शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
4
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
5
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
6
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
7
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
8
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
9
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
10
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
11
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?
12
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
13
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
14
Viral Video: वा क्या कारीगरी है; विजेच्या खांबातून रस्ता, बंगळुरूतील व्हिडीओ व्हायरल, तुम्ही बघितला का?
15
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
16
Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!
17
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
18
गरिबांच्या खिशावर ‘दरोडा’ टाकणाऱ्या लाचखोरांच्या मालमत्तेवर ‘हातोडा’ कधी?
19
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
20
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली

किती ही महागाई? माणसांवर आता कोंबड्यांसाठीची ज्वारी खाण्याची वेळ, दरांत विक्रमी वाढ

By प्रशांत तेलवाडकर | Updated: November 14, 2022 16:23 IST

अन्नधान्याच्या दरांत विक्रमी महागाई, आता सर्वसामान्यांवर मिलबर गहू, पशुखाद्याची ज्वारी खाण्याची वेळ

- प्रशांत तेलाडकरऔरंगाबाद : गहू ३१ ते ५२ रुपये, ज्वारी ४५ ते ५२ रुपये आणि बाजारी २८ ते ३० रुपये किलो... हे भाव वाचून तुमचे डोके चक्रावले असेल... या तर मोंढ्यातील होलसेल विक्रीच्या किमती आहेत. किरकोळ बाजारात किलोमागे २ ते ५ रुपये जास्त मोजावे लागतात. स्वातंत्र्यानंतर इतिहासात अन्नधान्याचे दर एवढे महागले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना फायदा होत असल्याचा दावा केला जात असला तरी आजघडीला शेतकऱ्यांकडे धान्यसाठा नाही. बडे साठेबाज व्यापारी व कॉर्पोरेट कंपन्यांची चांदी झाली आहे. दुसरीकडे आता शरबती, लोकवन गहू दूरच आता ‘मिलबर’ हलक्या प्रतीच्या गव्हाची पोळी खाण्याची वेळ आली आहे. ‘आता आम्ही पोळी, भाकरी खायची नाही का,’ असा संतप्त सवाल सर्वसामान्य नागरिक सरकारला विचारत आहेत.

निर्यात झाली दुप्पटचालू वर्षात आतापर्यंत ४६ लाख टन गव्हाची निर्यात केली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत निर्यातीत जवळपास दुप्पट वाढ झाली आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे भारतातील गहू, ज्वारी, बाजरी आदी भरडधान्ये; तसेच रवा, मैदा, आटा यांनाही जगभरातून मागणी होत आहे. कॉर्पोरेट कंपन्यांनी हंगामात कमी भावात गव्हाची मोठ्या प्रमाणात खरेदी केली आहे. तेच आता चढ्या दराने गहू निर्यात करीत आहेत.

मिलबर गहू २७ ते २८ रुपये किलोमिलबर हा सर्वांत हलक्या दर्जाचा गहू. तो फक्त आटा, मैदा तयार करण्यासाठी वापरण्यात येतो. एरव्ही या गव्हाचे दर क्विंटलमागे १,८०० ते २,२०० रुपये असतात. आता त्याचे भाव २,७०० ते २,८०० रुपयांपर्यंत जाऊन पोहोचले आहेत. मिनी शरबती, लोकवन गहू ३,१०० ते ३,६०० रुपये, तर प्युअर शरबती गहू ४,८०० ते ५,२०० रुपये क्विंटल दराने खरेदी करावा लागत आहे. मागील वर्षी शरबती गव्हाचा दर ४,००० ते ४,५०० रुपये क्विंटल होता.

चार महिन्यांत ज्वारी ४० टक्क्यांनी महागलीपूर्वी ज्वारीची भाकरी गरीब खात होते, पण आता ज्वारीचे महत्त्व श्रीमंतांनाही पटले आहे. चार वर्षांपूर्वी कमी उत्पादनामुळे ज्वारीचे दर ४,५०० ते ५,००० रुपये क्विंटलपर्यंत होते. हा विक्रम मोडीत काढीत सध्या ४,५०० ते ५,२०० रुपयांदरम्यान ज्वारी विकली जात आहे. मागील चार महिन्यांत भाव ४० टक्क्यांनी वाढले आहेत.

बाजरीचे भाव पाहूनच ग्राहकांना भरतेय हुडहुडीबाजरीची भाकरी उष्ण असल्यामुळे हिवाळ्यात आवर्जून खाल्ली जाते. मात्र, यंदा परतीचा पावसाचा मोठा फटका महाराष्ट्रसह, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थानमधील बाजरीच्या पिकाला बसला. बाजारात विक्री येत असलेली ६० ते ७० टक्के बाजरी काळसर पडलेली आहे. ही बाजरी चक्क २,४०० ते २,५५० रुपये क्विंटल दराने विकली जात आहे. या बाजरीचा वापर पशुखाद्यासाठी केला जात आहे. चांगल्या दर्जाच्या० क्विंटलभर बाजरीसाठी २,८०० ते ३,००० रुपये मोजावे लागत आहेत.

आणखी भाव वाढतीलकेंद्र सरकारने निर्यात थांबवली नाही व अशीच परिस्थिती राहिली तर गहू, ज्वारीचे भाव आणखी वाढतील. कारण, हे धान्य साठेबाज व कार्पोरेट कंपन्यांच्या हातात आहेत. याच बड्या कंपन्या आटा, मैदा तयार करून मोठा नफा कमवत आहेत. मात्र, सर्वसामान्यांचा संताप व्यापाऱ्यांना सहन करावा लागत आहे; तसेच या भाववाढीचा फायदा शेतकऱ्यांनाही होत नाही. कारण त्यांनी गहू, ज्वारी मार्च-एप्रिलमध्ये कमी दरात विकली आहे.- नीलेश सोमाणी, होलसेल व्यापारी.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादInflationमहागाईMarketबाजारfoodअन्न