शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले
2
"हा देश राम-सीता यांचा, लादेनचा नाही; या छोट्या ओसामाला..."; बिहारमध्ये हिमंत बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल
3
Demat अकाऊंटमध्ये ४३ कोटी ठेवणारे डॉक्टर व्हायरल; झिरोदाला म्हटलं स्कॅम; कामथ काय म्हणाले?
4
राज्य मंत्रिमंडळाचे २१ 'जम्बो निर्णय'; आचारसंहितेपूर्वी महायुती सरकारचा घोषणांचा धमाका
5
आयसीसीनं लॉरावर केली मर्जी बहाल! वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतवर अन्याय?
6
उत्पन्न वाढीसाठी एसटी रिटेल इंधन विक्री करणार, निविदा प्रक्रिया सुरू, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती 
7
एअर इंडियाच्या विमानात गडबड! दिल्लीहून बांगळुरूला जाणाऱ्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग
8
Relationship Tips: भांडणानंतर बायको रडत राहते आणि नवरा झोपी जातो, असे का?
9
महिला क्रिकेट विश्वचषक विजेत्या राज्यातील खेळाडूंना रोख पारितोषिक, सत्कार होणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा
10
९५ टक्के लोकांचा पहिली ते चौथी हिंदी भाषा लादण्याला विरोध; राज ठाकरेंच्या भेटीनंतर नरेंद्र जाधव म्हणाले...
11
"...तर गोळीचे उत्तर गोळ्याने दिले जाईल"; अमित शाह यांचा "नापाक" पाकिस्तानला सज्जड दम! विरोधकांवरही बरसले
12
Astro Tips: कडक मंगळाची पत्रिका म्हणजे नेमके काय? ती व्यक्ती तापदायकच असते का? वाचा 
13
‘एक बुथ, १० युथ’ या सुत्रानुसार युवक काँग्रेसने काम करा, जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवा, नसीम खान यांचं आवाहन
14
Mumbai: "जेवण का आणलं नाही?" रूममेट्सकडून टॅक्सी ड्रायव्हरची हत्या, साकीनाका येथील घटना!
15
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
16
मोठी डेडलाईन! पॅन कार्डशी आधार लिंक करण्याची अंतिम तारीख जाहीर; घरबसल्याही करता होईल काम
17
Groww IPO: 'ग्रो'चा आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुला; काय आहे प्राईज बँड, किती करावी लागणार गुंतवणूक, जाणून घ्या
18
रागाच्या भरात परेश रावल यांनी चक्क केली होती हाणामारी! म्हणाले, "एकाला थप्पड लगावली, दुसऱ्याच्या डोक्यात दगड..."
19
वर्गात अवघे १२ विद्यार्थी अन् पटावर ५०! शिक्षण अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांचे नाव विचारताच समोर आलं धक्कादायक सत्य
20
हृदयद्रावक! "माझ्या मुली गेल्या, आता मी काय करू?"; ३ बहिणींचा मृत्यू, आई-वडिलांचा टाहो

पिकांची आशा मावळली; चाऱ्याची काळजी संपेना

By admin | Updated: July 29, 2015 00:49 IST

बीड : खरीप हंगामातील पिकांबाबत शेतकऱ्यांच्या आशा मावळल्या आहेत. चाऱ्याअभावी पावसाळ्यातही जनावरे दावणीला बांधावी लागत आहेत

बीड : खरीप हंगामातील पिकांबाबत शेतकऱ्यांच्या आशा मावळल्या आहेत. चाऱ्याअभावी पावसाळ्यातही जनावरे दावणीला बांधावी लागत आहेत. हिरवा चारा तर लांबच परंतु कडबा मिळणे देखील मुश्किल झाले आहे. खरीप हातचा गेल्याने उत्पादनात घट झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका तर बसलाच आहे. आता जनावरे जगवायची कशी? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. खरिपातील पिकांची लागवड केल्यापासून पावसाने ओढ दिल्याने सर्व पिके धोक्यात आली आहेत. पावसाने घोर निराशा केल्याने भर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये चाऱ्याअभावी व उन्हापासून बचाव होण्याच्या हेतूने जनावरे दुपारच्या वेळी दावणीला बांधली जायची. मात्र यंदा भरपावसाळ्यातही उन्हाळ्याच्या झळा बसत आहेत. अद्यापर्यंत एकही दमदार पाऊस झाला नसल्याने हिरव्या चारा तर उगवलाच नाही. चाऱ्याचा हातचा शिल्लक असावा म्हणून बाजारपेठात चाऱ्याची आवक घटली आहे. वाळलेल्या चाऱ्यातही कडब्याशिवाय पर्यायच नाही. जिल्ह्यातील कडब्याचा साठा शुन्य टक्के झाल्याने इतर जिल्ह्यातून चाऱ्याची आवक केली जात आहे. सध्या पावसाचे वातावरणही नसल्याने एक दिवसाआड चाऱ्याचे दर वाढत आहेत. गत महिन्यात १५०० शेकड्यावरचा कडबा सोमवारी २८०० रुपयांवर पोहचला होता. आर्थिक बाजू खालावल्याने शेतकऱ्यांना वाळलेला कडबाही खरेदी करणे अवघड झाले आहे. पावसाच्या आशेवर तात्पूरते भागेल या भावनेने शेतकरी आठ दिवस पुरेल एवढाच कडबा खरेदी करीत आहे. हिरवा चारा उपलब्ध नसल्याने त्याच्या बाजारपेठा बंद पडल्या आहेत. चाराटंचाईचा परिणाम दुग्धव्यवसायावरही झाला असून दुध संकलन निम्म्यावर आले आहे. उत्पादनाचे नुकसान व जोड व्यवसायही धोक्यात आल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. जनावरांची आठवडी बाजारात गर्दी होत आहे. मात्र कवडीमोल दर मिळत असल्याने शेतकऱ्यांना जितराब सांभाळण्याशिवाय पर्यायच नाही. यंदा सलग तिसऱ्या वर्षी पावसाने दगाबाजी केली आहे. त्यामुळे जिल्ह्यात चाराछावण्या व चारा डेपो सुरू करण्याची मागणी होत आहे. चाऱ्याबरोबर जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न उद्भवला आहे. (प्रतिनिधी)