शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

इथे मिळतेय त्यांना जगण्याचं बऴ़़

By admin | Updated: September 20, 2014 00:05 IST

श्रीनिवास भोसले, नांदेड आजारांवर उपचार करून थकलेल्या पालकांच्या अन् जीवन जगण्याची आशा हरवलेल्या ‘त्या’ मतिमंद बालकांना जीवन जगण्याचे बळ देण्याचे काम राजस्थानी एज्युकेशन सोसायटी करीत आहे़

श्रीनिवास भोसले,  नांदेडमेंदूशी संबंधित आजारामुळे आलेला मतिमंदपणा़़क़ुणाचे हात वाकडे़़़तर कुणाचे पाय़़़अशा आजारांवर उपचार करून थकलेल्या पालकांच्या अन् जीवन जगण्याची आशा हरवलेल्या ‘त्या’ मतिमंद बालकांना जीवन जगण्याचे बळ देण्याचे काम मुंबईच्या डॉक्टरांसह राजस्थानी एज्युकेशन सोसायटी करीत आहे़ नांदेड येथील राजस्थानी एज्युकेशन सोसायटीच्यावतीने गत पाच वर्षापासून मेंदूशी संबंधित आजार असलेल्या बालकांची तपासणी व उपचार अशा दोन्ही प्रक्रिया पूर्णत: मोफत शिबिरातून केल्या जातात़ गुरूवारपासून नवा मोंढा परिसरातील मालपाणी मतिमंद विद्यालयात सुरू असलेल्या शिबिरात नांदेडसह राज्यभरातून आलेल्या जवळपास चारशेहून अधिक रूग्णांनी तपासणी करून घेतली आहे़ या शिबीरासाठी गत पाच वर्षापासून मुंबई येथील जयवकील स्कुल आॅचिल्ड्रन्स इन नीड आॅफ स्पेशल केअर आणि वाडिया चिल्ड्रन्स हॉस्पिटल यांचे सहकार्य मिळत आहे़ यापूर्वीच्या शिबिरामध्ये मेंदूशी संबंधित आजार असलेल्या नांदेड शहरातील ७०६, जिल्ह्यातील ८२९, हिंगोली- १११, परभणी- १०६, लातूर-३१, जालना- २७, औरंगाबाद-२१, यवतमाळ- ५२ यासह बीड, अकोला, वाशिम, पुणे, मुंबई, बिदर, आदिलाबाद, हैदराबाद आदी ठिकाणच्या २२०० रूग्णांवर मोफत उपचार करण्यात आल्याचे मुख्याध्यापक नितीन निर्मल यांनी सांगितले़ शिबिरामध्ये रूग्णांना मोफत इसीजी, सीटी स्कॅन, एमआरआय, थेरपी प्रोग्राम, तपासणी, औषध वाटप केले जात आहे़ नियमित थेरपी व उपचारासाठी डॉ़ लक्ष्मीकांत बजाज यांनी शाळेमध्ये फिजीथेरपी हॉल उपलब्ध करून दिला आहे़ यामुळे थेरपी करणे सोयीस्कर आणि सुलभ होत असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले़ राज्याचा सर्व्हे करून आम्ही धुळे आणि नांदेडची निवड केली़ यात नांदेडमध्ये राजस्थानी एज्युकेशन सोसायटीचा पुढाकार महत्वाचा होता़ अशा शिबिरातून गरजू आणि गरीब रूग्णांना उपचार मिळत आहेत़ परंतु या ठिकाणी आता शिबिराऐवजी कायमचे एक सेंटर सुरू व्हावे, अशी अपेक्षा मुंबईच्या डॉ़ अनैता हेगडे-वुडवाडीया यांनी व्यक्त केली़ ३०० रूग्णांपासून सुरूवात झाली ती संख्या आज हजारामध्ये आहे़ रूग्णांची गरज ओळखून नांदेडात कायम मोफत उपचार देणारे सेंटर उभे राहिल्यास आनंदच होईल असे त्या म्हणाल्या़ येथील शिबिरामध्ये येणाऱ्या मतिमंद बालकांची संख्या आणि त्या आजाराच्या उपचारासाठी लागणारा खर्च पाहता शासनाने भरीव मदत द्यावी, अशी अपेक्षा संस्थेचे रामनारायण काबरा यांनी व्यक्त केली़ काय आणि कसा आहे आजार?जन्मानंतर किंवा जन्माआधी मेंदूला इजा झाल्यास बालकास मस्तिक आजार होतो़ यातून आॅटीझम, फीट, नसांचे आजार, बहुविकलांगता येते़ अपंगत्व वयोमानानुसार वाढत जात असल्याने याचा वाचा आणि श्रवणावर परिणाम होतो़ शरीराच्या हालचालीवरही नियंत्रण नसल्याने अशा बालकांच्या विकासात अडचण येते़ अंधश्रद्धेच्या आहारी जाऊ नये़ सदर आजार अनुवांशिक किंवा संसर्गजन्य नाही़ अज्ञान आणि गरिबीमुळे काही लोक अंधश्रद्धेच्या आहारी जातात़ स्थानिक पातळीवर तज्ञ डॉक्टरांची अल्प संख्या व तंत्रज्ञानाचा अभाव तसेच उपचार महागडा असल्याने या आजाराची पुरेशी काळजी घेण्याकडे दुर्लक्ष होत असते़ अद्यावत सुविधांची गरजशासकीय रूग्णालयात एमआरआय मशीन, सीटी स्कॅन मशिन, एक्स-रे आदी अद्यावत प्रकारच्या सुविधा उपलब्ध झाल्यास रूग्णांच्या नातेवाईकांना आणि मोफत शिबीर घेणाऱ्या संस्थांना सोईचे होईल़ नांदेडच्या शासकीय रूग्णालयात एमआरआय उपलब्ध नसल्याने खासगी रूग्णालयाचा आधार घ्यावा लागत आहे़