शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

ऐतिहासिक हिमायतबागेला तातडीने वाचविण्याची गरज!

By admin | Updated: July 21, 2014 00:43 IST

डॉ. शेख रमजान, औरंगाबाद औरंगाबाद शहर वसविले मलिक अंबरने. अहमदनगरच्या निजामशाहीचा तो शेवटचा राजा. तो एक निग्रो होता.

डॉ. शेख रमजान, औरंगाबादऔरंगाबाद शहर वसविले मलिक अंबरने. अहमदनगरच्या निजामशाहीचा तो शेवटचा राजा. तो एक निग्रो होता. आफ्रिकेतला गुलामच तो. आई-वडिलांनी १२-१३ वर्षांचा असताना त्याला विकले. अहमदनगरच्या एका सरदाराने त्याला विकत घेतले. मलिक अंबर येथेच लहानाचा मोठा झाला. पुढे अहमदनगर निजामशाहीचा तोच सर्वेसर्वा झाला. मोघलांपासून बचाव करण्यासाठी त्याला दौलताबादच्या किल्ल्यात राहावे लागले. पुढे सुरक्षित शहर म्हणून त्याने औरंगाबादला राजधानीचे शहर म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी औरंगाबाद म्हणजे काय, तर खडकेश्वर मंदिर आणि त्याच्या शेजारी २०-३० झोपड्या. त्याने हे शहर विकसित करण्यासाठी एक नियोजन केले. त्यानुसारच पुढे हे शहर वाढले. रस्ते बांधले गेले. प्रत्येक सरदाराला एकेक भाग वाटून दिला. पुढे या सरदारांनीच आपापल्या भागाचा विकास केला. त्यावेळी औरंगाबादसमोर सर्वांत मोठा प्रश्न पाण्याचा होता. दोन प्रकारे त्याने पाण्याची व्यवस्था केली. त्याने एक मोठा तलाव बांधण्याचा निर्णय घेतला. शहराच्या उत्तरेचा भाग उंचावर असल्याने हा तलाव त्याने याच दिशेला बांधला. सलीम अली तलाव हे त्याचे अलीकडचे नाव. साधारण १९८३ च्या काळात ज्येष्ठ पक्षीतज्ज्ञ सलीम अली यांनी या तलावाला भेट दिली. दिल्ली तलाव नावाने ओळखला जाणारा तलाव पुढे सलीम अलींच्या नावाने ओळखला जाऊ लागला. ज्याने या तलावाची उभारणी केली त्या मलिक अंबरचे नाव मागेच राहिले. एवढा एक तलाव बांधून मलिक अंबर थांबला नाही, तर खाम नदीचे पाणी अडविण्यासाठी आमखास मैदान आणि गणेश कॉलनी अशा दोन ठिकाणी त्याने बांध घातला. यातून बाहेर पडणाऱ्या पाण्यासाठी त्याने नवा प्रवाह तयार केला. बेगमपुरा, बारापुल्लाच्या जवळून होलीक्रॉस हायस्कूलच्या जवळून असा हा पाण्याचा प्रवाह बाहेर काढण्यात आला. त्यामुळे भविष्यात औरंगाबादेत जेवढ्या विहिरी खोदल्या गेल्या त्या सर्वांना भरपूर पाणी लागले. या तलावात त्याने कमळाची लाखो फुले लावली. औरंगजेबाच्या काळापर्यंत म्हणजे १६६० पर्यंत हा तलाव तसाच होता. १६८३ मध्ये औरंगजेब बादशहा म्हणून औरंगाबादला आला. तोपर्यंत हा तलाव अगदी तसाच होता. त्याने किलेअर्क भागात आपली वस्ती वसविली. चुन्याच्या भिंती असल्याने अडविलेल्या पाण्यामुळे ओलावा निर्माण होऊ लागला. त्यामुळे लोक आजारी पडू लागले. हा प्रकार लक्षात येताच या जागेवर बगिचा उभारण्याचे ठरले. दगड-मातीची भर टाकून ३०० एकरांवर बाग फुलविण्यात आली. आंबा, पेरू, चिंच हे या बागेचे वैशिष्ट्य. पशू-पक्षी हे आणखी एक वैभव. बागेत माणसांचा हस्तक्षेप वाढल्याने हे सारे वैभव आता संपत आहे. लोकांचा त्रास वाढत आहे. त्यांना या बागेत प्रवेश द्यायला हवा; पण तो एकाच मार्गाने. वाट्टेल तिथे फिरण्याची मुभा नसावी. असे केले तरच ही ऐतिहासिक बाग वाचेल.