शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

पर्यटन राजधानीचा ऐतिहासिक वारसा राष्ट्रगीतात चित्रित; औरंगाबाद हिस्ट्री सोसायटीचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 19:57 IST

१४ फेब्रुवारी रोजी एमजीएम संस्थेच्या रुक्मिणी सभागृहात सायंकाळी ५ वाजता होणार लोकार्पण.

ठळक मुद्देके. के. मोहम्मद यांच्या हस्ते लोकार्पण

औरंगाबाद : ऐतिहासिक वास्तूंमुळे जागतिक नकाशावर असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील वारसा ५२ सेकंदांच्या ‘राष्ट्रगीता’मध्ये चित्रित केला आहे. या वैभवशाली वारसाचे दर्शन घडविणाऱ्या राष्ट्रगीताचे लोकार्पण भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे  माजी संचालक आणि आगाखान सेंटर फॉर कल्चर अ‍ॅण्ड हेरिटेजचे विद्यमान प्रकल्प संचालक डॉ. के. के. मोहम्मद यांच्या हस्ते १४ फेब्रुवारी रोजी एमजीएम संस्थेच्या रुक्मिणी सभागृहात सायंकाळी ५ वाजता होणार आहे. 

औरंगाबाद हिस्ट्री सोसायटीतर्फे दोन वर्षांपूर्वी राष्ट्रगीतात वैभवशाली वारसा चित्रित करण्याचा ‘अमेझिंग औरंगाबाद : जन गण मन’ हा प्रकल्प हाती घेतला होता. त्यास सेंसॉर बोर्डाकडून नुकतीच मंजुरी मिळाली आहे. यानंतर त्याचे लोकार्पण करण्यात येत असल्याची माहिती सोसायटीचे सदस्य अ‍ॅड. स्वप्नील जोशी यांनी महाराष्ट्र गांधी भवन स्मारक निधी संस्थेच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. देशात प्रसिद्ध असलेल्या ‘मिले सूर मेरा तुम्हारा’च्या धर्तीवर प्रत्येक ऐतिहासिक वास्तंूच्या ठिकाणी राष्ट्रगीताचे कडवे मान्यवरांनी गायले आहे. अशा पद्धतीने बहुतांश वास्तू या राष्ट्रगीतामधून दाखविण्याचा प्रयत्न केला असल्याची माहितीही अ‍ॅड. जोशी यांनी दिली.

या ऐतिहासिक वास्तूंमध्ये अजिंठा- वेरूळ लेणी, दौलताबादचा किल्ला, बीबीका मकबरा, हिमायतबाग, जायकवाडी धरण, दिल्लीगेट, घाटी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, मराठवाडा अ‍ॅटो क्लस्टर, सरस्वती भुवन शिक्षण संस्था, नुकतेच तयार झालेले रामकृष्ण मंदिर आदींचा समावेश आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदाच शहर आणि जिल्ह्यातील ऐतिहासिक वास्तूंचा वारसा राष्ट्रगीतामधून दाखविण्यात येत आहे. या कार्यक्रमाला शहरवासीयांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन, संस्थेच्या सचिव डॉ. बिना सेंगर,  अ‍ॅड. जोशी यांनी केले. या पत्रकार परिषदेला औरंगाबाद हिस्ट्री सोसायटीचे सदस्य प्रमोद माने, स्वप्नील खरे, अमित देशपांडे आदी उपस्थित होते.

या महनीय व्यक्तींनी गायले राष्ट्रगीतऐतिहासिक वास्तूंच्या ठिकाणी शहरातील महनीय व्यक्तींनी राष्ट्रगीताचे कडवे गायले आहे. यामध्ये पद्मश्री डॉ. यू. म. पठाण, फातेमा झकेरिया, दिवंगत दिनकर बोरीकर, बा. वि. गर्गे, पंडित नाथराव नेरळकर, पंडित विश्वनाथ ओक, स्वातंत्र्यसैनिक  ना. वि. देशपांडे, ताराबाई लड्डा, दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, प्रा. दिलीप घारे, कवी डॉ. दासू वैद्य, इतिहासकार रा. श्री. मोरवंचीकर, डॉ. दुलारी कुरेशी, रफत कुरेशी, जलतज्ज्ञ प्रा. प्रदीप पुरंदरे, पक्षीमित्र दिलीप यार्दी, उद्योजक राम भोगले, चित्रकार विजय कुलकर्णी, आंतरराष्ट्रीय छायाचित्रकार बैजू पाटील, एमजीएमचे सचिव अंकुशराव कदम, प्राचार्य प्रतापराव बोराडे, साहित्यिक प्राचार्य रा. रं. बोराडे, बाबा भांड, कुलगुरू डॉ. वि. ल. धारूरकर, सामाजिक कार्यकर्त्या डॉ. स्मिता अवचार यांच्यासह उद्योजक, घाटीतील डॉक्टर, परिचारिका,  विद्यार्थी आदींचा समावेश आहे. 

टॅग्स :National Anthemराष्ट्रगीतAurangabadऔरंगाबादhistoryइतिहास