शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
4
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
5
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
6
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
7
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
8
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
9
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
10
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
11
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
12
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
13
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
14
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
15
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
16
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
17
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
18
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
19
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
20
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
Daily Top 2Weekly Top 5

पिकांची आशा मावळली; चाऱ्याची काळजी संपेना

By admin | Updated: July 29, 2015 00:49 IST

बीड : खरीप हंगामातील पिकांबाबत शेतकऱ्यांच्या आशा मावळल्या आहेत. चाऱ्याअभावी पावसाळ्यातही जनावरे दावणीला बांधावी लागत आहेत

बीड : खरीप हंगामातील पिकांबाबत शेतकऱ्यांच्या आशा मावळल्या आहेत. चाऱ्याअभावी पावसाळ्यातही जनावरे दावणीला बांधावी लागत आहेत. हिरवा चारा तर लांबच परंतु कडबा मिळणे देखील मुश्किल झाले आहे. खरीप हातचा गेल्याने उत्पादनात घट झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका तर बसलाच आहे. आता जनावरे जगवायची कशी? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. खरिपातील पिकांची लागवड केल्यापासून पावसाने ओढ दिल्याने सर्व पिके धोक्यात आली आहेत. पावसाने घोर निराशा केल्याने भर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये चाऱ्याअभावी व उन्हापासून बचाव होण्याच्या हेतूने जनावरे दुपारच्या वेळी दावणीला बांधली जायची. मात्र यंदा भरपावसाळ्यातही उन्हाळ्याच्या झळा बसत आहेत. अद्यापर्यंत एकही दमदार पाऊस झाला नसल्याने हिरव्या चारा तर उगवलाच नाही. चाऱ्याचा हातचा शिल्लक असावा म्हणून बाजारपेठात चाऱ्याची आवक घटली आहे. वाळलेल्या चाऱ्यातही कडब्याशिवाय पर्यायच नाही. जिल्ह्यातील कडब्याचा साठा शुन्य टक्के झाल्याने इतर जिल्ह्यातून चाऱ्याची आवक केली जात आहे. सध्या पावसाचे वातावरणही नसल्याने एक दिवसाआड चाऱ्याचे दर वाढत आहेत. गत महिन्यात १५०० शेकड्यावरचा कडबा सोमवारी २८०० रुपयांवर पोहचला होता. आर्थिक बाजू खालावल्याने शेतकऱ्यांना वाळलेला कडबाही खरेदी करणे अवघड झाले आहे. पावसाच्या आशेवर तात्पूरते भागेल या भावनेने शेतकरी आठ दिवस पुरेल एवढाच कडबा खरेदी करीत आहे. हिरवा चारा उपलब्ध नसल्याने त्याच्या बाजारपेठा बंद पडल्या आहेत. चाराटंचाईचा परिणाम दुग्धव्यवसायावरही झाला असून दुध संकलन निम्म्यावर आले आहे. उत्पादनाचे नुकसान व जोड व्यवसायही धोक्यात आल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. जनावरांची आठवडी बाजारात गर्दी होत आहे. मात्र कवडीमोल दर मिळत असल्याने शेतकऱ्यांना जितराब सांभाळण्याशिवाय पर्यायच नाही. यंदा सलग तिसऱ्या वर्षी पावसाने दगाबाजी केली आहे. त्यामुळे जिल्ह्यात चाराछावण्या व चारा डेपो सुरू करण्याची मागणी होत आहे. चाऱ्याबरोबर जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न उद्भवला आहे. (प्रतिनिधी)