शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
3
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
4
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
5
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
6
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
7
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
8
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
9
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
10
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
11
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
12
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
13
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
14
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
15
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
16
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
17
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
18
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
19
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
20
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...

म्हणून उमेदवारांची होतेय शिवारफेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 00:45 IST

जिल्ह्यातील एकूण ४८ ग्रामपंचायतीची मतदान प्रक्रिया येत्या ७ आॅक्टोबर रोजी पार पडणार आहे. मात्र सोयाबीनचा हंगाम असल्याने मतदार सोयाबीन काढण्यासाठी रात्रंदिवस एक करीत असल्याने उमेदवारांना घरीच सकाळ- सायंकाळ घरी कोणीच भेटत नसल्याने उमेवारांनी नविन फंडा काढून शेतात जावून भेट घेण्यावर जोर दिला आहे. त्यामुळे उमेदवारांची ही शिवारफेरी चांगलीच चर्चेचा विषय बनली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यातील एकूण ४८ ग्रामपंचायतीची मतदान प्रक्रिया येत्या ७ आॅक्टोबर रोजी पार पडणार आहे. मात्र सोयाबीनचा हंगाम असल्याने मतदार सोयाबीन काढण्यासाठी रात्रंदिवस एक करीत असल्याने उमेदवारांना घरीच सकाळ- सायंकाळ घरी कोणीच भेटत नसल्याने उमेवारांनी नविन फंडा काढून शेतात जावून भेट घेण्यावर जोर दिला आहे. त्यामुळे उमेदवारांची ही शिवारफेरी चांगलीच चर्चेचा विषय बनली आहे.निवडणूक म्हटले की, मतदारांना चांगलाच भाव येतो. त्यामुळे उमेदवार आप- आपल्या परिने मतदारांची मनधरणी करण्यासाठी जिवाचे रान करीत आहेत. मात्र पावसापासून वाचलेले सोयाबीन कापून टाकण्यामध्ये मतदार उमेदवारांच्या मनधरणीला अजिबात बळी पडत नसल्याचे चित्र आहे. सद्यस्थितीत सोयाबीन काढणीचा हंगाम एवढा जोरात सुरु आहे की, मतदार सकाळी सूर्य निघण्याअगोदर शेतात आणि सायंकाळी सूर्य मावळल्यानंतर घरी अशी स्थिती निर्माण झाले आहे. त्यामुळे उमेदवारांनाही प्रचार करावा तरी कोणाकडे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.काही उमेदवार मात्र नवीन शक्कल लढवित याला त्याला भेटण्यास आल्याचे निमित्त करुन आपण निवडणुकीत उभा असल्याचे हळूच सांगत आहेत. मतदार उमेदवारांच्या समाधानासाठी होकार देत पुन्हा काही क्षण विसावा घेऊन पुन्हा सोयाबीन काढणीच्या कामाला लागत आहेत. त्यामुळे या निवडणुकीत उमेदवारांची पुरती हेळसांडच होत असल्याचे पहावयास मिळत आहे. काही गावातील मतदारांना तर उमेदवार कोण आहे? याचाही अजून ताळ मेळ नाही. त्यामुळे निवडणुकीच्या दिवशी तरी मतदार गावात राहतील किंवा नाही? याची चिंता उमेदवारांना चांगलीच भेडसावत आहे.