शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

पंधरा लाखांचा ‘पाहुणचार’ वादात

By admin | Updated: June 18, 2017 00:58 IST

औरंगाबाद : पंचायतराज समिती सदस्यांच्या पाहुणचारासाठी जिल्हा परिषदेने खर्च केलेला जवळपास १४ ते १५ लाख रुपयांचा तिढा दीड वर्षांपासून कायम आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : पंचायतराज समिती सदस्यांच्या पाहुणचारासाठी जिल्हा परिषदेने खर्च केलेला जवळपास १४ ते १५ लाख रुपयांचा तिढा दीड वर्षांपासून कायम आहे. पंचायतराज समितीप्रमुख संभाजी निलंगेकर यांच्यासह आठ ते दहा आमदार आॅक्टोबर २०१५ मध्ये जिल्हा परिषदेत आले होते. समितीचे जवळपास सर्वच मुद्दे जिल्हा परिषदेने निकाली काढले आहेत. समितीने केलेल्या शिफारसीनुसार बऱ्यापैकी अनुपालनही झालेले आहे; पण पाहुणचाराच्या १४ ते १५ लाख रूपयांचा तिढा अजूनही कायम आहे. सन २००६ नंतर पहिल्यांदाच विधान मंडळाच्या पंचायतराज समितीने १५ ते १७ आॅक्टोबर २०१५ असे सलग तीन दिवस जिल्हा परिषदेच्या विविध विभागांची झाडाझडती घेतली. जिल्हा परिषद प्रशासनाने समितीप्रमुख निलंगेकर व सदस्य आमदारांची राहण्याची व खाण्याची पंचतारांकित व्यवस्था केली होती. यासाठी प्रशासनाने जि. प. उपकरातून १४ ते १५ लाख रुपयांची उचल घेतली व ती पाहुणचारावर खर्च केली. तथापि, उपकरातून एवढी मोठी रक्कम उचल घेण्यापूर्वी प्रशासनाने सर्वसाधारण सभेची मान्यता घ्यायला हवी होती; ती न घेताच परस्पर उपकराचा निधी खर्च केला. पंचतारांकित पाहुणचार केल्यानंतरही पंचायतराज समितीने जिल्हा परिषदेवर भ्रष्टाचाराचा ठपका ठेवला. काही अवधीनंतर प्रशासनाने या खर्चाच्या मान्यतेचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेसमोर आणला. त्यास तत्कालीन सदस्य मंडळाने कडाडून विरोध केला व तो प्रस्ताव फेटाळला. त्यामुळे प्रशासनाची मोठी अडचण झाली. तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित चौधरी, तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) छायादेवी शिसोदे यांची बदली होण्यापूर्वी त्यांनी सदरील रकमेच्या खर्चास मान्यता घेण्यासाठी सदस्यांची मने वळवण्याचे प्रयत्न केले; पण सदस्य बधले नाहीत. आता त्यांच्या जागेवर मधुकरराजे आर्दड व मंजूषा कापसे हे आले आहेत. त्यांनी अद्याप या खर्चाबाबत नवीन सदस्य मंडळासमोर प्रस्ताव आणलेला नाही. अजूनही उपकरातील १४ ते १५ लाख रुपयांचा खर्च वादातीतच आहे.