शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
7
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
8
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
9
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
10
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
11
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
12
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
13
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
14
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
15
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
16
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
17
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
18
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
19
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
20
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोलीत पुन्हा वीज प्रश्न पेटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 23:38 IST

जिल्ह्यातील विविध गावातील विजेचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. त्यामुळे शेतकºयांना पीकांना पाणीही देता येत तर नाहीच, परंतु रात्रही अंधारात काढावी लागते आहे. त्यामुळे ९ ते १० गावातील शेतकºयांनी शुक्रवारी (दि.१०) विद्युत वितरण कंपनीच्या अभियंत्यास घेराव घालून रोहित्राची मागणी केली.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यातील विविध गावातील विजेचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. त्यामुळे शेतकºयांना पीकांना पाणीही देता येत तर नाहीच, परंतु रात्रही अंधारात काढावी लागते आहे. त्यामुळे ९ ते १० गावातील शेतकºयांनी शुक्रवारी (दि.१०) विद्युत वितरण कंपनीच्या अभियंत्यास घेराव घालून रोहित्राची मागणी केली. तीन दिवसात रोहित्र बदलून न दिल्यास कार्यालयास कुलपू ठोकण्याचा इशारा राष्टÑवादी काँग्रेसने दिला.मागील काही दिवसांपूर्वी विद्युत वितरण कंपनीच्यावतीने शेतकºयांना कोणतीही पूर्व कल्पना न देता कृषीचा विद्युत पुरवठा खंडीत केला. त्यामुळे शेतकºयांना रबीच्या पिकांना पाणी देणे अवघड झाले आहे. काही गावठान फिडरचाही पुरवठा खंडीत केल्याने ग्रामस्थांना रात्र अंधारात काढावी लागत आहे. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत. शुक्रवारी ९ ते १० गावातील शेतकरी एकत्र आले. राष्ट्रवादीच्या नेतृत्वात त्यांनी महावितरणच्या अभियंत्याच्या दालनासमोर ठिय्या दिला. यावेळी जि. प. उपाध्यक्ष अनील पतंगे, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, सपाचे जिल्हाध्यक्ष शेख नईम शेख लाल आदीसह शेतकºयांची उपस्थिती होती. शेतकºयांनी आप- आपल्या गावातील रोहित्राची व्यथा अधिकाºयांसमोर मांडली. यामध्ये उटी ब्रम्हचारी येथे ३ रोहित्र, चिखलागर १, वडहिवरा १, हुडी लिंबाळा १, वरुड गवळी १, वायचाळ पिंपरी २, लोहगाव १, सवना २, गोरेगाव २, वारंगा मसाई ३ असे एकूण १७ रोहित्रांचा प्रश्न समोर आला. यातील काही गावातील रोहित्र महावितरणमध्ये शेतकºयांनी स्वखर्चाने आणून टाकले आहेत. त्यामुळे अनेक गावातील शेतकरी अंधाराचा सामना करत आहे. वीज बिलाचे पैसे भरण्यासाठी कमी भावाने सोयाबीन विकण्याची वेळ आल्याचे शेतकरी मोठ्या पोटतिडकीने सांगत होते. एकूण १४० रोहित्राचा प्रश्न आहे. आॅईल नसल्याने अडचणी येत आहेत. येत्या चार ते आठ दिवसात आॅईल उपलब्ध होणार आहे. सर्वच रोहित्राचा प्रश्न सुटणार असल्याचे कार्यकारी अभियंता शांतीलाल चौधरी यांनी सांगितले. तसेच शेतकºयांनी थोडा धीर धरण्याचेही त्यांनी आवाहन केले.