शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
2
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
3
Video: "इरफान... प्रामाणिक राहा..."; IND vs PAK सामन्यानंतर गौतम गंभीर कॅमेऱ्यासमोर असं का बोलला?
4
अनंत अंबानी यांच्या वनताराला क्लीनचिट; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?
5
हवाई दलात इंजिनिअर लोकेश बहिणीच्या घरी आला आणि अचानक २४व्या मजल्यावरून मारली उडी
6
सत्तापालटाच्या अवघ्या ३ दिवसांत नेपाळच्या Gen Z आंदोलकांमध्ये असंतोष; सुशीला कार्कींच्या घराबाहेर निदर्शने!
7
पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर सूर्यकुमार यादवचं पत्नीसोबत जंगी सेलिब्रेशन, पाहा खास फोटो
8
Astro Tips: घर, प्लॉट विक्रीसाठी सगळे उपाय करून पाहिले? तरी निराशा? करा 'हा' प्रभावी तोडगा!
9
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
10
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
11
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
12
घाव भर गया है! परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'वर भाष्य, दिग्दर्शकासोबतचं नातं बिघडलं? म्हणाले...
13
४०% पार्ट्स होणार स्वस्त! सर्व्हिसिंगच्या बिलातही दिलासा; GST कपातीनंतर सोपा होणार कार-बाईकचा मेंटेनन्स
14
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
15
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप
16
शुक्र गोचर २०२५: शुक्रादित्य राजयोग; 'या' ६ राशी हात लावतील तिथे सोनं करतील!
17
ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार? सोशल मीडियावर चर्चा; आयकर विभागाने केलं स्पष्ट
18
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
19
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
20
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...

ज्या घरात ग्रंथ नाही, त्या घराला सौख्य नाही

By admin | Updated: March 31, 2015 00:38 IST

लातूर : समाजाच्या ज्ञानाचा पाया ग्रंथ आहे़ तर दुसरा पाया संस्कृती आहे़ त्यामुळे ज्या घरी ग्रंथ नाहीत, त्या घरी सौख्य नाही़ प्रत्येक घरात जसे देवघर असते,

लातूर : समाजाच्या ज्ञानाचा पाया ग्रंथ आहे़ तर दुसरा पाया संस्कृती आहे़ त्यामुळे ज्या घरी ग्रंथ नाहीत, त्या घरी सौख्य नाही़ प्रत्येक घरात जसे देवघर असते, तसे पुस्तकांचा ठेवा असायला हवा़ यातूनच ज्ञानाचा पाया मजबूत होईल, असे मत माजी खा़डॉ़जनार्दन वाघमारे यांनी येथे व्यक्त केले़जिल्हा परिषदेमार्फत राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान व नॅशनल बुक ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने ग्रंथ महोत्सव सुरु झाला आहे़ या महोत्सवानिमित्त सोमवारी डॉ़ बाबासाहेब आंबेडकर पार्क ते दयानंद महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारापर्यंत ग्रंथ दिंडी काढण्यात आली़ यावेळी ग्रंथ महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते़ अध्यक्षस्थानी जि़प़ अध्यक्षा प्रतिभाताई पाटील कव्हेकर होत्या़ मंचावर जि़प़ उपाध्यक्ष आण्णासाहेब पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी दिनकर जगदाळे, महिला व बालकल्याण सभापती सुलोचना बिदादा, जि़प़चे माजी अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे, डी़एऩ केंद्रे यांची प्रमुख उपस्थिती होती़ यावेळी डॉ़ जनार्दन वाघमारे म्हणाले, ग्रंथ चळवळीतून वाचक वाढणार आहे़ ग्रंथ चळवळ ही ज्ञानासाठी आहे़ त्यामुळे प्रत्येक शाळेत ग्रंथालय असायला हवेच़ ग्रंथातूनच ज्ञान मिळते़ समाजाच्या ज्ञानाचा ग्रंथच पाया आहे़ तर आपली संस्कृती दुसरा पाया आहे़ संस्कृतीचे जतन करण्यासाठी ग्रंथ वाचन आवश्यक आहे, असेही ते म्हणाले़ प्रास्ताविक माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी गणपतराव मोरे यांनी केले़ (प्रतिनिधी)