शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

निवासस्थाने ओस

By admin | Updated: August 4, 2014 00:47 IST

अतुल शहाणे, पूर्णा पंचायत समिती परिसरामध्ये कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेले निवासस्थाने ओस पडले आहेत़ या निवासस्थानांमध्ये एकही कर्मचारी वास्तव्यास नाही़ परिणामी शासनाचा उद्देश असफल ठरला आहे़

अतुल शहाणे, पूर्णापंचायत समिती परिसरामध्ये कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेले निवासस्थाने ओस पडले आहेत़ या निवासस्थानांमध्ये एकही कर्मचारी वास्तव्यास नाही़ परिणामी शासनाचा उद्देश असफल ठरला आहे़ शासकीय कर्मचाऱ्यांची जिल्ह्यात अथवा जिल्ह्याबाहेर बदली होते़ अशा वेळी या कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी रहावे असे शासनाचे बंधन आहे़ मुख्यालयी राहण्यासाठी कर्मचाऱ्यांची गैरसोय होऊ नये, या उद्देशाने शासकीय निवासस्थाने बांधली जातात़ परंतु, कर्मचारी या निवासस्थानात न राहता जिल्ह्याच्या ठिकाणाहून अथवा त्यांच्या सोयीच्या ठिकाणाहून ये-जा करतात़ त्यामुळे ही निवासस्थाने ओस पडलेली असतात़ पूर्णा तालुक्याच्या निर्मितीनंतर पंचायत समिती अस्तित्वात आली़ सुरुवातीचे काही वर्षे तात्पुरत्या इमारतीत या कार्यालयाचे कामकाज चालले़ त्यानंतर पूर्णा- ताडकळस या मार्गावरील नवीन इमारतीमध्ये हे कार्यालये स्थलांतरित झाले़ या कार्यालयाच्या परिसरातच प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी १५ निवासस्थाने बांधण्यात आली़ तसेच सभापती, गटविकास अधिकारी यांच्यासाठी दोन सुसज्ज निवासस्थानेही उभारली़ परंतु, सध्याच्या स्थितीला या निवासस्थानांमध्ये एकही कर्मचारी वास्तव्यास नाही़ त्यामुळे निवासस्थानांची पडझड होत आहे़ परभणी, नांदेड या रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकानुसार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अप-डाऊन सुरू असते़ परिणामी शासकीय कार्यालय देखील रेल्वेच्या वेळेनुसारच चालते़ याचा त्रास नागरिक आणि शेतकऱ्यांना सहन करावा लागतो़ कर्मचारी कार्यालयात वेळेवर भेट नसल्याने कामे रखडली जातात. एकाच कामासाठी चकरा माराव्या लागतात. कोट्यवधींंचा खर्च करून उभारलेली निवासस्थाने आजमितीला मात्र ओस पडलेली आहेत़ त्यामुळे शासनाचा हा खर्च वाया जात आहे़ निवासस्थानांची पडझड१५ वर्षांपूर्वी ही निवासस्थाने बांधली आहेत़ परंतु, या संपूर्ण काळात या ठिकाणी कर्मचारी वास्तव्यास आले नाहीत़ त्यामुळे निवासस्थानांमध्ये मोकाट जनावरांचा वावर वाढला आहे़ स्वच्छता नसल्याने सर्वत्र घाण पसरली आहे़ झाडे वाढली आहेत़ खिडक्या आणि दरवाज्यांची मोडतोड झाली आहे़ या निवासस्थानांचा सुयोग्य वापर होण्यासाठी आता पंचायत समितीलाच पावले उचलणे गरजेचे झाले आहे़ निवासस्थानांमध्ये सुविधांचा अभाव शहरापासून दूर अंतरावर ही निवासस्थाने बांधली आहेत़ त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये या ठिकाणी राहताना असुरक्षिततेची भावना निर्माण होते़ तसेच पाणी, स्वच्छता, वीज यासारख्या सुविधांचा अभाव असल्याचे सांगितले जाते़ परंतु, असे असले तरी या सुविधा उपलब्ध करून कर्मचाऱ्यांनी निवासस्थानांमध्ये राहणे गरजेचे आहे़