शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

हिंगोलीत भारनियमनाचा झाला कहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 00:11 IST

एकीकडे २४ तास वीजपुरवठ्याच्या वल्गना केल्या जात असताना हिंगोली जिल्ह्यात मात्र महावितरणच्या अवकृपेने नेमके किती तास भारनियमन सुरू आहे, हेही कळयला मार्ग नाही. लघुव्यावसायिक तर यात पार भरडून निघाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : एकीकडे २४ तास वीजपुरवठ्याच्या वल्गना केल्या जात असताना हिंगोली जिल्ह्यात मात्र महावितरणच्या अवकृपेने नेमके किती तास भारनियमन सुरू आहे, हेही कळयला मार्ग नाही. लघुव्यावसायिक तर यात पार भरडून निघाले आहेत.सण, उत्सवाच्या काळात २४ तास वीजपुरवठा केला म्हणून की काय सध्या शहरात कायम आठ ते दहा तासांचे भारनियमन होत आहे. शहरातील काही भागांना तर महावितरणने जणू ठरवून लक्ष्य केल्याचे चित्र आहे. त्यात बांगरनगर, जिजामातानगर, शास्त्रीनगर, शिवाजीनगर, गांधी चौक मार्ग व परिसर या भागातील वीजपुरवठा सातत्याने खंडित होत आहे. त्यामुळे या भागातून मागील काही दिवसांपासून नागरिकांतून मोठ्या प्रमाणात ओरड होत आहे. शिवाय याच भागात जवळपास व्यापारी प्रतिष्ठाने आहेत. त्यांना या भारनियमनामुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. इन्व्हर्टरही तीन ते चार तासच चालते. मात्र दिवसातून सात ते आठ तास भारनियमनातच जात आहेत.कधी भारनियमन तर कधी दुरुस्तीचे कारण सांगितले जाते. त्यामुळे अधिकाºयांनाच नेमका काही बोध होत नसेल तर महावितरणचा कारभार कशा पद्धतीने चालू आहे, याची प्रचिती येते. तर पावसाळापूर्व दुरुस्तीत केलेला लाखोंचा खर्च मग नेमका कशावर खर्च केला? याचाही शोध लागणे अपेक्षित आहे. काही दिवसांपूर्वी चक्क उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाºयांच्या कंत्राटदारीवर बोट ठेवले होते. त्यामुळे महावितरणची चौकशीही लागली होती. सर्व कामांची अंदाजपत्रके व संचिकाही मागविल्या गेल्या होत्या. त्याचे पुढे काय झाले, हे काही कळायला मार्ग नाही. विशेष म्हणजे शहरातील दुरुस्तीची कामे केल्याचे सांगितले जात असले तरीही जागोजाग वाकलेले खांब, लोंबकळलेल्या तारा दिसत आहेत.महावितरणकडून अधिकाºयांना खडसावणीच्या सुरात बोलणाºयांची कामे तेवढी वेळेत होतात, इतरांना मात्र बोलायलाही त्यांना फुरसत नसते, अशी गत झाली आहे. मात्र सामान्यांनी आवाज चढविल्यास त्याला शासकीय कामात अडथळ्याचे हत्यार दाखवून माघारी फिरविण्याचे प्रतापही काही अधिकारी करीत आहेत. या सर्व भानगडीत नागरिकांच्या भावनांचा उद्रेक झाल्यासही नवल नाही.