शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
2
आजचे राशीभविष्य, २१ जुलै २०२५: नोकरी - व्यवसायात लाभदायी अन् यशदायी दिवस
3
उड्डाण करताच डाव्या बाजूचं इंजिन पेटलं; आगीमुळे बोईंगचे इमर्जन्सी लँडिंग
4
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
5
आधी ‘तिने’ तीन कोटी उकळले,  नंतर आणखी १० कोटी मागितले! ‘हनी ट्रॅप’ची चर्चा
6
ईडी कोणी ड्रोन नाही की सुपरकॉप नाही...मद्रास उच्च न्यायालयाचे ईडीच्या कार्यशैलीवर ताशेरे
7
हे कार्यकर्ते आहेत की गुंडांच्या टोळ्या?
8
योगींचा दिल्ली दौरा अन् प्रदेशाध्यक्ष निवडीची चर्चा; ओबीसी चेहरा किंवा महिला नेत्याची होऊ शकते निवड
9
नोकरीसाठी अडचण नको म्हणून चक्क पोटच्या मुलीलाच विकले
10
हवाई सुंदरीवर अत्याचार; क्रू मेंबरला अटक, मीरा रोड येथील घटना
11
प्रचंड उष्म्यामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणावर होतोय परिणाम, दीड वर्षांपर्यंत होऊ शकते घट
12
जगातील कोणीही भारताला आदेश देऊ शकत नाही, ट्रम्प यांचा दावा अन् उपरराष्ट्रपतींचे खडेबोल
13
इस्रायल की सशस्त्र टोळ्यांचा हल्ला? गाझामध्ये मदतीची प्रतीक्षा करणाऱ्यांवरच गोळीबार, ७३ जण ठार
14
तरुणांना भाषणबाजी नको, रोजगार हवा! राहुल गांधी यांनी व्यक्त केली चिंता
15
कृषिमंत्री कोकाटेंच्या मोबाइलवर पत्ते; विधानपरिषदेतील व्हिडीओने खळबळ
16
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
17
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
18
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
19
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
20
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO

पीककर्ज वाटपाचे घोडे अडलेलेच

By admin | Updated: June 10, 2016 00:05 IST

औरंगाबाद : पेरणी तोंडावर येऊनही बँकांकडून शेतकऱ्यांना अतिशय संथगतीने पीककर्जाचे वाटप सुरू आहे. त्यामुळे औरंगाबादसह मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी अडचणीत आला आहे.

औरंगाबाद : पेरणी तोंडावर येऊनही बँकांकडून शेतकऱ्यांना अतिशय संथगतीने पीककर्जाचे वाटप सुरू आहे. त्यामुळे औरंगाबादसह मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी अडचणीत आला आहे. आतापर्यंत विभागात बँकांकडून एकूण उद्दिष्टाच्या केवळ २४ टक्के एवढेच पीककर्ज वाटप करण्यात आले आहे. यात औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक ५९ टक्के तर हिंगोली जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजे केवळ १५ टक्केच पीककर्ज वाटप झाले आहे.सतत चार वर्षांच्या दुष्काळामुळे मराठवाड्यातील शेतकरी आर्थिक संकटात आहे. सध्या त्याच्याकडे पेरणीसाठीही पैसे नाहीत. म्हणूनच खरिपाच्या तोंडावर शेतकऱ्यांना प्राधान्याने पीक कर्ज वाटप करण्याचे आदेश राज्य सरकारने सर्व बँकांना दिलेले आहेत. विभागातील बँकांना पीककर्ज वाटपाचे उद्दिष्टही ठरवून देण्यात आलेले आहे. सरकारच्या नियोजनानुसार मराठवाड्यात सर्व प्रकारच्या बँकांना मिळून ९,८६३ कोटी रुपयांच्या पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिलेले आहे. गतवर्षी विभागात १३ लाख ४१ हजार शेतकऱ्यांना एकूण ७,११० कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आलेले होते. पेरणीच्या आधी पीककर्ज मिळाले तर पेरणीचा खर्च भागविता येईल म्हणून मराठवाड्यातील शेतकरी संबंधित बँकांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून चकरा मारत आहेत. मात्र, बँकांकडून त्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ होत आहे. त्याविरोधात महिनाभरात मराठवाड्यात शेतकऱ्यांनी ठिकठिकाणी आंदोलनेही केली; परंतु त्यानंतरही परिस्थितीत फारसा बदल झालेला नाही. आता मान्सून चोवीस तासांत महाराष्ट्राच्या सीमेवर धडकेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. मशागतीची कामे पूर्ण झाल्याने पेरणीसाठी शेतही तयार आहे. पण अजूनही (पान ५ वर)विभागात आतापर्यंत उद्दिष्टाच्या २४ टक्के इतके पीककर्ज वाटप झाले आहे. बँकांकडून कर्ज वाटपाची प्रक्रिया सुरू आहे. शेतकऱ्यांना वेळेत पीककर्ज मिळावे यासाठी बँकांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. - राजेश सुरवसे, विभागीय सहनिबंधक, औरंगाबाद