण नको विलीनीकरण करा

मराठवाडा, खान्देश, नाशिक, पुणे, ठाणे या भागात महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या ३१४ शाखा आहेत. १६५० कर्मचारी या बँकेत कामाला आहेत. पूर्वी १० ग्रामीण बँका अस्तित्वात होत्या. त्यातील २००८ मध्ये औरंगाबाद-जालना ग्रामीण बँक व  ठाणे ग्रामीण बँकेचे एकत्रीकरण करून महाराष्ट्र गोदावरी ग्रामीण बँक अस्तित्वात आली. पुन्हा २० जुलै २०१० मध्ये गोदावरी ग्रामीण बँक व सर्वात जुनी मराठवाडा ग्रामीण बँकेचे एकत्रीकरण होऊन महाराष्ट्र ग्रामीण बँक स्थापन करण्यात आली. अजूनही महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे अस्तित्व टिकून आहे. याआधी दोनदा बँकेचे नाव बदलले आहे. यामुळे खातेदारांचा विश्वास बँकेवरून उडत आहे. आता एकत्रीकरण न करता थेट महाराष्ट्र बँकेतच ग्रामीण बँकेचे विलीनीकरण करा, अशी मागणी अधिकारी, कर्मचारी करीत आहेत.

महाराष्ट्र बँकेत विलीनीकरण हाच योग्य उपायभारत सरकारचे ५० टक्के, राज्य सरकार १५ टक्के तर पुरस्कृत बँकेचे ३५ टक्के भांडवल  ग्रामीण बँकेत गुंतविलेले असते. ग्रामीण बँकांचे एकत्रीकरण करून काही फायदा नाही. कारण त्यांच्या पायाभूत सुविधाच कच्च्या आहेत. या बँकांचे पुरस्कृत बँकांमध्ये विलीनीकरण करणे हाच योग्य उपाय आहे. यात महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे महाराष्ट्र बँकेत व विदर्भ ग्रामीण बँकेचे बँक आॅफ इंडियात विलीनीकरण करण्यात यावे, ही आमची मागणी आहे.-देवीदास तुळजापूरकर, सहसचिव, आॅल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन

 

टॅग्स :bankबँकGovernmentसरकार