शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

महामार्गचा हलगर्जीपणा

By admin | Updated: December 24, 2016 00:51 IST

उमरगा : मुंबई-हैदराबाद या महामार्गाची सध्या मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली

उमरगा : मुंबई-हैदराबाद या महामार्गाची सध्या मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून, जागोजागी पडलेले खड्डे, खचलेल्या साईडपट्ट्याही अपघाताला निमंत्रण देत आहेत. असे असतानाच सध्या महामार्ग रूंदीकरणाचे काम सुरू असून, सुरक्षिततेच्या दृष्टीने सूचना फलक लावणे, बॅरिगेटींग लावणे, रंगीत पट्ट्या ओढणे याकडेही महामार्ग प्रशासनाचा कानाडोळा झाला आहे. यामुळेच शुक्रवारी येणेगूरनजीकच्या पुलावर दोन बसची टक्कर होऊन पाच जणांचा बळी गेला. मुंबई-हैदराबाद या महामार्गाचे चौपदरीकरणाच्या काम सध्या हाती घेण्यात आले आहे. मात्र, हे काम करताना सुरक्षिततेच्या दृष्टीने कंत्राटदार कंपनीकडून काळजी घेतलीजात नसल्याचे दिसत आहे. नवीन तयार केलेला रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला असून, यावरही खड्डे पडण्यास सुरूवात झाल्याचे काही ठिकाणी पहावयास मिळत आहे. हा महामार्ग देशातील अनेक प्रमुख शहरांना जोडतो. त्यामुळे या मार्गावरून रोज हजारो छोट्या-मोठ्या वाहनांची वाहतूक असते. मुंबई, पुणे, सोलापूरपर्यंत चौपदरीकरणाचे काम पूर्ण झालेले असून, सोलापूर ते कर्नाटक सीमेपर्यंतचे ८० किमीच्या चौपदरीकरणाचे काम सध्या चालू आहे. त्यामुळे जुन्या रस्त्याची डागडुजी करण्याकडे महामार्ग रस्ते विकास महामंडळाने दुर्लक्ष केलेले आहे. जुन्या रस्त्यावर प्रचंड खड्डे पडलेले असल्याने वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते. त्यातच दस्तापूर ते कर्नाटक सीमेपर्यंत ४० किमी अंतरावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, या भागात रोज किमान एक तरी छोटा-मोठा अपघात घडत आहे. या मार्गालगतच्या येणेगूर, दाळिंब, येळी, बलसूर, जकेकूर, उमरगा, तुरोरी, तलमोड आदी गावातील नागरिकांनी सातत्याने या महामार्गाच्या दुरवस्थेबद्दल आवाज उठविला, आंदोलनेही केली. मात्र, प्रशासनाला अद्याप जाग आलेली नाही. यातील सर्वाधिक अपघात दस्तापूर ते कर्नाटक सीमा या ४०-४५ किमीच्या अंतरात घडत आहेत. (वार्ताहर)