शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
3
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
4
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
5
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
6
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
7
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
8
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
9
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
10
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
11
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
12
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
13
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
14
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
15
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
16
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
17
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
18
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
19
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
20
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं

हिंगोलीत पुन्हा वीज प्रश्न पेटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 23:38 IST

जिल्ह्यातील विविध गावातील विजेचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. त्यामुळे शेतकºयांना पीकांना पाणीही देता येत तर नाहीच, परंतु रात्रही अंधारात काढावी लागते आहे. त्यामुळे ९ ते १० गावातील शेतकºयांनी शुक्रवारी (दि.१०) विद्युत वितरण कंपनीच्या अभियंत्यास घेराव घालून रोहित्राची मागणी केली.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यातील विविध गावातील विजेचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. त्यामुळे शेतकºयांना पीकांना पाणीही देता येत तर नाहीच, परंतु रात्रही अंधारात काढावी लागते आहे. त्यामुळे ९ ते १० गावातील शेतकºयांनी शुक्रवारी (दि.१०) विद्युत वितरण कंपनीच्या अभियंत्यास घेराव घालून रोहित्राची मागणी केली. तीन दिवसात रोहित्र बदलून न दिल्यास कार्यालयास कुलपू ठोकण्याचा इशारा राष्टÑवादी काँग्रेसने दिला.मागील काही दिवसांपूर्वी विद्युत वितरण कंपनीच्यावतीने शेतकºयांना कोणतीही पूर्व कल्पना न देता कृषीचा विद्युत पुरवठा खंडीत केला. त्यामुळे शेतकºयांना रबीच्या पिकांना पाणी देणे अवघड झाले आहे. काही गावठान फिडरचाही पुरवठा खंडीत केल्याने ग्रामस्थांना रात्र अंधारात काढावी लागत आहे. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत. शुक्रवारी ९ ते १० गावातील शेतकरी एकत्र आले. राष्ट्रवादीच्या नेतृत्वात त्यांनी महावितरणच्या अभियंत्याच्या दालनासमोर ठिय्या दिला. यावेळी जि. प. उपाध्यक्ष अनील पतंगे, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, सपाचे जिल्हाध्यक्ष शेख नईम शेख लाल आदीसह शेतकºयांची उपस्थिती होती. शेतकºयांनी आप- आपल्या गावातील रोहित्राची व्यथा अधिकाºयांसमोर मांडली. यामध्ये उटी ब्रम्हचारी येथे ३ रोहित्र, चिखलागर १, वडहिवरा १, हुडी लिंबाळा १, वरुड गवळी १, वायचाळ पिंपरी २, लोहगाव १, सवना २, गोरेगाव २, वारंगा मसाई ३ असे एकूण १७ रोहित्रांचा प्रश्न समोर आला. यातील काही गावातील रोहित्र महावितरणमध्ये शेतकºयांनी स्वखर्चाने आणून टाकले आहेत. त्यामुळे अनेक गावातील शेतकरी अंधाराचा सामना करत आहे. वीज बिलाचे पैसे भरण्यासाठी कमी भावाने सोयाबीन विकण्याची वेळ आल्याचे शेतकरी मोठ्या पोटतिडकीने सांगत होते. एकूण १४० रोहित्राचा प्रश्न आहे. आॅईल नसल्याने अडचणी येत आहेत. येत्या चार ते आठ दिवसात आॅईल उपलब्ध होणार आहे. सर्वच रोहित्राचा प्रश्न सुटणार असल्याचे कार्यकारी अभियंता शांतीलाल चौधरी यांनी सांगितले. तसेच शेतकºयांनी थोडा धीर धरण्याचेही त्यांनी आवाहन केले.