शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

किती आयुक्तांना पिटाळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 00:30 IST

औरंगाबाद महापालिकेत आयुक्तच टिकत नाहीत, अशी ख्याती आता शहरभर नव्हे, तर राज्यपातळीवर जाऊन पोहोचली आहे. येथे कायमस्वरूपी आयुक्त टिकून राहावेत यासाठी काय करावे, असा प्रश्न नगरविकास विभागाच्या अधिकाºयांना पडला आहे. १९८२ पासून २०१७ पर्यंत महापालिकेला तब्बल २६ आयुक्त प्राप्त झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : औरंगाबाद महापालिकेत आयुक्तच टिकत नाहीत, अशी ख्याती आता शहरभर नव्हे, तर राज्यपातळीवर जाऊन पोहोचली आहे. येथे कायमस्वरूपी आयुक्त टिकून राहावेत यासाठी काय करावे, असा प्रश्न नगरविकास विभागाच्या अधिकाºयांना पडला आहे. १९८२ पासून २०१७ पर्यंत महापालिकेला तब्बल २६ आयुक्त प्राप्त झाले. त्यातील ७ जणांना राजकीय मंडळींनी अक्षरश: पिटाळून लावले आहे, काहींनी तर परिस्थितीचा अंदाज घेऊन अवघ्या काही दिवसांमध्येच बदली करून घेतली आहे.महापालिकेत सध्या आयुक्तपद संगीत खुर्चीसारखे झाले आहे. मागील आठवड्यात पूर्णवेळ लाभलेले आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी मुसरी येथील प्रशिक्षणानंतर परत मनपात येणार नाही, असे सांगितले आहे. त्यांना ऐनवेळी कुठे नेमणूक द्यावी, असा प्रश्न प्रधान सचिवांना पडला असून, त्यांच्या जागी कोणाची नेमणूक करावी हा सर्वात मोठा प्रश्न आहे. महापालिकेत आयुक्त का टिकत नाही, यावर एक मोठे संशोधनही होऊ शकते. १९९१ पासून आजपर्यंत दोन आयुक्तांनी आपला कार्यकाळ पूर्ण केला. त्यात असीमकुमार गुप्ता आणि डॉ. पुरुषोत्तम भापकर यांचा समावेश होतो. उर्वरित आयुक्तांनी बोटावर मोजण्याएवढ्या महिन्यांतच बदली करून घेतली. काहींना बदली करून घेण्यास भाग पाडण्यात आले. राजकीय मंडळींनी आपले ‘व्हील पॉवर’वापरून काही आयुक्तांच्या बदल्या करून घेतल्या. मागील दोन दशकांतील आयुक्तांचा प्रवास त्यांच्यासोबत झालेल्या घडलेल्या घटनांचा आढावा घेतला, तर एक रंजक इतिहास उभा राहतो. मनपातील राजकीय मंडळींना आयुक्त नको असल्यास राजकीय गॉडफादरचा आधार घेण्यात येतो.अन्यथा प्रकाश महाजन यांच्यावर तर सेना-भाजप, एमआयएम नगरसेवकांनी मिळून अविश्वास ठराव पारित करून त्यांची बदली केली होती. विद्यमान आयुक्त मुगळीकर यांच्याबद्दल एकही तक्रार नव्हती. अचानक त्यांना मनपा नको म्हणण्याची वेळ का आली. हा प्रश्न सध्या तरी अनुत्तरित आहे.