शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

हिंगोली जिल्ह्यात रबीच्या ७८ टक्के पेरण्याच पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 16:53 IST

यंदा परतीच्या पावसाने रबीच्या पेरण्यांना मोठा विलंब झाला.

ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या अद्यापही पेरण्या सुरू पेरण्या करताना वीज, पाण्याची मोठी अडचण

हिंगोली : जिल्ह्यात रबीची रखडलेली पेरणी कॅनॉलला पाणी आल्याने काही प्रमाणात वाढली आहे. आता रबीची पेरणी ७८ टक्के आटोपली असून काहींना विलंबाने पाणी मिळाल्याने अजूनही पेरणी करण्यात येत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

यंदा परतीच्या पावसाने रबीच्या पेरण्यांना मोठा विलंब झाला. त्यातही शेतकऱ्यांना अतिवृष्टीतील नुकसानीचे पंचनामे होण्यासाठी शेतातच सुड्या ठेवण्याची वेळ आली होती. तर काहींनी काढणीची पसरच पंचनाम्यात दिसावी म्हणूनही विलंब केला. त्यामुळे दीपावलीनंतरही बराच काळ ही शेत रिकामे झाले नव्हते. त्यानंतर मशागत व इतर कामांत वेळ गेल्याने रबीच्या पेरण्या लांबल्या होत्या. त्यातही विजेची समस्या व कॅनॉलचे पाणी मिळत नसल्याने अनेकांना पेरणी करण्यास विलंब झाला. यंदा गव्हाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता होती. मात्र उसाची लागवड वाढल्याने गव्हाचा पेरा त्या तुलनेत कमी झाला आहे. गहू ४४ हजार हेक्टरवर अपेक्षित असताना १८ हजार ४७३ हेक्टरवर पेरणी झाली.  हरभऱ्याचा पेरा मात्र वाढला असून ७२ हजार ८५६ हेक्टरवर अपेक्षित असताना ९१ हजार ४७२ हेक्टरवर पेरणी झाली आहे. त्याचबरोबर रबी ज्वारी १२ हजार ५१ हेक्टरवर अपेक्षित असताना ७५४१ हेक्टर, रबी मका हजार हेक्टरवर अपेक्षित असताना ४२0 हेक्टर, इतर तृणधान्य ५0९ हेक्टर अपेक्षित असताना १८२ हेक्टरवर पेरणी झाली आहे. यंदा दोन लाख हेक्टरवर रबी पेरणी अपेक्षित होती. मात्र तेवढे क्षेत्र गाठता आले नसल्याचे चित्र असून आणखी पेरणी सुरूच आहे.

कळमनुरी, वसमतचे रबीचे क्षेत्र घटलेयंदा कळमनुरी व वसमत तालुक्यात रबीची पेरणी कमी झाली. मात्र या दोन्ही तालुक्यांत उसाचे क्षेत्र वाढले आहे. कळमनुरीत अपेक्षित ४0 हजार ५६६ पैकी २७४0७ हेक्टर तर वसमतला ४१८0८ हेक्टरपैकी १८८0३ हेक्टरवर पेरणी झाली आहे.४औंढा नागनाथ तालुक्यात १५ हजार हेक्टरवर रबीची पेरणी अपेक्षित असताना १९ हजार ९३४ हेक्टरवर झाली. सेनगावात २१ हजार ६९२ हेक्टर अपेक्षित असताना २१ हजार ६११ हेकटरवर झाली. तर हिंगोलीत ३0 हजार ५0२ हेक्टरवर अपेक्षित असताना ३0 हजार ३३४ हेक्टरवर पेरणी झाली. जिल्ह्यात काही प्रमाणात सुर्यफूल, करडई, जवस आदी पिकेही घेण्यात आली आहेत. मात्र त्याच्या नोंदी दिसत नाहीत.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्र