शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
3
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
4
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
5
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
6
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
7
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
8
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
9
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
10
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
11
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
12
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
13
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
14
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
15
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
16
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
17
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
18
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
19
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
20
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
Daily Top 2Weekly Top 5

इथे ‘भय’ संपले...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 23:57 IST

केंद्र शासनाने दोन वर्षांपूर्वी औरंगाबाद शहराची ‘स्मार्ट सिटी’प्रकल्पात निवड केली. शहर स्मार्ट करण्यासाठी सध्या मनपा कामाला लागली आहे. शहरात आजही असंख्य नियमबाह्य कामे करण्यात येत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : केंद्र शासनाने दोन वर्षांपूर्वी औरंगाबाद शहराची ‘स्मार्ट सिटी’प्रकल्पात निवड केली. शहर स्मार्ट करण्यासाठी सध्या मनपा कामाला लागली आहे. शहरात आजही असंख्य नियमबाह्य कामे करण्यात येत आहेत. त्याकडे मनपा प्रशासन अजिबात लक्ष देत नाही. दुभाजकात कचरा टाकणे, सिमेंट-डांबरी रोड खोदून अवैध नळ कनेक्शन घेणे, जिथे जागा मिळेल तिथे पोस्टर्स, होर्डिंग लावणे. मनपाची खुली जागा दिसली, तर त्वरित अतिक्रमण करणे, रस्त्याच्या कडेला दुकाने थाटणे, मनपाच्या पथदिव्यांमधून वीज कनेक्शन घेणे, ग्रीन झोनमध्ये अवैध प्लॉटिंग करून विकणे, अशा शेकडो नियमबाह्य कामांकडे मनपा डोळेझाक करीत आहे.महाराष्टÑ महापालिका अधिनियमात महापालिकेला स्वतंत्र अधिकार दिले आहेत. कायद्याचा बडगा उगारण्यास सुरुवात केल्यावर नागरिकांनाही एक शिस्त लागेल. वर्षानुवर्षे बेशिस्तीचे दर्शन या शहराला होत आहे. मनपाच्या दप्तरी दोन लाख मालमत्ताधारक आहेत. त्यातील सव्वा लाख मालमत्ताधारक दरवर्षी महापालिकेला कोट्यवधी रुपयांचा कर देतात. शहरातील करदात्यांना मूलभूत सोयीसुविधा देण्याचे आद्यकर्तव्य मनपावर आहे. अनेकदा करदाते बाजूला राहतात आणि अनधिकृत वसाहतींमधील मालमत्ताधारकच सोयीसुविधांचा उपभोग घेत असल्याचे (पान २ वर)अशी आहे, वस्तुस्थितीदुभाजकात कचरा टाकणे- शहरातील प्रमुख रस्त्यांवर दुभाजक उभारण्यात आले आहेत. या दुभाजकांचा वापर चक्क कचरा कुंडीसारखा करण्यात येतोय. हा कचरा सहजासहजी काढता येत नाही. त्यामुळे सफाई कर्मचारीही त्याकडे दुर्लक्ष करतात. अनेक महिने हा कचरा तसाच पडून राहतो. कचरा टाकणाºयांवर कारवाईचा बडगा कोणी उगारावा. किलेअर्क, मकबरा रोडवरील दुभाजकावर कपडे वाळवायला टाकण्याची प्रथाही सुरू झाली आहे.अवैध नळ कनेक्शन- एका रात्रीतून नागरिक अवैध नळ घेतात. यासाठी सिमेंट, डांबरी रोडही खोदून टाकण्यात येतो. शहरात एक लाखाहून अधिक अवैध नळ कनेक्शनची संख्या आहे. एक हजार वेळेस मनपाने अभय योजना राबविली; पण कोणीही आपले नळ अधिकृत करून घेत नाही. दोन वर्षांपासून तर पाणीपट्टी वसुलीही पूर्णपणे ठप्प आहे.अवैध पोस्टर्स, होर्डिंग- शहरातील प्रत्येक प्रमुख रस्त्यांवर मोठ-मोठे होर्डिंग लावले आहेत. आता काही होर्डिंग तर कायमस्वरूपीचे झाले आहेत. उड्डाणपूल असेल किंवा अन्य सार्वजनिक जागा तिथे पोस्टर्स चिटकवण्यात येतात. आजपर्यंत मनपाने एकावरही कायदेशीर कारवाई केलेली नाही. राजकीय दबाव आला, तर कारवाईचे निव्वळ ढोंग रचण्यात येते.