शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
3
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
4
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
5
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
6
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
7
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
8
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
9
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
10
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
11
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
12
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
13
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
14
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
15
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
16
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
17
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
18
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
19
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
20
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले

इथे ‘भय’ संपले...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 23:57 IST

केंद्र शासनाने दोन वर्षांपूर्वी औरंगाबाद शहराची ‘स्मार्ट सिटी’प्रकल्पात निवड केली. शहर स्मार्ट करण्यासाठी सध्या मनपा कामाला लागली आहे. शहरात आजही असंख्य नियमबाह्य कामे करण्यात येत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : केंद्र शासनाने दोन वर्षांपूर्वी औरंगाबाद शहराची ‘स्मार्ट सिटी’प्रकल्पात निवड केली. शहर स्मार्ट करण्यासाठी सध्या मनपा कामाला लागली आहे. शहरात आजही असंख्य नियमबाह्य कामे करण्यात येत आहेत. त्याकडे मनपा प्रशासन अजिबात लक्ष देत नाही. दुभाजकात कचरा टाकणे, सिमेंट-डांबरी रोड खोदून अवैध नळ कनेक्शन घेणे, जिथे जागा मिळेल तिथे पोस्टर्स, होर्डिंग लावणे. मनपाची खुली जागा दिसली, तर त्वरित अतिक्रमण करणे, रस्त्याच्या कडेला दुकाने थाटणे, मनपाच्या पथदिव्यांमधून वीज कनेक्शन घेणे, ग्रीन झोनमध्ये अवैध प्लॉटिंग करून विकणे, अशा शेकडो नियमबाह्य कामांकडे मनपा डोळेझाक करीत आहे.महाराष्टÑ महापालिका अधिनियमात महापालिकेला स्वतंत्र अधिकार दिले आहेत. कायद्याचा बडगा उगारण्यास सुरुवात केल्यावर नागरिकांनाही एक शिस्त लागेल. वर्षानुवर्षे बेशिस्तीचे दर्शन या शहराला होत आहे. मनपाच्या दप्तरी दोन लाख मालमत्ताधारक आहेत. त्यातील सव्वा लाख मालमत्ताधारक दरवर्षी महापालिकेला कोट्यवधी रुपयांचा कर देतात. शहरातील करदात्यांना मूलभूत सोयीसुविधा देण्याचे आद्यकर्तव्य मनपावर आहे. अनेकदा करदाते बाजूला राहतात आणि अनधिकृत वसाहतींमधील मालमत्ताधारकच सोयीसुविधांचा उपभोग घेत असल्याचे (पान २ वर)अशी आहे, वस्तुस्थितीदुभाजकात कचरा टाकणे- शहरातील प्रमुख रस्त्यांवर दुभाजक उभारण्यात आले आहेत. या दुभाजकांचा वापर चक्क कचरा कुंडीसारखा करण्यात येतोय. हा कचरा सहजासहजी काढता येत नाही. त्यामुळे सफाई कर्मचारीही त्याकडे दुर्लक्ष करतात. अनेक महिने हा कचरा तसाच पडून राहतो. कचरा टाकणाºयांवर कारवाईचा बडगा कोणी उगारावा. किलेअर्क, मकबरा रोडवरील दुभाजकावर कपडे वाळवायला टाकण्याची प्रथाही सुरू झाली आहे.अवैध नळ कनेक्शन- एका रात्रीतून नागरिक अवैध नळ घेतात. यासाठी सिमेंट, डांबरी रोडही खोदून टाकण्यात येतो. शहरात एक लाखाहून अधिक अवैध नळ कनेक्शनची संख्या आहे. एक हजार वेळेस मनपाने अभय योजना राबविली; पण कोणीही आपले नळ अधिकृत करून घेत नाही. दोन वर्षांपासून तर पाणीपट्टी वसुलीही पूर्णपणे ठप्प आहे.अवैध पोस्टर्स, होर्डिंग- शहरातील प्रत्येक प्रमुख रस्त्यांवर मोठ-मोठे होर्डिंग लावले आहेत. आता काही होर्डिंग तर कायमस्वरूपीचे झाले आहेत. उड्डाणपूल असेल किंवा अन्य सार्वजनिक जागा तिथे पोस्टर्स चिटकवण्यात येतात. आजपर्यंत मनपाने एकावरही कायदेशीर कारवाई केलेली नाही. राजकीय दबाव आला, तर कारवाईचे निव्वळ ढोंग रचण्यात येते.