शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

पिकांची आशा मावळली; चाऱ्याची काळजी संपेना

By admin | Updated: July 29, 2015 00:49 IST

बीड : खरीप हंगामातील पिकांबाबत शेतकऱ्यांच्या आशा मावळल्या आहेत. चाऱ्याअभावी पावसाळ्यातही जनावरे दावणीला बांधावी लागत आहेत

बीड : खरीप हंगामातील पिकांबाबत शेतकऱ्यांच्या आशा मावळल्या आहेत. चाऱ्याअभावी पावसाळ्यातही जनावरे दावणीला बांधावी लागत आहेत. हिरवा चारा तर लांबच परंतु कडबा मिळणे देखील मुश्किल झाले आहे. खरीप हातचा गेल्याने उत्पादनात घट झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका तर बसलाच आहे. आता जनावरे जगवायची कशी? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. खरिपातील पिकांची लागवड केल्यापासून पावसाने ओढ दिल्याने सर्व पिके धोक्यात आली आहेत. पावसाने घोर निराशा केल्याने भर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये चाऱ्याअभावी व उन्हापासून बचाव होण्याच्या हेतूने जनावरे दुपारच्या वेळी दावणीला बांधली जायची. मात्र यंदा भरपावसाळ्यातही उन्हाळ्याच्या झळा बसत आहेत. अद्यापर्यंत एकही दमदार पाऊस झाला नसल्याने हिरव्या चारा तर उगवलाच नाही. चाऱ्याचा हातचा शिल्लक असावा म्हणून बाजारपेठात चाऱ्याची आवक घटली आहे. वाळलेल्या चाऱ्यातही कडब्याशिवाय पर्यायच नाही. जिल्ह्यातील कडब्याचा साठा शुन्य टक्के झाल्याने इतर जिल्ह्यातून चाऱ्याची आवक केली जात आहे. सध्या पावसाचे वातावरणही नसल्याने एक दिवसाआड चाऱ्याचे दर वाढत आहेत. गत महिन्यात १५०० शेकड्यावरचा कडबा सोमवारी २८०० रुपयांवर पोहचला होता. आर्थिक बाजू खालावल्याने शेतकऱ्यांना वाळलेला कडबाही खरेदी करणे अवघड झाले आहे. पावसाच्या आशेवर तात्पूरते भागेल या भावनेने शेतकरी आठ दिवस पुरेल एवढाच कडबा खरेदी करीत आहे. हिरवा चारा उपलब्ध नसल्याने त्याच्या बाजारपेठा बंद पडल्या आहेत. चाराटंचाईचा परिणाम दुग्धव्यवसायावरही झाला असून दुध संकलन निम्म्यावर आले आहे. उत्पादनाचे नुकसान व जोड व्यवसायही धोक्यात आल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. जनावरांची आठवडी बाजारात गर्दी होत आहे. मात्र कवडीमोल दर मिळत असल्याने शेतकऱ्यांना जितराब सांभाळण्याशिवाय पर्यायच नाही. यंदा सलग तिसऱ्या वर्षी पावसाने दगाबाजी केली आहे. त्यामुळे जिल्ह्यात चाराछावण्या व चारा डेपो सुरू करण्याची मागणी होत आहे. चाऱ्याबरोबर जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न उद्भवला आहे. (प्रतिनिधी)