शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
4
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
5
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
6
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
7
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
8
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
9
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
10
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
11
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
12
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
13
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
14
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
15
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
16
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
17
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
18
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
19
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
20
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?

महामार्गचा हलगर्जीपणा

By admin | Updated: December 24, 2016 00:51 IST

उमरगा : मुंबई-हैदराबाद या महामार्गाची सध्या मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली

उमरगा : मुंबई-हैदराबाद या महामार्गाची सध्या मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून, जागोजागी पडलेले खड्डे, खचलेल्या साईडपट्ट्याही अपघाताला निमंत्रण देत आहेत. असे असतानाच सध्या महामार्ग रूंदीकरणाचे काम सुरू असून, सुरक्षिततेच्या दृष्टीने सूचना फलक लावणे, बॅरिगेटींग लावणे, रंगीत पट्ट्या ओढणे याकडेही महामार्ग प्रशासनाचा कानाडोळा झाला आहे. यामुळेच शुक्रवारी येणेगूरनजीकच्या पुलावर दोन बसची टक्कर होऊन पाच जणांचा बळी गेला. मुंबई-हैदराबाद या महामार्गाचे चौपदरीकरणाच्या काम सध्या हाती घेण्यात आले आहे. मात्र, हे काम करताना सुरक्षिततेच्या दृष्टीने कंत्राटदार कंपनीकडून काळजी घेतलीजात नसल्याचे दिसत आहे. नवीन तयार केलेला रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला असून, यावरही खड्डे पडण्यास सुरूवात झाल्याचे काही ठिकाणी पहावयास मिळत आहे. हा महामार्ग देशातील अनेक प्रमुख शहरांना जोडतो. त्यामुळे या मार्गावरून रोज हजारो छोट्या-मोठ्या वाहनांची वाहतूक असते. मुंबई, पुणे, सोलापूरपर्यंत चौपदरीकरणाचे काम पूर्ण झालेले असून, सोलापूर ते कर्नाटक सीमेपर्यंतचे ८० किमीच्या चौपदरीकरणाचे काम सध्या चालू आहे. त्यामुळे जुन्या रस्त्याची डागडुजी करण्याकडे महामार्ग रस्ते विकास महामंडळाने दुर्लक्ष केलेले आहे. जुन्या रस्त्यावर प्रचंड खड्डे पडलेले असल्याने वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते. त्यातच दस्तापूर ते कर्नाटक सीमेपर्यंत ४० किमी अंतरावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, या भागात रोज किमान एक तरी छोटा-मोठा अपघात घडत आहे. या मार्गालगतच्या येणेगूर, दाळिंब, येळी, बलसूर, जकेकूर, उमरगा, तुरोरी, तलमोड आदी गावातील नागरिकांनी सातत्याने या महामार्गाच्या दुरवस्थेबद्दल आवाज उठविला, आंदोलनेही केली. मात्र, प्रशासनाला अद्याप जाग आलेली नाही. यातील सर्वाधिक अपघात दस्तापूर ते कर्नाटक सीमा या ४०-४५ किमीच्या अंतरात घडत आहेत. (वार्ताहर)